शहरं
Join us  
Trending Stories
1
SIR प्रक्रियेत मोठा घोटाळा समोर, चुकीची माहिती दिल्याचे उघड; नूरजहां, आमिर, दानिश विरोधात FIR
2
"तुमच्या मर्यादेत राहा..." ODI मालिका जिंकताच गंभीरनं काढला मनातला राग! तो नेमकं कुणाला अन् काय म्हणाला?
3
एकनाथ शिंदेंनी मुलाचे भरसभेत केले तोंडभरून कौतुक; म्हणाले, “श्रीकांत हे व्हिजन असलेले खासदार”
4
'यशस्वी' सेंच्युरी... 'रो-को'ची फिफ्टी! टीम इंडियानं दाबात जिंकली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका
5
“कोणतीही तडजोड अमान्य, अशी कारवाई करू की...”; Indigo प्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका
6
वयाच्या ६७ व्या वर्षी २५ वर्षांच्या तरुणीशी लग्न; संशयास्पद मृत्यूनंतर सून म्हणते, "लग्नानंतर दररोज..."
7
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मालिका गाजवणारा 'किंग' ठरला कोहली! तेंडुलकरचा 'महारेकॉर्ड' मोडला
8
"IndiGo चा गोंधळ, प्रवाशांना त्रास हे भाजपा सरकारच्या नाकर्तेपणाचं उदाहरण"; विरोधक कडाडले
9
Yashasvi Jaiswal Century : आधी कसोटी खेळला! मग टी-२० स्टाईलमध्ये साजरी केली वनडेतील पहिली सेंच्युरी
10
“चार्टर्ड अकाउंटंटच देशाचे आर्थिक शिल्पकार”; ICAI परिषदेत DCM एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
11
“संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या शक्तींविरोधात संघर्ष करण्याची वेळ”: हर्षवर्धन सपकाळ
12
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
13
'लाडकी बहिण योजना' सर्वात जास्त 'लाडकी'! ४६% पुरुषांचाही महिलांच्या आर्थिक उन्नतीला पाठिंबा
14
अबतक २००००! हिटमॅन रोहित शर्मानं रचला इतिहास; आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा पल्ला
15
एकनाथ शिंदेमुळेच भाजपा पुन्हा सत्तेत, ताकदवान व्हायला उठावच कारणीभूत - शंभूराज देसाई
16
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: ‘या’ ५ गोष्टी अवश्य अर्पण करा; गणपतीची कायम कृपा मिळवा!
17
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
18
समस्या संपत नाहीत, पैसा राहत नाही? गणेशाचे प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; अद्भूत अनुभव घ्या!
19
IND vs SA : कुलदीप KL राहुलकडे DRS चा हट्ट धरायला गेला, मग हिटमॅन रोहित 'कॅप्टन' झाला अन्... (VIDEO)
20
एलॉन मस्क यांच्या 'X' ला तब्बल १०८० कोटींचा दंड ! 'ब्लू टीक' संदर्भातील प्रकरणात बसला दणका
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची उसंत; पूरस्थिती ओसरली, जनजीवन पूर्ववत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 12:16 IST

जगबुडी नदी अजूनही धोका पातळीवर

रत्नागिरी : जवळपास आठवडाभर संततधारेने पडणाऱ्या पावसाने बुधवारी सकाळपासून थोडी उसंत घेण्यास सुरुवात केल्याने जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये निर्माण झालेली पूरस्थिती ओसरण्यास मदत झाली. काही काळ सूर्यदर्शनही झाले. नद्यांचे पात्रही कमी झाले असून, जगबुडी नदी अजूनही धोका पातळीवर आहे. पाऊस कमी झाल्याने विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे. सलग पडलेल्या पावसाने जवळपास १५ टक्क्यांनी वाढ केली असून, येथील जिल्हा नियंत्रण कक्षात आतापर्यंतचा २४२०.८४ मिलिमीटर (७१.९६ टक्के) पाऊस नोंदविण्यात आला आहे.जिल्हा नियंत्रण कक्षाच्या सकाळी १० वाजेपर्यंतच्या अहवालानुसार, सर्व तालुक्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. दिवसभरात ठराविक सरीच पडत आहेत. पावसाने बुधवारी सकाळपासून विश्रांती घेतल्याने जिल्ह्यातील सहा प्रमुख नद्यांना आलेला पूरही आता ओसरला आहे.मात्र, खेडमधील जगबुडी नदी धोका पातळीवर असून, राजापूरमधील कोदवली नदीनेही इशारा पातळी ओलांडलेली आहे. खेड, चिपळूण, राजापूर या शहरांमधील पूरस्थिती आता नियंत्रणाखाली असून, येथील नागरिक आणि व्यापाऱ्यांना सतर्कतेच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. या पावसाने सर्वच तालुक्यांमध्ये घरे, गोठे यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे.खेड तालुक्यात खेड - दापोली रस्ता बंद असल्याने खेड-शिवतर मार्गाने वाहतूक सुरू करण्यात आली आहे. जालगाव गावतळे रस्ताही बंद असून, टाळसुरे-साखळोली मार्गाने वाहतूक सुरू आहे. चिपळूण तालुक्यात कऱ्हाड - चिपळूण मार्गावरील वाहतूकही हेळवाक मार्गावरील पूल पाण्याखाली गेल्याने बंद ठेवण्यात आली होती. राजापूर शहरातही पाणी ओसरू लागले आहे. कोढेतड येथे चिंचबांध ते गणेशघाट रोडवर तसेच चिंचबांध ते वरची पेठ येथे जाणाऱ्या मार्गावरही बुधवारी सकाळी पुराचे पाणी आले होते.दापोली तालुक्यातील हर्णै, आसूद, दाभोळ येथील २८ व्यक्तींचे तात्पुरते स्थलांतर करण्यात आले आहे. चिपळूण तालुक्यातील ३१ कुटुंबांतील ७६ लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. गुहागर तालुक्यातील पाचेरीसडा येथील ८ नागरिकांनाही नातेवाईकांकडे स्थलांतरित करण्यात आले आहे. बुधवारी सर्वच तालुक्यांमध्ये पावसाने उसंत घेतली असून, हलक्या सरी पडत होत्या.