शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
4
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
5
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
6
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
7
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
8
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
9
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
10
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
11
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
12
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
13
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
14
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
15
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
16
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
17
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
18
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
19
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
20
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
Daily Top 2Weekly Top 5

गणेशाेत्सवासाठी येणाऱ्यांची जिल्हा प्रवेशद्वारावर केवळ नाेंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:07 IST

राजापूर : गणेशाेत्सवासाठी गावी येणाऱ्या गणेशभक्तांनी दाेन डाेस घेतले असतील तर त्यांना चाचणीशिवाय प्रवेश देण्यात येणार आहे. अन्यथा ...

राजापूर : गणेशाेत्सवासाठी गावी येणाऱ्या गणेशभक्तांनी दाेन डाेस घेतले असतील तर त्यांना चाचणीशिवाय प्रवेश देण्यात येणार आहे. अन्यथा आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक केली आहे. याबाबत आमदार राजन साळवी यांनी जिल्हाधिकारी डाॅ. बी. एन. पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी आरटीपीसीआर चाचणी ऐवजी ॲंटिजन चाचणी करून प्रवेश देण्याची मागणी केली. जिल्ह्यामध्ये प्रवेश करणाऱ्या ठिकाणी फक्त नोंद करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डाॅ. पाटील यांनी सांगितले.

रत्नागिरी जिल्हा प्रशासनाकडून मुंबईतून येणाऱ्या चाकरमन्यांना आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक केले आहे. ज्या प्रवाशांचे दोन डोस पूर्ण झाले असतील त्यांना चाचणीशिवाय जिल्ह्यात प्रवेश दिला जाईल, असे सांगितले आहे. याबाबत आमदार राजन साळवी यांनी जिल्हाधिकारी डाॅ. पाटील यांना निवेदन देऊन चर्चा केली. या चर्चेदरम्यान आरटीपीसीआर अहवाल येणास दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागत आहे. त्यामुळे जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांची ॲंटिजन चाचणी करून प्रवेश देण्यात यावा, अशी मागणी केली तसेच कोविडशिल्ड या लसीचा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना दुसऱ्या डोससाठी ८४ दिवस थांबावे लागत आहे. सद्य:स्थिती पाहता दुसरा डोस लगेच उपलब्ध होत नाहीत. कोविडशिल्ड पहिला डोस झालेल्या प्रवाशांची जिल्हा प्रवेशाच्या ठिकाणी ॲँटिजन चाचणी करून प्रवेश देण्यात यावा, अशीही मागणी आमदार साळवी यांनी केली हाेती.

जिल्हाधिकाऱ्यांनी आमदार राजन साळवी यांनी या चर्चेनंतर जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांची आरटीपीसीआर चाचणी झाली असेल तर किंवा कोविडशिल्ड किंवा कोव्हॅक्सीन पहिला डोस झाला असेल तर त्या प्रवाशांची जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या ठिकाणी फक्त नोंद करणात येईल, असे सांगितले. त्यांच्या गावाच्या ग्रामकृती दलाकडून आवश्यकतेनुसार तपासणी केली जाईल, असे सांगितले. या निर्णयामुळे गावी येणाऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.