शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
3
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
4
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
5
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
6
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
7
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
8
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
9
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
10
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
11
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
12
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
13
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
14
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
15
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
16
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
17
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
18
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
19
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
20
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...

लसीकरणाचा टक्का वाढतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:30 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या ५६ टक्के झाली आहे. तर दुसरा डोस ८३१८ जणांनी घेतला आहे. ...

रत्नागिरी : जिल्ह्यात पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या ५६ टक्के झाली आहे. तर दुसरा डोस ८३१८ जणांनी घेतला आहे. जिल्ह्याला ज्या प्रमाणात डोस उपलब्ध झाले आहेत, त्या तुलनेने अजूनही लसीकरणासाठी लोक पुढे येत नसल्याने लसीकरणाच्या टक्केवारीत हळूहळू वाढ होत आहे.

१६ जानेवारीपासून जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेतील डाॅक्टर्स तसेच कर्मचारी यांना लसीकरण सुरू करण्यात आले आहे. त्यानंतर पहिल्या फळीतील कोरोना योद्धे महसूल आणि पोलीस कर्मचारी यांना लस देण्यात आली आहे. १ मार्चपासून ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक तसेच कोमाॅर्बिड (सहव्याधी) असलेल्या व्यक्तींनाही लसीकरण सुरू करण्यात आले आहे. सध्या जिल्ह्यात जिल्हा शासकीय रुग्णालये, तीन उपजिल्हा रुग्णालये, सर्व ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच सात खासगी रुग्णालये यांसह एकूण ६१ केंद्रांवर लसीकरण होत आहे.

आतापर्यंत जिल्ह्याला कोरोना लसीचे ८५,१३० डोस प्राप्त झाले असून त्यापैकी ५९,४०४ डोसचे वाटप सर्व तालुक्यांतील केंद्रांना करण्यात आले आहे. तर २५,६४० डोस अजूनही शिल्लक आहेत.

आरोग्य विभागाकडून लसीकरण केंद्रांची संख्या वाढविण्यात आली आहे. आता ऑनलाईन नोंदणी करण्याबरोबरच नागरिकांना प्रत्यक्ष केंद्रावर जावून नोंदणी करून लस घेता येते. मात्र, अजूनही काही शासकीय कार्यालयांमधील कर्मचारी लस घेण्यात मागे राहत असल्याचे दिसते. तसेच ४५ ते ५९ या वयोगटातील सहव्याधी असलेल्या व्यक्तींकडूनही कोरोना लस घेण्यासाठी अल्प प्रतिसाद लाभत आहे. त्या तुलनेने ज्येष्ठ नागरिकांचा टक्का वाढलेला दिसतो.

१८ मार्चच्या अहवालानुसार जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेतील कर्मचारी तसेच पहिल्या फळीतील कोरोनाशी लढा देणारे महसूल, पोलीस तसेच शासकीय कर्मचारी यापैकी २०,०७२ व्यक्तींचे लसीकरण झाले आहे. तर ज्येष्ठ नागरिकांपैकी ९,०२३ जणांनी लसीकरण केले आहे. सहव्याधी असलेले केवळ १९२० लोक लसीकरणासाठी पुढे आले आहेत.

आतापर्यंत एकूण ३१०४२ जणांनी पहिला डोस घेतला आहे. तर दुसरा डोस ८३१८ जणांनी पूर्ण केला आहे. जिल्ह्याला ज्या प्रमाणात डोस उपलब्ध झाले आहेत, त्या तुलनेने अजूनही लसीकरणासाठी पुढे येणाऱ्यांची संख्या वाढणे गरजेचे आहे. सध्या कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला असल्याने लोकांनी लसीकरणासाठी पुढे यावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.