शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
5
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
7
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
8
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
9
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
11
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
12
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
13
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
14
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
15
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
16
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
17
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
18
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
19
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
20
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे

महामार्गाच्या कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा, खासदार नारायण राणे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 13:50 IST

रत्नागिरी : महामार्गाच्या कामास उशीर झाल्याने ज्या अधिकाऱ्यांच्या कालावधीत या कामात दिरंगाई झाली आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना ...

रत्नागिरी : महामार्गाच्या कामास उशीर झाल्याने ज्या अधिकाऱ्यांच्या कालावधीत या कामात दिरंगाई झाली आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती माजी केंद्रीय मंत्री व खासदार नारायण राणे यांनी दिली. ते रत्नागिरीत येथे आढावा बैठकीसाठी आले होते.जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीची माहिती खासदार राणे यांनी दिली. राजापूर येथील अर्जुना नदीतील गाळ काढणे, मुंबई-गोवा महामार्गाचे अपूर्ण काम, चिपळूण पूरहानी तसेच वाशिष्ठी नदीतील गाळ काढणे यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली. रत्नागिरी विमानतळ सुरू होण्याबद्दल, जयगड येथील जिंदल कंपनीतील वायूगळतीमुळे विद्यार्थ्यांना झालेला त्रास अशा विषयांमध्ये काय कारवाई करण्यात आली, याची माहिती विचारताना खासदार राणे यांनी चिपळूण विमानतळाबाबत जागा संपादित केली आहे का, याचाही आढावा घेतला.

मुंबई-गोवा महामार्गाचे काम करणारे दोन ठेकेदार यापूर्वीच पळून गेले असून, त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. या कामासाठी शासनाकडून तिसरा ठेकेदार नेमला आहे. हा ठेकेदार मध्येच काम सोडून जाऊ नये, याबाबतच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. महामार्गाचे काम मे महिन्यापर्यंत पूर्ण करण्यात येईल, असे संबंधितांकडून सांगण्यात आले. मात्र, आपण हे काम एप्रिलपर्यंत पूर्ण करा, असे आदेश दिले आहेत. कारण मे महिन्यात काम झाले नाही तर पुढे पावसाळा आला आहे. आता ते काम कसे पूर्ण करणार, असे कारण पुढे करण्यात येईल. त्यासाठीच महामार्गाचे काम मे महिन्यात पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीhighwayमहामार्गNarayan Raneनारायण राणे