रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर अपघात; २ ठार २ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 17:16 IST2018-07-02T17:09:09+5:302018-07-02T17:16:46+5:30
मुंबई गोवा महामार्गावर दाभिळ नाका इथं मालवाहू टँकर आणि कारमध्ये झालेल्या भीषण अपघातामध्ये दोन ठार तर दोन जण जखमी झाले आहेत. या अपघातामुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर अपघात; २ ठार २ जखमी
रत्नागिरी : मुंबई गोवा महामार्गावर दाभिळ नाका इथं मालवाहू टँकर आणि कारमध्ये झालेल्या अपघातामध्ये दोन ठार तर दोन जण जखमी झाले आहेत. या भीषण अपघातामुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
माहितीनुसार, लोटे औद्योगिक वसाहतीतील हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीतील कार्यक्रम उरकून कंपनीतील चौघे जण स्विफ्ट डिझायर कारने मुंबईच्या दिशेने निघाले होते. दरम्यान, मुंबई गोवा महामार्गावर खेड नाक्याजवळ दाभिळ शाळा येथे त्यांच्या गाडीला अपघात घडला.
या अपघातामध्ये कंपनीचे लोटे युनिटचे डायरेकटर आणि फॅक्ट्री मॅनेजर गिरीष बर्वे हे जागीच ठार झाले तर गंभीर जखमी झालेले कंपनीचे पर्सनल मॅनेजर विशाल म्हातले यांच्यावर चिपळूण येथील लाईफ केअर रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मळवली.
जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू
दरम्यान, अपघातात जखमी असलेल्या राकेश वडाळकर यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु असून, राजेश जोशी हेही या अपघातामध्ये जखमी झाले आहेत. हा अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.