शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : पर्ससीन-पारंपरिक वाद, मच्छीमारांमध्ये खटका; मत्स्य उत्पादनाला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 16:43 IST

पारंपरिक व पर्ससीन मच्छीमारांमधील वाद, आंदोलने आणि ओखी वादळासह अनेक नैसर्गिक संकटे यांचा परिणाम जिल्ह्यातील सागरी मत्स्योत्पादनावर झाला आहे. सन २०१८मधील मत्स्य उत्पादनात गतवर्षीपेक्षा घट झाल्याचे मच्छीमारांमधून सांगण्यात येत आहे. मागणीपेक्षा पुरवठा कमी झाल्याने बाजारातील मच्छीचे दरही सातत्याने तेजीत राहिले.

ठळक मुद्देओखी वादळामुळेही मासळी घटलीमागणीपेक्षा पुरवठा कमी, मच्छीचे दरही सातत्याने तेजीत२०१८मधील मत्स्य उत्पादनात गतवर्षीपेक्षा घट फेब्रुवारी २०१६पासून पर्ससीन मासेमारीवर बंदी

रत्नागिरी : पारंपरिक व पर्ससीन मच्छीमारांमधील वाद, आंदोलने आणि ओखी वादळासह अनेक नैसर्गिक संकटे यांचा परिणाम जिल्ह्यातील सागरी मत्स्योत्पादनावर झाला आहे. सन २०१८ मधील मत्स्य उत्पादनात गतवर्षीपेक्षा घट झाल्याचे मच्छीमारांमधून सांगण्यात येत आहे. मागणीपेक्षा पुरवठा कमी झाल्याने बाजारातील मच्छीचे दरही सातत्याने तेजीत राहिले.पर्ससीन व पारंपरिक मच्छीमारांमधील वादावर तोडगा काढण्यासाठी शासनाने काही कायदे केले आहेत. हे कायदे झाले असले तरी योग्य अंमलबजावणी होत नसल्याने ते कागदावरच राहिल्याच्या प्रतिक्रिया पारंपरिक मच्छीमारांमधून व्यक्त होत आहेत.

गेल्या काही वर्षात पर्ससीन मासेमारी नौकांनी सागरातील मत्स्यबीजच नष्ट केल्याने चालू हंगामात मत्स्योत्पादन कमी झाल्याचा दावा पारंपरिक मच्छीमारांमधून केला जात आहे. आधुनिक तंत्रज्ञानाने मच्छीमारीला पारंपरिक मच्छीमारांचा सतत विरोध होत असल्यानेच मत्स्य उत्पादनात घट झाली आहे, असा आरोप पर्ससीन, एलईडी मच्छीमारांमधून केला जात आहे.गेल्या काही वर्षांपासून कोकण किनारपट्टीवरील अन्य जिल्ह्यांबरोबरच रत्नागिरी जिल्ह्यातही पारंपरिक व पर्ससीन - एलईडी मच्छीमारांमध्ये सागरी मासेमारी हद्दीवरून जोरदार संघर्ष सुरू आहे. सागरी मासेमारीचा गेल्या दहा वर्षांतील आढावा घेता अनेक संकटांमधून हा व्यवसाय मार्गक्रमण करीत आहे. त्यातच पर्ससीन या आधुनिक मासेमारी प्रकारामुळे सागरातील मासे गाळून काढले जातात. त्यामुळे या मासेमारीवर बंदी घालावी, अशी मागणी पारंपरिक मच्छीमारांकडून गेल्या दोन दशकांपासून सुरू होती.राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपप्रणीत सरकार सत्तेवर आल्यानंतर पर्ससीन बंदीबाबत पारंपरिक मच्छीमारांची मागणी अंशत: मान्य करण्यात आली. त्यानुसार फेब्रुवारी २०१६पासून १ जानेवारी ते ३१ आॅगस्ट या ८ महिन्यांच्या काळासाठी पर्ससीन मासेमारीवर राज्य सरकारने बंदी घातली, तर १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या चार महिन्यांसाठी पर्ससीन मासेमारीला परवानगी देण्यात आली. मात्र, त्यानंतरही पारंपरिक व पर्ससीन मच्छीमारांमधील संघर्ष संपलेला नाही.मत्स्य उत्पादन गतवर्षीपेक्षा घटरत्नागिरी जिल्ह्यातील मासेमारीचा गेल्या ५ वर्षांमधील आढावा घेता २०१२-१३ ते २०१४-१५ या तीन वर्षांच्या काळात मत्स्य उत्पादनाचा आलेख उंचावला होता. मात्र, सन २०१५-१६मध्ये मत्स्योत्पादन २५ टक्क्यांनी घसरून ते ७६,९०० मेट्रिक टनावर आले.

त्यानंतर २०१६-१७ या वर्षात मत्स्योत्पादन पुन्हा २१ टक्क्यांनी वाढून ते ९८,४३३ मेट्रिक टन झाले. मात्र, सन २०१७-१८ या वर्षात ओखी वादळासह अनेक नैसर्गिक संकटे आणि पर्ससीन व पारंपरिक मच्छीमार यांच्यातील संघर्षामुळे मत्स्योत्पादन गतवर्षीच्या तुलनेत २० ते ३० टक्क्यांनी घटण्याची शक्यता आहे. हा हंगाम आता ३१ मे रोजी संपणार आहे. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीfishermanमच्छीमार