शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 अनिश्चित काळासाठी स्थगित! भारत-पाकिस्तान युद्धाचे ढग पाहून BCCI चा मोठा निर्णय
2
"घाबरण्याची गरज नाही..," भारत-पाक तणावादरम्यान इंडियन ऑईलनं पेट्रोल-डिझेलवर केलं मोठं वक्तव्य
3
जैसलमेर इथं नागरी वस्तीत सापडला जिवंत बॉम्ब; पाकिस्तानी ड्रोनचा मलाबाही जप्त
4
मनोहर पर्रीकरांची दूरदृष्टी, सैन्याची बनली अतूट शक्ती; S-400 ‘सुदर्शन’मुळे पाक चक्रावले
5
“भारताला प्रत्युत्तर देण्याचा अधिकार, पाकने व्हिक्टिम कार्ड खेळू नये”; अमेरिकेने सुनावले
6
Operation Sindoor Live Updates: देशविरोधी शक्तींचं कुठलेही षडयंत्र यशस्वी होता कामा नये, RSS चं आवाहन
7
पाकिस्तानला आणखी एक धक्का! BSF ने जैशच्या ७ दहशतवाद्यांचा खात्मा केला; सांबामधून घुसखोरीच्या प्रयत्नात होते
8
'ऑपरेशन सिंदूर'वरील प्रत्येक अपडेट देणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्या बहिणीचं आहे बॉलिवूड कनेक्शन, जाणून घ्या याबद्दल
9
“१५ मिनिटे सत्ता द्या, पाकिस्तानला कसे नेस्तनाबूत करायचे ते दाखवून देऊ”; AIMIM नेते आक्रमक
10
पाकिस्तानची फजिती! अर्थ व्यवहार मंत्रालयाचे अकाऊंट हॅक; 'त्या' पोस्टने वेधून घेतलं जगाचं लक्ष
11
पहलगाम हल्ल्यानंतर या दिग्गज कंपनीचे ₹१९००० कोटी बुडाले, चालवते देशातील नंबर १ कंपनी
12
"देशात परिस्थिती काय अन् हा बावळट...", किंग कोहलीच्या भावाने राहुल वैद्यला सुनावलं
13
हाय अलर्ट! चंदीगड-अंबालामध्ये पुन्हा वाजले सायरन, नागरिकांना घरात राहण्याच्या सूचना
14
'कराची बेकरी' पाकिस्तानी ब्रँड आहे का? कोणी केली सुरुवात? का दिलं असं नाव? हा इतिहास माहितीच हवा
15
आधारमधील तुमचा मोबाईल नंबर ऑनलाइन कसा बदलायचा? घरबसल्या २ मिनिटांत होईल काम
16
India-Pakistan War: सैन्य कारवाईवेळी घराचं नुकसान झाल्यास केंद्र सरकार किती पैसे देते?
17
कराची अन् इस्लामाबादचं कनेक्शन तुटलं; भारताच्या INS विक्रांतचा पाकिस्तानवर मोठा हल्ला
18
२३ वर्षांनी अमेरिकन पत्रकाराला मिळाला न्याय; भारतानं पाकिस्तानवर हल्ला करत घेतला बदला
19
सीमेपासून समुद्रापर्यंत... भारताचे नियोजन पाहून पाकिस्तानला भरली धडकी!
20
"माझी गरज लागली तर मी बॉर्डरवर जाऊन युद्ध लढण्यासाठी तयार", प्रसिद्ध अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

रत्नागिरीत पावसाचा शिडकावा; आजही हलक्या सरींची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 13:45 IST

बागायतदार, मच्छीमार धास्तावले

रत्नागिरी : गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील काही भागात पावसाने वाऱ्यासह जोरदार हजेरी लावली आहे. गुरुवारी सकाळी रत्नागिरी शहरासह अनेक भागात पावसाच्या जोरदार सरी काेसळल्या. मात्र, काही वेळातच पुन्हा कडाक्याचे ऊन पडले हाेते. सायंकाळी मात्र पुन्हा ढगाळ वातावरण तयार झाले हाेते. शुक्रवारीही जिल्ह्यात हलक्या सरी पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.मंगळवारी रात्री रत्नागिरी परिसरातील काही गावांमध्ये पावसाने जोरदार वाऱ्यासह हजेरी लावली. यात काही घरांवर झाडे कोसळल्याने नुकसान झाले.गुरुवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास आभाळ भरून आले, आणि काही वेळातच जोरदार वाऱ्यासोबत पावसाने हजेरी लावली. सुमारे पंधरा मिनिटे पाऊस पडत होता. त्यानंतर मधूनच मेघगर्जनाही होत होती. मात्र, काही वेळानंतर सूर्यनारायणाचे दर्शन झाले.दिवसभर अधूनमधून ढगाळ वातावरण होते. तरीही तापमान ३४.४ अंश सेल्सिअस इतके होते. हवेत दमटपणाही होता. ७३ टक्के आर्द्रता असल्याने उकाड्यातही वाढ झाली हाेती. गुरुवारी सायंकाळी पुन्हा ढग भरून आल्याने पावसाची शक्यता निर्माण झाली हाेती. वाऱ्याचाही जोर होता. हवामान खात्याने शुक्रवारीही पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता वर्तविली असून, दि. १३ मेपर्यंत ढगाळ वातावरण राहील, असा अंदाज व्यक्त केला आहे.

बागायतदार, मच्छीमार धास्तावलेआंब्याचा हंगाम शेवटच्या टप्प्यात असला तरी काही ठिकाणी उशिराने फळधारणा झाली आहे. त्यामुळे काहींनी अजून आंबा झाडावरून काढलेला नाही. आता अधूनमधून पाऊस पडू लागल्याने बागायतदार धास्तावले आहेत. तसेच किनाऱ्यावरही जोरदार वारे वाहत असल्याने मच्छिमारीही अडचणीत आली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRainपाऊसweatherहवामान अंदाजfishermanमच्छीमारFarmerशेतकरी