शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

एकात्मिक ऊर्जा विकास योजनेंतर्गत कामांची शंभर टक्के पूर्तता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:24 IST

रत्नागिरी : एकात्मिक ऊर्जा विकास योजनेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यासाठी ३६ कोटी ७९ लाखांचा कृती ...

रत्नागिरी : एकात्मिक ऊर्जा विकास योजनेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यासाठी ३६ कोटी ७९ लाखांचा कृती आराखडा राबविण्यात येऊन शंभर टक्के कामांची पूर्तता झाली आहे. शहरातील विद्युत वितरण व्यवस्थेचे बळकटीकरण करण्यासाठी या योजनेंतर्गत राजापूर, रत्नागिरी, चिपळूण, खेड, दापोली शहरांची निवड करण्यात आली होती.

एकात्मिक ऊर्जा विकास योजनेंतर्गत रत्नागिरी शहरासाठी ६ कोटी ३९ लाख, राजापूरसाठी ३ कोटी २२ लाख, चिपळूण शहरासाठी ७ कोटी ९ लाख, खेडसाठी १० लाख ५६ हजार, दापोली शहरात ७ कोटी ५ लाखांच्या मंजूर निधीतून विविध कामे करण्यात आली आहेत.

या योजनेंतर्गत एकूण ३३ केव्ही वाहिनी नऊ किलोमीटर, लघुदाब वाहिनी आठ किलोमीटर तर भूमिगत वाहिनीचे ५१.५ किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. रत्नागिरी झाडगाव उपकेंद्रात अतिरिक्त पाच एमव्हीए रोहित्र बसविण्यात आले आहे. राजापूर १ उपकेंद्रामध्ये रोहित्र क्षमता वाढीसाठी पाचऐवजी दहा एमव्हीएचे रोहित्र बसवून ते सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यात एकूण ७९ नवीन ट्रान्सफार्मर बसविण्यात आले आहेत. त्यामध्ये १०० केव्हीच्या ६३ ट्रान्सफार्मरचा समावेश आहे. ११९ ट्रान्सफार्मरची क्षमता वाढविण्यात आली आहे. गर्दीच्या तसेच दाटीवाटीच्या वस्ती ठिकाणी स्पार्किंग किंवा अन्य अपघात होऊ नयेत, यासाठी खबरदारी म्हणून एअर बंच केबल बसविण्यात आली आहे.

--------------------------

लघुदाबाचे ३६९ तर उच्चदाब वाहिनीचे २१२ वीजखांब बदलण्यात आले आहेत. याशिवाय उच्चदाब वाहिनीच्या १०० खांबांवर व लघुदाब वाहिनीच्या १६१ खांबांवर गार्डीन बसविण्यात आले आहेत. १५३ आयस्यूलेटर बदलण्यात आले आहेत.

---------------------------

चिपळूण शहरात एकूण २२ रोहित्र बसविण्यात आली असून, त्यामध्ये १०० केव्हीची १७ तर २०० केव्हीच्या ५ रोहित्रांचा समावेश आहे. राजापूरमध्ये १०० केव्हीची दहा रोहित्र बसविण्यात आली आहेत. खेडमध्ये १०० केव्हीची ३ व दोनशे केव्हीची २ रोहित्र तर दापोलीमध्ये शंभर केव्हीची २३ व २०० केव्हीची दहा रोहित्र बसवली आहेत. जिल्ह्यातील एकूण ८३ रोहित्रांची क्षमता वाढविण्यात आली असून, त्यामध्ये रत्नागिरीत ११, चिपळुणात २७, राजापूर ३, खेड १४, दापोलीतील २८ रोहित्रांची क्षमता वाढविण्यात आली आहे. जिल्ह्यात भूमिगत वाहिन्यांतर्गत ५१.५ किलोमीटरपर्यंत उच्चदाब वाहिनी बसविण्यात आली आहे. खेड, राजापूरमध्ये भूमिगत वाहिनींची कामे पूर्ण करण्यात आली आहेत.

-------------------------

एकात्मिक ऊर्जा विकास योजनेंतर्गत विविध कामांची पूर्तता करण्यात आली आहे. विजेची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी वाढवलेली ट्रान्स्फार्मरची क्षमता फायदेशीर ठरत आहे. लघुदाब, उच्चदाब तसेच भूमिगत वाहिन्यांमुळे वीज खंडित होण्याचे प्रमाण कमी झाले असून, ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा उपलब्ध होत आहे. शिवाय कमी, अपुऱ्या दाबाने हाेणाऱ्या वीज पुरवठ्याच्या तक्रारीही कमी झाल्या आहेत.

- देवेंद्र सायनेकर, मुख्य अभियंता, कोकण परिमंडळ.