शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

रत्नागिरी : छप्पर आगीत भस्मसात, आजी विजया पवार पुन्हा निराधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 3:14 PM

अठरा वर्षापूर्वी पतीचे निधन झाले, पदरी मूलबाळ नाही. त्यामुळे साहजिकच एकटेपणा वाट्याला आला. अन्न होतं आणि निवारा होता, तेवढाच तिच्या जगण्याचा आधार होता. दुर्दैवाने तिच्या डोक्यावरचे छप्पर आगीत भस्मसात झाले. वयाच्या ८० व्या वर्षी विजया उद्धव पवार पुन्हा एकदा निराधार झाल्या.

ठळक मुद्दे वयाच्या ८० व्या वर्षी विजया पवार पुन्हा निराधारगरिबीचे जीवन जगणाऱ्या आजींचे छप्परच गेलं

संतोष पोटफोडेसाखरपा : अठरा वर्षापूर्वी पतीचे निधन झाले, पदरी मूलबाळ नाही. त्यामुळे साहजिकच एकटेपणा वाट्याला आला. आधार दोनच होते. संजय गांधी निराधार योजनेंतर्गत मिळणारी पेन्शन, त्याला शेजाऱ्यांनी दिलेली जोड आणि डोक्यावरचे छप्पर. अन्न होतं आणि निवारा होता, तेवढाच तिच्या जगण्याचा आधार होता. दुर्दैवाने आज त्यातला एक आधार निखळला. तिच्या डोक्यावरचे छप्पर आगीत भस्मसात झाले. वयाच्या ८० व्या वर्षी विजया उद्धव पवार पुन्हा एकदा निराधार झाल्या.संगमेश्वर तालुक्यातील काजळी नदीच्या किनारी वसलेल्या भडकंबा गावातील पेठवाडीतील विजया उद्धव पवार यांचे राहाते घर मंगळवारी रात्री १ वाजण्याच्या सुमारास आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. अवघ्या दोन तासातच होत्याचं नव्हते झाले.विजया पवार यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची. पती उद्धव पवार यांचे अठरा वर्षांपूर्वी निधन झाले. पतीच्या निधनानंतर त्या घरात एकट्याच राहात होत्या. उत्पन्नाचे कोणतेच साधन नसल्याने त्यांना शेजारचे लोक मदत करीत असत. जेवण, डॉक्टरचा खर्च सर्व शेजारीच करत असत.

थोड्याफार प्रमाणात मोठा खर्च आला तर त्यांचा पुतण्या निखील पवार करीत असे. भडकंबा पेठेतील ग्रामस्थांनी आगीची घटना समजताच पवार यांच्या घराकडे धाव घेतली आणि मिळेल त्या साधनाने आग विझविण्यास मदत केली.

दोन तासांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आली, तेव्हा बुधवारी पहाटे साडेतीन वाजले होते. तोपर्यंत त्यांचा पूर्ण संसार जळून खाक झाला. अर्थात संसाराबरोबरच त्यांचे हक्काचे छप्पर काही क्षणातच हरपले असले तरी भडकंबा पेठवाडीतील शेजारी आजही आपुलकीने त्यांच्या मदतीसाठी धडपडत आहेत... माणुसकीची साक्ष देत...!

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीfireआग