शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

पाऊस, नदीची पातळी कळणार क्लीकवर; रत्नागिरीतील ३ नद्यांवर 'रियल टाइम डेटा सिस्टिम' कार्यान्वित

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2022 19:04 IST

पावसाचे प्रमाण वाढल्यास नियंत्रण कक्षामार्फत नागरिकांना सतर्क करणेदेखील आता सोपे व सहज झाले आहे. त्यामुळे नुकसानाची तीव्रता कमी करण्यास या यंत्रणेचा खूप मोठा फायदा होणार आहे.

खेड : जलसंपदा विभागामार्फत कोकणातील नद्यांवर अत्याधुनिक रियल टाइम डेटा सिस्टिम कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे नद्यांमधील पाणी पातळी, पर्जन्यमान यांच्याबाबतचे अचूक आकडे वेगवान पद्धतीने प्रशासनाला उपलब्ध होणार असून, आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने कोकणासाठी ही यंत्रणा महत्त्वाचे काम करणार आहे.गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड, चिपळूण, राजापूर या ठिकाणी नद्यांना आलेल्या महापुरामुळे मोठी जीवितहानी झाली होती. त्या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभाग जल विज्ञान प्रकल्प नाशिकच्या माध्यमातून कृष्णा खोऱ्याच्या धर्तीवर रत्नागिरी जिल्ह्यासाठी रियल टाइम डेटा सिस्टिम कार्यान्वित करण्यात आली आहे.९ ठिकाणी ए.आर.एस तर ३ ठिकाणी ए.डब्ल्यू.एल.एस सिस्टिमरत्नागिरी जिल्ह्यात ९ ठिकाणी ए. आर. एस  म्हणजेच ॲटोमॅटिक रेन सोर्स स्टेशन आणि तीन ठिकाणी ए डब्ल्यू  एल एस म्हणजेच ॲटोमॅटिक वॉटर लेव्हल रेकॉर्ड सिस्टिम बसवण्यात आली आहे. खेडमधील जगबुडी नदी, चिपळूण येथील बहाद्दूरशेख नाका येथील वाशिष्ठी नदी आणि राजापूर येथील अर्जुना नदी या तीन ठिकाणच्या नद्यांवर ही यंत्रणा बसवण्यात आली आहे.सतर्कतेची सूचना देणे शक्य होणारजलसंपदा विभागामार्फत एक लिंक देखील देण्यात आली असून, या लिंक वर क्लिक केल्यानंतर जिल्ह्यातल्या तीन नद्यांच्या पाण्याची पातळी आणि नऊ ठिकाणच्या पावसाच्या प्रमाणावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. जलसंपदा विभागामार्फत जिल्ह्यात बसवण्यात आलेल्या या यंत्रणेचा वापर अत्यंत आवश्यक असून, या यंत्रणेमुळे नद्यांची पातळी वाढल्यास नदीच्या आसपासच्या गावांना तत्काळ सतर्कतेची सूचना देणे शक्य होणार आहे. एवढेच नाही तर पावसाचे प्रमाण वाढल्यास नियंत्रण कक्षामार्फत नागरिकांना सतर्क करणेदेखील आता सोपे व सहज झाले आहे. त्यामुळे नुकसानाची तीव्रता कमी करण्यास या यंत्रणेचा खूप मोठा फायदा होणार आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRainपाऊसfloodपूरriverनदीWaterपाणी