शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
3
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
5
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
6
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
7
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
8
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
9
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
10
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
11
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
12
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
13
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
15
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
16
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
17
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
18
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
19
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
20
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?

थंडीमुळे आंबा बागायतदारांच्या आशा पल्लवित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 2:28 PM

पावसाळा लांबल्याने हिवाळ्याचेही आगमन उशिरा झाले आहे. गेले दोन दिवस पहाटे चांगले धुके पडत असून, थंडीही पडू लागली आहे. थंडीमुळे बागायतदारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. कोकणचे अर्थकारण अवलंबून असलेल्या हापूस आंब्याला थंडीमुळे मोहोर सुरु होतो. यावर्षी पावसाळ्यामुळे एक ते दीड महिना हंगाम उशिरा सुरु होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देधुके, गारठा वाढला, अखेर पाऊस थांबलाआता प्रतीक्षा आंबा - काजू कलमे मोहोरण्याची

रत्नागिरी : पावसाळा लांबल्याने हिवाळ्याचेही आगमन उशिरा झाले आहे. गेले दोन दिवस पहाटे चांगले धुके पडत असून, थंडीही पडू लागली आहे. थंडीमुळे बागायतदारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. कोकणचे अर्थकारण अवलंबून असलेल्या हापूस आंब्याला थंडीमुळे मोहोर सुरु होतो. यावर्षी पावसाळ्यामुळे एक ते दीड महिना हंगाम उशिरा सुरु होण्याची शक्यता आहे.अद्याप जमिनीमध्ये ओलावा टिकून असल्यामुळे कलमांना पालवी येण्याचे प्रमाण वाढले आहे. ८० टक्के कलमांना सध्या पालवी आहे. पालवी जून होण्यासाठी किमान ४० ते ४५ दिवसाचा कालावधी लागतो. त्यानंतर मोहोर प्रक्रिया सुरु होते. गेले दोन दिवस थंडी सुरु झाल्यामुळे जानेवारीमध्ये मोहोर प्रक्रिया सुरु होण्याची शक्यता आहे.

जानेवारीमध्ये पारा प्रचंड खाली येतो. नीचांक हवामानामुळे आंब्याच्या मोहोरावर परिणाम होतो. बहुतांश मोहोरावर फळधारणा होत नाही. शिवाय पुनर्मोहोरदेखील होत असल्याने या हंगामात मोहोर आला तर हे दुहेरी संकट शेतकऱ्यांना झेलावे लागणार आहे. मोहोर वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना वेळोवेळी हवामानाचा अंदाज घेऊन कीटक नाशकांची फवारणी करावी लागणार आहे.आॅक्टोबर हिटमुळे जमिनीतील ओलावा नष्ट होऊन कलमांच्या मुळांना ताण देऊन मोहोर प्रक्रिया सुरु होते. मतलई वाºयामुळे हवेमध्ये गारवा निर्माण होतो, थंडीमुळे मोहोर प्रक्रिया वेगाने होते. मात्र, अद्याप थंडी फारशी नसल्याने मोहोर प्रक्रियेला वेळ लागणार आहे. सध्या २० टक्के उर्वरित कलमांना थंडीमुळे मोहोर येण्याची शक्यता आहे. परंतु पालवी सुरु झाल्यास हंगाम उशिरा सुरु होण्याची शक्यता आहे.जास्त थंडीमुळे तसेच ढगाळ हवामानामुळे थ्रीप्स, बुरशी, तुडतुडासारख्या कीटकांचा प्रभाव वाढू शकतो. गतवर्षीदेखील थ्रीप्स व तुडतुड्यामुळे बागायतदार हैराण झाले होते. यावर्षी नियंत्रण मिळविण्यासाठी दोन ते तीन आठवड्याच्या फरकाने हवामानाचा अंदाज घेत कीटकनाशकांची फवारणी करावी लागते, त्यामुळे खर्च वाढतो. सध्या बागायतदारांनी पालवीचे संरक्षण करण्यासाठी कीटकनाशक फवारणी सुरु केली आहे. 

हवामानावर अवलंबून असलेल्या आंबा पिकाचा हंगाम यावर्षी एक ते दीड महिना उशिरा होणार आहे. सध्या सर्वत्र पालवी आहे. त्यामुळे पालवी जून होऊन मोहोर येण्यास जानेवारी उजाडणार आहे. त्यामुळे हा आंबा मे महिन्यातच बाजारात येण्याची शक्यता असून, एकाचवेळी आंबा बाजारात आला तर दरावर त्याचा परिणाम होऊ शकतो. खत व्यवस्थापनापासून आंबा काढणीपर्यंत प्रचंड खर्च केला जातो, त्या तुलनेत आंब्याला दर प्राप्त होत नसल्याने शेतकरी बांधव दरवर्षी आर्थिक दुष्टचक्रात सापडत आहेत. बदलत्या हवामानामुळे पिकावर परिणाम होत असल्याने आंबा पीक खर्चिक बनले आहे.- एम. एम. गुरव, आंबा बागायतदार, रत्नागिरी

टॅग्स :MangoआंबाRatnagiriरत्नागिरीTemperatureतापमान