शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

एकात्मिक ऊर्जा विकास योजनेंतर्गत कामांची शंभर टक्के पूर्तता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:24 IST

रत्नागिरी : एकात्मिक ऊर्जा विकास योजनेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यासाठी ३६ कोटी ७९ लाखांचा कृती ...

रत्नागिरी : एकात्मिक ऊर्जा विकास योजनेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यासाठी ३६ कोटी ७९ लाखांचा कृती आराखडा राबविण्यात येऊन शंभर टक्के कामांची पूर्तता झाली आहे. शहरातील विद्युत वितरण व्यवस्थेचे बळकटीकरण करण्यासाठी या योजनेंतर्गत राजापूर, रत्नागिरी, चिपळूण, खेड, दापोली शहरांची निवड करण्यात आली होती.

एकात्मिक ऊर्जा विकास योजनेंतर्गत रत्नागिरी शहरासाठी ६ कोटी ३९ लाख, राजापूरसाठी ३ कोटी २२ लाख, चिपळूण शहरासाठी ७ कोटी ९ लाख, खेडसाठी १० लाख ५६ हजार, दापोली शहरात ७ कोटी ५ लाखांच्या मंजूर निधीतून विविध कामे करण्यात आली आहेत.

या योजनेंतर्गत एकूण ३३ केव्ही वाहिनी नऊ किलोमीटर, लघुदाब वाहिनी आठ किलोमीटर तर भूमिगत वाहिनीचे ५१.५ किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. रत्नागिरी झाडगाव उपकेंद्रात अतिरिक्त पाच एमव्हीए रोहित्र बसविण्यात आले आहे. राजापूर १ उपकेंद्रामध्ये रोहित्र क्षमता वाढीसाठी पाचऐवजी दहा एमव्हीएचे रोहित्र बसवून ते सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यात एकूण ७९ नवीन ट्रान्सफार्मर बसविण्यात आले आहेत. त्यामध्ये १०० केव्हीच्या ६३ ट्रान्सफार्मरचा समावेश आहे. ११९ ट्रान्सफार्मरची क्षमता वाढविण्यात आली आहे. गर्दीच्या तसेच दाटीवाटीच्या वस्ती ठिकाणी स्पार्किंग किंवा अन्य अपघात होऊ नयेत, यासाठी खबरदारी म्हणून एअर बंच केबल बसविण्यात आली आहे.

--------------------------

लघुदाबाचे ३६९ तर उच्चदाब वाहिनीचे २१२ वीजखांब बदलण्यात आले आहेत. याशिवाय उच्चदाब वाहिनीच्या १०० खांबांवर व लघुदाब वाहिनीच्या १६१ खांबांवर गार्डीन बसविण्यात आले आहेत. १५३ आयस्यूलेटर बदलण्यात आले आहेत.

---------------------------

चिपळूण शहरात एकूण २२ रोहित्र बसविण्यात आली असून, त्यामध्ये १०० केव्हीची १७ तर २०० केव्हीच्या ५ रोहित्रांचा समावेश आहे. राजापूरमध्ये १०० केव्हीची दहा रोहित्र बसविण्यात आली आहेत. खेडमध्ये १०० केव्हीची ३ व दोनशे केव्हीची २ रोहित्र तर दापोलीमध्ये शंभर केव्हीची २३ व २०० केव्हीची दहा रोहित्र बसवली आहेत. जिल्ह्यातील एकूण ८३ रोहित्रांची क्षमता वाढविण्यात आली असून, त्यामध्ये रत्नागिरीत ११, चिपळुणात २७, राजापूर ३, खेड १४, दापोलीतील २८ रोहित्रांची क्षमता वाढविण्यात आली आहे. जिल्ह्यात भूमिगत वाहिन्यांतर्गत ५१.५ किलोमीटरपर्यंत उच्चदाब वाहिनी बसविण्यात आली आहे. खेड, राजापूरमध्ये भूमिगत वाहिनींची कामे पूर्ण करण्यात आली आहेत.

-------------------------

एकात्मिक ऊर्जा विकास योजनेंतर्गत विविध कामांची पूर्तता करण्यात आली आहे. विजेची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी वाढवलेली ट्रान्स्फार्मरची क्षमता फायदेशीर ठरत आहे. लघुदाब, उच्चदाब तसेच भूमिगत वाहिन्यांमुळे वीज खंडित होण्याचे प्रमाण कमी झाले असून, ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा उपलब्ध होत आहे. शिवाय कमी, अपुऱ्या दाबाने हाेणाऱ्या वीज पुरवठ्याच्या तक्रारीही कमी झाल्या आहेत.

- देवेंद्र सायनेकर, मुख्य अभियंता, कोकण परिमंडळ.