शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

शिवसेनेतील बड्या नेत्याच्या भावाकडून नाणारमध्ये जमीन खरेदी : नीलेश राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 15:34 IST

राजापूर तालुक्यातील नाणार येथील नियोजित रिफायनरी प्रकल्पासाठी एक कंपनी जागा खरेदी करत असून, ही कंपनी शिवसेनेतील एका बड्या नेत्याच्या भावाची असल्याचा गौप्यस्फोट माजी खासदार आणि भाजपचे प्रदेश सचिव नीलेश राणे यांनी एका पत्रकार परिषदेत केला.

ठळक मुद्देशिवसेनेतील बड्या नेत्याच्या भावाकडून नाणारमध्ये जमीन खरेदी : नीलेश राणे यांचा आरोप प्रकल्प परिसरातील जमिनी शिवसैनिकांनीच परप्रांतीयांच्या घशात घातल्या

रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील नाणार येथील नियोजित रिफायनरी प्रकल्पासाठी एक कंपनी जागा खरेदी करत असून, ही कंपनी शिवसेनेतील एका बड्या नेत्याच्या भावाची असल्याचा गौप्यस्फोट माजी खासदार आणि भाजपचे प्रदेश सचिव नीलेश राणे यांनी एका पत्रकार परिषदेत केला.

नाणार प्रकल्पाचा अध्यादेश रद्द झाला, नाणार विषय संपला असे सांगून शिवसेनेचे मंत्री, खासदार, आमदार स्थानिकांची दिशाभूल करीत आहेत. मात्र रिफायनरी कंपनीकडून मुख्यमंत्री कार्यालयाबरोबर प्रकल्पाबाबत सकारात्मक चर्चा सुरु असून, हा प्रकल्प रायगड नाही तर नाणारमध्येच होणार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. शिवसैनिकच येथील जागा परप्रांतीयांच्या घशात घालत असल्याचा आरोपही त्यांनी केला.राणे यांनी रत्नागिरीमध्ये ही पत्रकार परिषद घेतली. शिवसेनेने रिफायनरी प्रकल्पाला सुरूवातीला विरोध केला. परंतु आता त्यांच्याच आशीवार्दाने नाणारमध्ये परप्रांतीयांनी जमिनी खरेदी केल्या आहेत. आता शिवसेनाच रिफायनरी प्रकल्प आणत असल्याचे राणे यांनी सांगितले. रिफायनरीला जागा मिळवून देण्यासाठी एक कंपनी पाटर्नरशिपमध्ये जागा खरेदी करत आहे. त्याचे संचालक हे शिवसेनेच्या बड्या नेत्याचे भाऊ आहेत.

या कंपनीतर्फे १४०० एकर जमिनीची खरेदी करण्यात आली आहे. खरेदीचे व्यवहार विविध १७ लोकांशी करण्यात आले आहेत. लॉकडाऊनमुळे सध्या त्यांची कार्यालये बंद आहेत. मात्र या बड्या नेत्याचे नातेवाईकच नाणार जमिनीच्या व्यवहारात आहेत. प्रकल्प बंद करण्याचे नाटक मात्र सुरु आहे.

सुरुवातीला विरोध दाखवायचा, लोकांना भडकावायचे आणि नंतर प्रकल्प आणायचा हा शिवसेनेचा जुना उद्योग आहे. रिफायनरीसाठीच्या जमिनी परप्रांतियांना देणाऱ्यांमध्ये शिवसेनेचेच पदाधिकारी सहभागी आहेत. या प्रकल्पाला लागणारी ८ हजार हेक्टर जमीन शिवसैनिकांनी परप्रांतीयांच्या घशात घातल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.एका शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने पैसे कमवण्यासाठी उपळे गावातील जमिनीला स्वत:चे कुळ म्हणून लावून घेण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे. याबाबत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. स्थानिक शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमुळे परप्रांतीय जमीन खरेदीसाठी रत्नागिरी जिल्ह्यात आले आहेत.

या व्यवहारात स्थानिक शेतकरी मात्र उपेक्षित राहिले आहेत. रिफायनरी प्रकल्पाला आणखी दोन हजार हेक्टर जागेची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. आता प्रकल्पाचा फक्त करार करणे बाकी आहे, असेही ते म्हणाले.राजापूर तालुक्यातील गोवळ, बारसू, सोलगाव एमआयडीसीसाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचे पॉवर आॅफ एटर्नी म्हणून बंद सातबाऱ्याच्या जमिनींची विक्री केली आहे. संबंधित जमीन विक्री करण्यासाठी परवानगी नसते.

या विषयासंदर्भात प्रांताकडे तक्रार दाखल करण्यात आली असून त्याबाबत सुनावणी सुरु आहे. प्रांतांकडे तक्रार केल्यानंतरही जमीन खरेदी-विक्रीची कार्यवाही सुरु होती. जमीन व्यवहारातील मोठा गैरप्रकार असल्याचा आरोप नीलेश राणे यांनी केला आहे.नीलेश राणे यांचे आव्हानप्रकल्पाला कडाडून विरोध केल्यामुळे शिवसेना सरळ मार्गाने हा प्रकल्प आणू शकत नाही. प्रकल्प आणण्यासाठी त्यामुळे वेगळा फंडा राबविण्यात येत आहे. जे एन्रॉनचे झाले तेच रिफायनरीचे होईल, असेही राणे यांनी सांगून उच्चस्तरावर सुरु असलेल्या बैठकांवरून निदर्शनास येत असल्याचे सांगितले. याबाबतची माहिती गल्लीतील शिवसेनेच्या खासदारांना कशी समजणार? प्रकल्पाचा विषय संपला असे भासवणाऱ्यांनी मुख्यमंत्री कार्यालयाबरोबर जी चर्चा सुरु आहे ते खोटे ठरवून दाखवावे, असे आव्हान नीलेश राणे यांनी यावेळी दिले.

टॅग्स :Nilesh Raneनिलेश राणे Ratnagiriरत्नागिरी