शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
3
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
4
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
5
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
6
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
7
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
8
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
9
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
10
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
11
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
12
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
13
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
14
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
15
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
16
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
17
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
18
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

अर्जुना कालव्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:34 IST

पाचल : अर्जुना मध्यम प्रकल्पाच्या कालव्यासाठी उत्खनन करण्यात आलेली माती जैसे थे ठेवण्यात आल्याने शेतकऱ्यांना शेती न करता आल्याने ...

पाचल : अर्जुना मध्यम प्रकल्पाच्या कालव्यासाठी उत्खनन करण्यात आलेली माती जैसे थे ठेवण्यात आल्याने शेतकऱ्यांना शेती न करता आल्याने नुकसान सहन करावे लागत आहे. या शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपोटी एकही पैसा न मिळाल्याने शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

जिल्ह्यातील जीवनदायी प्रकल्प म्हणून अर्जुना मध्यम प्रकल्पाकडे पाहिले जात आहे. या प्रकल्पाचे काम मार्गी लागले आहे. मात्र, काही वर्षापासून या प्रकल्पाचे पाइपलाइनद्वारे कालव्याचे काम सुरू आहे. पूर्वी या कालव्याचे काम ओपन कालवा पद्धतीने करण्यात येणार होते. मात्र, यामध्ये बदल करून आता कालवा हा बंदिस्त पाइपद्वारे काढण्यात येत आहे. त्यानुसार प्रकल्पाच्या डाव्या व उजव्या कालव्याचे काम सुरू आहे. पाइपलाइन टाकण्यासाठी जमीन खोदकाम सुरू आहे. काही गावांमधून हे काम सुरू आहे. कोरोनामुळे हे काम गेली दोन वर्षे संथगतीने सुरू आहे. पाइपलाइनसाठी जे खोदकाम करण्यात आले ते अद्याप तसेच अर्धवट आहे. मातीही शेजारील शेतामध्ये तशीच टाकण्यात आलेली आहे.

शेतजमिनीतील हे खोदकाम अद्याप बुजविण्यात आलेले नाही व खोदकामाची मातीही उचलण्यात आलेली नाही. परिणामी येथे शेतकरी शेती करू शकले नाहीत. ज्या ठिकाणी खोदकाम मातीने भरलेले नाही. अनेक-मोठे दगड-धोंडे जैसे थे आहेत. खोदलेले चर व्यवस्थित भरले नसल्याने त्यातील माती शेतामध्ये जाऊन भरल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांना यंदाही शेती करता आलेली नाही. बऱ्याच ठिकाणी आंबा-काजूचे तसेच कुंपणाचेही मोठे नुकसान झाले आहे. आंबा-काजू बागायतीचे मूल्यांकनही करण्यात आलेले नाही. त्यामुळे शेतकरी मोबदल्यापासून आजही वंचित आहेत. या परिसरात शेती हेच उपजीविकेचे एकमेव साधन आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई मिळावी, ही शेतकऱ्यांची आग्रही मागणी आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या या मागणीकडे वरिष्ठ आधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने शेतकऱ्यांमधून कमालीचा संताप तथा नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.