शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: विजयी घोषणेपूर्वीच सुनेत्रा पवारांचं सर्व कार्यकर्त्यांना भावूक आवाहन, म्हणाल्या...
2
आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
3
Thalapathy Vijay Net Worth: अभिनेता ते राजकारणी; ६०० कोटींपेक्षा अधिकचं साम्राज्य, कशी आहे थलापति विजय यांची लक्झरी लाईफ 
4
लग्नानंतर सासरची पायरी चढण्याआधीच मोडला संसार! २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचा असा झाला भांडाफोड
5
दोन राज्यांतून भाजपसाठी वाईट बातमी; गेल्या वेळी शून्य, आता फक्त ५ जागांवर आघाडी
6
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला 'थलापती' का म्हणतात? जाणून घ्या ३२ वर्षे जुनी कहाणी!
7
IPL 2026: RCBला मोठा धक्का! तुफान घोडदौड सुरू असताना स्टार खेळाडू संघ सोडून घरी परतला
8
भीषण अपघात! प्रभू श्रीरामाचं दर्शन घेऊन परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; ६ जणांचा मृत्यू
9
तामिळनाडूमध्ये 'थलापती' विजय बहुमतापासून दूर; एआयडीएमके जाण्यापूर्वीच काँग्रेसने पाठिंब्याचा हात पुढे केला...
10
युद्ध थांबणार की ठिणगी पडणार? इराणचा पाकिस्तानमार्गे ट्रम्प यांना निरोप; अटी वाचून व्हाल थक्क!
11
Video - बापरे! चावीच हरवली... कर्नाटकात हातोड्याने तोडावं लागलं EVM स्ट्रॉन्ग रूमचं कुलूप
12
रितेश देशमुखचा वेडा चाहता! रत्नागिरीच्या पठ्ठ्याने 'राजा शिवाजी' सिनेमा पाहण्यासाठी बुक केलं अख्खं थिएटर
13
अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: भीती, नैराश्य, संकटांपासून मुक्तीसाठी पठण करा 'गणेश रक्षा मंत्र'
14
केरळमध्ये मुख्यमंत्री कोण? निकाल नाही आले तोवर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये लॉबिंग सुरु झाली, १० वर्षांनी...
15
ममता बॅनर्जी यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणारे भाजपचे '५' नायक; या नेत्यांनी शांतपणे बंगालची समीकरण बदलली
16
IPL 2026: 'टेबल टॉपर' पंजाब किंग्जचा सलग दुसरा पराभव, श्रेयस अय्यर 'या' गोष्टीवर संतापला...
17
मोफत ८ ग्रॅम सोने अन् दरमहा २५०० रूपये...; कोणती ५ आश्वासने ज्यानं अभिनेता विजयची जादू चालली?
18
"हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे, विजयी जल्लोष नको, गुलालही उधळू नका" सुनेत्रा पवार भावूक!
19
इकडे 'विजय'चा राजकीय उदय, तिकडे 'सन टीव्ही'च्या स्टॉकला उतरती कळा; काय आहे कनेक्शन?
20
भाजपाचा विजय निश्चित होताच शुभेंदू अधिकारींचं मोठं विधान, विजयाचं गुपित उघड करत म्हणाले....
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना वेशीबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:32 IST

दापोली : सुमारे दीड वर्षापासून संपूर्ण जगात कोरोनाचा धुमाकूळ सुरू आहे. अनेकजणांना कोरोनाने आपला बळी बनवला आहे. अनेक ठिकाणी ...

दापोली : सुमारे दीड वर्षापासून संपूर्ण जगात कोरोनाचा धुमाकूळ सुरू आहे. अनेकजणांना कोरोनाने आपला बळी बनवला आहे. अनेक ठिकाणी ऑक्सिजनअभावी रुग्णांचा मृत्यू होत आहे. असे असताना तालुक्यातील सडवली गावाने एकी दाखवत आतापर्यंत सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळल्याने कोरोनाला वेशीबाहेर ठेवले आहे.

पाण्यासाठी वणवण

साखरपा : संगमेश्वर तालुक्यात पाणीटंचाईची तीव्रता अधिकच वाढली आहे. डोंगराळ भागात वसलेल्या वाड्यांना पाण्याचे दुर्भीक्ष्य मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरपासून काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी कित्येक मैलांची पायपीट करावी लागत आहे. आता टंचाई अधिकच वाढली आहे.

दुकानदार धास्तावले

रत्नागिरी : शहरात गेल्या काही दिवसांपासून सकाळी ११ नंतरही दुकान सुरू ठेवणाऱ्या दुकानदारांवर कडक कारवाई करून दहा हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे. काही दुकानदार उशिरापर्यंत दुकान सुरू ठेवत असल्याने ग्राहकांची गर्दी होत असते. त्यामुळे प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारल्याने अनेक दुकानदार धास्तावले आहेत.

पावसाची शक्यता

रत्नागिरी : कोकणासह राज्यात आणखी काही दिवस अवकाळी पावसाची स्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यानुसार कोकणासह गोवा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.

रक्तदान शिबिर

आरवली : कोरोना काळात रक्ताचा तुटवडा जाणवू नये यादृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने मंगळवार दिनांक ११ मे रोजी संगमेश्वर तालुक्यातील तुरळ येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. येथील ग्रामपंचायत कार्यालयात सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत हे शिबिर होणार आहे.

ऑक्सिजनला मागणी

राजापूर : सध्या कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे. रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाणही लक्षणीय आहे. त्यामुळे ऑक्सिजनला मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे. मात्र खासगी तसेच शासकीय रुग्णालयातही ऑक्सिजन बेड पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे.

एस.टी. फेऱ्यांमध्ये कपात

गुहागर : येथील आगारातून पूर्वी दिवसाला अधिक फेऱ्या सुरू होत्या. मात्र आता कोरोना काळात या आगारातून जिल्ह्यात दोन ठिकाणी केवळ आठच फेऱ्या सुरू आहेत. १५ एप्रिलपासून कडक लॉकडाऊन असल्याने नागरिक बाहेर पडेनासे झाले आहेत. त्यामुळे एस.टी.ला भारमान नसल्याने आठच फेऱ्या सुरू ठेवण्यात आल्या आहेत.