शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

ग्रंथालय मान्यते वरील बंदी उठवणार : उदय सामंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 5:45 PM

शासनाने २०१० साली ग्रंथालयांना मान्यता देण्यात येऊ नये असा निर्णय घेतला होता. तो निर्णय बदलून आता मान्यता सुरू करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले. मालगुंड येथे कवी केशवसुत स्मारक सभागृहात आयोजित अखिल भारतीय मराठी विज्ञान संमेलनाच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते.

ठळक मुद्देग्रंथालय मान्यते वरील बंदी उठवणार : उदय सामंतमालगुंड येथे अखिल भारतीय मराठी विज्ञान संमेलनाचे उद्घाटन

रत्नागिरी : शासनाने २०१० साली ग्रंथालयांना मान्यता देण्यात येऊ नये असा निर्णय घेतला होता. तो निर्णय बदलून आता मान्यता सुरू करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले. मालगुंड येथे कवी केशवसुत स्मारक सभागृहात आयोजित अखिल भारतीय मराठी विज्ञान संमेलनाच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते.मराठी विज्ञान परिषद मध्यवती व रत्नागिरी विभाग आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथे कवी केशवसुत स्मारक येथे १८ ते २० जानेवारी या कालावधीत ५४वे अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. या अधिवेशनाच्या उद्घाटनावेळी उदय सामंत बोलत होते.रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. यावेळी संमेलनाचे अध्यक्ष डॉ. हेमचंद्र प्रधान स्वागताध्यक्ष मधुमंगेश कर्णिक, कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष ज्येष्ठराज जोशी, रत्नागिरीचे नगराध्यक्ष प्रदीप साळवी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

२०१२च्या एका निर्णयाद्वारे नव्या ग्रंथालयांना मान्यता देणे बंद करण्यात आले होते. आज या केशवसुत स्मारकात होणाऱ्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने नव्या ग्रंथालयांना मान्यता देण्याचे काम सुरू करण्यात येईल, अशी घोषणा उदय सामंत यांनी यावेळी केली.कोकण हे बुद्धिवंतांची भूमी आहे, या भूमीने अनेक भारतरत्न दिले अशा या भूमीचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मला मिळाली हे माझे भाग्य मी समजतो, असे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले. तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनात विविध चर्चासत्रे आणि व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे.

दुपारच्या सत्रात उच्च शिक्षणातील संधी या विषयावर अध्यक्ष डॉ. हेमचंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेत चर्चासत्र होणार आहे. सायंकाळच्या सत्रात प्रा. रेखा सिंघल यांचे काजू आंबा फणस यांची उपयोगिता या विषयावर व्याख्यान होईल.

मधुमंगेश कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली कविता वाचन होणार आहे. त्यानंतर रविवार, १९ जानेवारी रोजी उद्योगधंदे व भविष्यातील संधी या विषयावर चर्चासत्र होईल. अखेरच्या दिवशी जयगड बंदर व कातळशिल्पे यांना भेट व अभ्यास आयोजित करण्यात आला आहे 

टॅग्स :Uday Samantउदय सामंतRatnagiriरत्नागिरी