शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

अन्य आजारांचे रुग्ण भीतीने घरातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:40 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : जगभरात कोरोनाने हाहाकार उडवून दिला आहे. सर्वत्र कोरोनाची दहशत निर्माण झाली आहे. सध्या ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : जगभरात कोरोनाने हाहाकार उडवून दिला आहे. सर्वत्र कोरोनाची दहशत निर्माण झाली आहे. सध्या जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. सर्वच ठिकाणी आता कोरोनाची तपासणी अनिवार्य करण्यात आल्याने आता इतर रुग्ण बाहेर उपचारासाठी जाण्यासाठीही घाबरू लागले आहेत. त्यामुळे सध्या रत्नागिरीतील खासगी रुग्णवाहिकांना गेल्या दोन महिन्यांत या रुग्णांना हलविण्यासाठी येणारे काॅल पूर्णपणे थांबले आहेत. मात्र, सध्या कोरोना रुग्णांना मुंबई, पुणे, कोल्हापूर आदी शहरांमध्ये हलविण्यासाठी दिवसरात्र भटकंती करावी लागत आहे.

सध्या सर्वत्रच कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढू लागले आहेत. पहिल्या लाटेतील कोरोनाच्या संसर्गापेक्षाही या दुसऱ्या लाटेचा संसर्ग अधिक आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या दिवसाला अगदी ८०० पर्यंत रुग्णसंख्या पोहोचू लागली आहे. संसर्ग रोखण्यासाठी शासनाने चाचण्या वाढविण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार आता सर्व शासकीय कार्यालये, खासगी कार्यालये, विविध आस्थापना, दुकाने यामधील कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचण्या अनिवार्य करण्यात आल्या आहेत. चाचण्या वाढल्याने कोरोना रुग्णांची संख्या अधिक वाढल्याचे दिसत आहे.

सध्या कुठल्याही रुग्णालयात अन्य आजाराचा नवीन रुग्ण गेल्यास उपचार करण्याआधी त्या रुग्णाची आरटीपीसीआर किंवा रॅपिड ॲंटिजेन चाचणी करणे सर्वच रुग्णालयांनी बंधनकारक केले आहे. त्यामुळे आता रुग्णांना दुसऱ्या मोठ्या शहरांत हलवायचे झाल्यास त्याची कोरोना चाचणी करूनच न्यावे लागते. त्यामुळे आता हृदयविकार, मधुमेह, कॅन्सर यासारख्या आजाराबरोबरच विविध कारणांनी अस्थिभंग झालेल्या रुग्णांना दुसऱ्या शहरात उपचारासाठी नेताना कोरोना चाचणी करावी लागत असल्याने आपण पाॅझिटिव्ह आलो तर किंवा दुसऱ्या रुग्णालयात गेल्यावर कोरोनाबाधित झालो तर? ही भीती रुग्णांच्या मनात वाटत असल्याची शक्यता खासगी रुग्णवाहिकाचालकांकडून व्यक्त होत आहे. सध्या अन्य आजारांचे रुग्ण नसले तरी कोरोनाच्या रुग्णांना इतरत्र हलविण्यासाठी मात्र या रुग्णचालकांना दिवसरात्र खेपा माराव्या लागत आहेत.

अन्य रुग्ण घरातच...

सध्या हृदयविकार, कॅन्सर, अपघातात गंभीर जखमी आदी अन्य रुग्ण दुसऱ्या शहरातील मोठ्या रुग्णालयात जाण्याचे प्रमाण अल्प झाले आहे. गेल्या महिना - दीड महिन्यांपासून हे रुग्ण नेण्याची वेळ आली नाही. मात्र, कोरोना रुग्णांना दुसऱ्या ठिकाणी हलविण्यासाठी मात्र खासगी रुग्णवाहिकांवर प्रचंड ताण आल्याचे राजा ॲम्ब्युलन्सचे तन्वीर जमादार यांनी सांगितले.

कोरोना चाचणीची भीती

कुठल्याही रुग्णालयात गेल्यावर आता रुग्णाची कोविड चाचणी आधी करतात आणि नंतर उपचार करतात. त्यामुळे बहुधा अन्य रुग्णांना भीती वाटत असावी. कारण, गेल्या दोन महिन्यांपासून काेरोनाव्यतिरिक्त दुसऱ्या रुग्णाला रत्नागिरीबाहेर हलविण्यासाठी एकही काॅल आला नसल्याचे स्वामी ॲम्ब्युलन्सचे योगेश उतेकर यांनी सांगितले.

सध्या कोरोनाचेच रुग्ण

सध्या कोरोनाचेच रुग्ण कोल्हापूर, पुणे, मुंबई येथे हलवावे लागत आहेत. तसेच जिल्ह्याच्या इतर तालुक्यांतून रत्नागिरीत आणण्यासाठी आता खासगी रुग्णवाहिकांना सतत पळावे लागत आहे. त्यामुळे दिवसांतून किती खेपा माराव्या लागतात, ते सांगता येत नाही. यासाठी सतत फोन वाजत असल्याचे शोभा ॲम्ब्युलन्सचे शुभम कीर यांनी सांगितले.