शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

लोकांच्या सहकार्याची आवश्यकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:33 IST

जिल्ह्यातील अनेक अंगणवाड्यांना स्वत:च्या मालकीच्या इमारती नाहीत. त्यामुळे अनेक अंगणवाड्या शाळांच्या एखाद्या वर्गखोलीमध्ये तर काही अंगणवाड्या समाजमंदिर, सार्वजनिक इमारत ...

जिल्ह्यातील अनेक अंगणवाड्यांना स्वत:च्या मालकीच्या इमारती नाहीत. त्यामुळे अनेक अंगणवाड्या शाळांच्या एखाद्या वर्गखोलीमध्ये तर काही अंगणवाड्या समाजमंदिर, सार्वजनिक इमारत अशांचा आधार घेत आहेत. या अंगणवाड्यांच्या इमारतींसाठी शासन कोट्यवधी रुपयांचा निधी देण्यास तयार आहे. मात्र, हा निधी देऊन करणार काय, कारण निधी दिला तरी अंगणवाड्यांसाठी इमारती कुठे बांधणार? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

ग्रामीण भागामध्ये अंगणवाड्यांच्या इमारतींसाठी जागा बक्षीसपत्राने एखाद्या जागा मालकाने देणे आवश्यक आहे. मात्र, आज जागा देण्यास कोणीही तयार होत नाहीत. अंगणवाड्यांच्या इमारतींच्या बांधकामासाठी जागा द्यावी, असे अनेकदा जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाकडून आवाहनही करण्यात आले होते. तरीही कोणीही जागा मालक पुढे येत नाहीत. त्यामुळे अंगणवाड्यांना समाजमंदिरांचाच आधार घ्यावा लागणार असून हे चित्र कधी बदलणार, असा प्रश्न निर्माण होत आहे.

अंगणवाड्यांच्या इमारतींसाठी जागेची शोधमोहीम सुरू असतानाच ग्रामीण भागात आरोग्य उपकेंद्रांनाही जागा नसल्याने त्यांचीही अवस्था फार बिकट आहे. गेल्या काही वर्षांपासून आरोग्य उपकेंद्रांना जागा मिळावी, यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाने जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींना कळविले होते. सध्या ज्या तात्पुरत्या जागेत आरोग्य उपकेंद्र सुरू आहे त्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत जागा न मिळाल्यास ते उपकेंद्र जेथे जागा मिळेल त्या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये ते हलविण्यात येईल, असा पर्यायही आरोग्य विभागाने शोधला. तरीही ग्रामीण भागातील दानशूरांकडून जागा देण्यास पुढाकार घेतला जात नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात आहे. त्यामुळे भविष्यात या उपकेंद्रांना जागा मिळेल का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागातील रुग्णांवर या उपकेंद्रांमध्ये किरकोळ औषधोपचार करण्यात येत असला तरी तो रुग्णांचा जीव वाचविण्यास मोठी मदत होते. आता तर उपकेंद्रांसाठी डाॅक्टरही देण्यात आलेले आहेत. जिल्ह्यातील सर्वच आरोग्य उपकेंद्रांना डॉक्टर देण्यात येत असल्याने त्याचा फायदा रुग्णांना होणार आहे. त्यासाठी आरोग्य उपकेंद्रांना चांगल्या प्रकारची इमारत असणे आवश्यक आहे. रुग्णांना गावातच आरोग्य सेवेचा लाभ घेता येणार आहे. त्यासाठी या आरोग्य उपकेंद्रांसाठी जागा देण्यास स्थानिक दानशूरांनी पुढे येण्याची गरज आहे.

रहिम दलाल