शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
5
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
6
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
7
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
8
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
9
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
10
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
11
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
12
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
13
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
14
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
15
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
16
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
17
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
19
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
20
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर

Cabinet expansion: रत्नागिरी जिल्ह्याला तब्बल २९ वर्षांनी मिळाली दोन मंत्रिपदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 18:34 IST

रत्नागिरी : तब्बल २९ वर्षांनी रत्नागिरी जिल्ह्याला दोन मंत्रिपदे मिळाली आहेत. नव्याने तयार झालेल्या महायुतीच्या सरकारमध्ये रत्नागिरीचे आमदार उदय ...

रत्नागिरी : तब्बल २९ वर्षांनी रत्नागिरी जिल्ह्याला दोन मंत्रिपदे मिळाली आहेत. नव्याने तयार झालेल्या महायुतीच्या सरकारमध्ये रत्नागिरीचे आमदार उदय सामंत आणि दापोलीचे आमदार योगेश कदम या दोघांची मंत्रीमंडळामध्ये वर्णी लागली आहे. १९९५ मध्ये जिल्ह्यातील दोन आमदारांना मंत्रिपद मिळाले होते आणि योगायोगाने तेव्हाही युतीचेच सरकार होते.रत्नागिरी जिल्ह्यात उदय सामंत यांचे मंत्रिपद आधीपासूनच निश्चित होते, त्यात आता योगेश कदम यांनी बाजी मारली आहे. याआधी १९९५ साली ज्यावेळी शिवसेना आणि भाजप युतीचे सरकार आले, त्यावेळी मनोहर जोशी यांच्या मंत्रिमंडळामध्ये संगमेश्वरचे आमदार रवींद्र माने आणि खेडचे आमदार रामदास कदम या दोन मंत्र्यांचा समावेश होता. त्यानंतर तब्बल २९ वर्षांनी आता जिल्ह्याला पुन्हा दोन मंत्रिपदे मिळाली आहेत.१९९९ आणि २००४ या दोन टर्ममध्ये जिल्ह्यात शिवसेना आणि भाजप युतीचे आमदार अधिक असले, तरी राज्यात सत्ता नव्हती. त्यामुळे या दोन्ही काळामध्ये म्हणजेच सलग दहा वर्षे जिल्ह्यात बाहेरील पालकमंत्रीच नेमण्यात आले होते २००९ साली काँग्रेस आघाडीच्या सत्तेत गुहागरचे आमदार भास्कर जाधव मंत्री झाले. २०१३ साली त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर रत्नागिरीचे तरुण आमदार उदय सामंत मंत्री झाले. मात्र, त्यानंतर २०१४ ते १९ या काळात शिवसेना-भाजपची सत्ता असतानाही देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये रत्नागिरीतील एकाही आमदाराला मंत्रिपद मिळाले नाही.२०१९ मध्ये उद्धवसेना स्वतंत्र झाली आणि महाविकास आघाडीची सत्ता आली. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळात उदय सामंत यांना उच्च व तंत्र शिक्षण मंत्रिपद मिळाले. अडीच वर्षांपूर्वी राजकीय समीकरणे बदलल्यामुळे महायुतीची सत्ता आली आणि उदय सामंत यांच्याकडे उद्योग खात्याच्या मंत्रिपदासह रत्नागिरीचे पालकमंत्री पद सोपवण्यात आले. मात्र, १९९५ नंतर २०२४ च्या निवडणुकीपर्यंत जिल्ह्यात कधीही दोन मंत्रिपदे मिळाली नाहीत. याउलट यातील बराचसा काळ पालकमंत्री जिल्ह्याबाहेरीलच नेमला गेला होता. आता २०२४ च्या निवडणुकीमध्ये महायुतीला प्रचंड बहुमत असल्याने जिल्ह्यात शिंदे सेनेच्या कोट्यातूनच दोन मंत्रिपदे मिळत आहेत.

एकनाथ शिंदे यांनी शब्द खरा केलानिवडणुकीआधी दापोली येथे झालेल्या योगेश कदम यांच्यासाठीच्या प्रचार सभेत तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘तुम्ही मला आमदार द्या, मी त्याला नामदार करतो’, असे आश्वासन मतदारांना दिले होते. एकनाथ शिंदे यांनी आपला हा शब्द खरा केला असून, योगेश कदम यांनी रविवारी राज्यमंत्रिपदासाठी शपथ घेतली आहे.

दुसऱ्या टर्ममध्ये मंत्रिपदरत्नागिरीचे आमदार उदय सामंत २००४ साली सर्वात प्रथम निवडून आले. २००९ साली ते दुसऱ्यांदा निवडून आले आणि त्या टर्मच्या शेवटच्या काही महिन्यांसाठी त्यांना राज्यमंत्रिपदासह रत्नागिरीचे पालकमंत्री पद देण्यात आले. योगेश कदम यांना मात्र आपल्या दुसऱ्या टर्मच्या सुरुवातीलाच मंत्रिपद मिळाले आहे.

उदय सामंत यांनी चौथ्यांदा घेतली मंत्रिपदाची शपथरत्नागिरीचे आमदार उदय सामंत आता चौथ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेत आहेत. २०१३ साली त्यांनी मंत्रिपदाची पहिल्यांदा शपथ घेतली, त्यावेळी त्यांच्याकडे नऊ खात्यांचे राज्यमंत्रिपद होते. २०१९ मध्ये महाविकास आघाडीच्या सत्तेत त्यांनी दुसऱ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यावेळी त्यांच्याकडे उच्च व तंत्र शिक्षण खात्याचे कॅबिनेट मंत्रिपद होते. त्यानंतर २०२२ मध्ये महायुतीची सत्ता आल्यानंतर उदय सामंत यांनी तिसऱ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली आणि त्यांच्याकडे उद्योग खात्याचे कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले. आता उदय सामंत यांनी चौथ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली असून, त्यांच्याकडे आधीचे उद्योग खातेच कायम राहणार की, त्यांना त्यापेक्षा आणखी चांगले खाते देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारUday Samantउदय सामंतYogesh Kadamयोगेश कदम