शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
3
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
4
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
5
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
6
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
7
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
8
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
9
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
10
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
11
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
12
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
13
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
14
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
15
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
16
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
17
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
18
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
19
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
20
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा

कांदळवन क्षेत्र नोंदीचा अहवाल सादर

By admin | Updated: March 18, 2015 23:59 IST

गुहागर तालुका : लवकरच होणार सातबारा उताऱ्यावर नोंद

गुहागर : गुहागर तालुक्यात १४ गावांमधील १४८ हेक्टर कांदळवन क्षेत्र संरक्षित असून याची शासकीय सातबाऱ्यावर नोंद करण्यासाठी अधिसूचनेसाठीचा अंतिम अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला आहे.याबाबत प्रांताधिकारी रवींद्र हजारे यांनी गुहागरमधील कांदळवन क्षेत्राच्या भूमी अभिलेख खात्याच्या अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. यामध्ये सातबाऱ्यावरील प्रत्यक्ष क्षेत्र व त्यामधील कांदळवन क्षेत्र त्याची दिशा अशा अनेक बाबींबाबत राहिलेल्या त्रूटी दूर करण्याचे काम गेली अनेक दिवस चालू होते.महसूल खात्याकडून अंतिम अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे अंतिम अधिसूचनेसाठी पाठवण्यात आला आहे. यामध्ये शासनाच्या ताब्यात असलेल्या हद्दीमधील १४८ हेक्टर क्षेत्र प्रत्र्यक्ष सातबाऱ्यावरती नोंद करुन वनखात्याच्या ताब्यात दिले जाणार आहे. यापूर्वी राहिलेल्या त्रुटी दूर करुन या अहवालाच्या आधारे जिल्हाधिकाऱ्यांकडून अंतिम अधिसूचना लवकरच प्रसिद्ध होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने संरक्षण दिलेल्या कांदळवन क्षेत्राचे सातबाऱ्यावरती नोंद करुन वनविभागाकडे याचा ताबा देण्यासाठीची ही प्रक्रिया असून यावरती गेली वर्षभर काम सुरु आहे. महाराष्ट्र रिमोंट सेन्सीज अ‍ॅप्लीकेशन सेंटर नागपूर यांच्याकडून सॅटेलाईटद्वारे घेतलेला नकाशा व एरीया स्टेटमेंट भूमी अभिलेख खात्याकडे देण्यात आले होते. घरटवाडी, तवसाळ व अन्य काही गावांचे कांदळवन क्षेत्र तब्बल काही शेकड्यांनी चूकभुलीने वाढवल्याने गुहागर तालुक्यात १७०० हेक्टर कांदळवन क्षेत्राची चुकीची नोंद करण्यात आली होती. यामध्ये सुधारणा करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर याबाबत कमी जास्त पत्रके करुन या क्षेत्राला नवीन सर्व्हे नंबर व गट नंबर देण्याची कार्यवाही केली जाणार आहे.तहसीलदार वैशाली पाटील यांनी सांगितले की, १४ गावांमधील आतील १४८ हेक्टर क्षेत्र आहे. याबाबत सध्या कार्यवाही चालू आहे. तसेच शासनाच्या ताब्यात नसलेली बाहेरील १९ गावांमधील १०३ हेक्टर कांदळवन क्षेत्र आहे. याबाबत अद्याप कोणतेही शासाकडून निर्देश आलेले नाहीत. भविष्यात हे क्षेत्रही शासन ताब्यात घेईल अशी शक्यता आहे. जिल्हाधिकारी यांच्याकडून अंतिम अधिसूचना जाहीर झाल्यानंतर काही हरकती असल्यास त्या स्वीकारुन त्यावर विचार होणार आहे. (प्रतिनिधी)समुद्राचे अतिक्रमण थोपवण्याबरोबरच माशांना प्रजननासाठी सुरक्षित ठिकाण म्हणून कांदळवन क्षेत्र खूप महत्त्वाचे आहे. किनाऱ्याजवळच प्रजनन झाले तर पुढच्या काळात मासळी चांगल्या प्रमाणात मिळते. यासाठी सर्वोच्च न्यायालयाने याचे गांभीर्य लक्षात घेवून याबाबतचे आदेश शासनस्तरावर दिले आहेत.