शहरं
Join us  
Trending Stories
1
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
2
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
3
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
4
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
5
Sharmila Thackeray : "बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
6
"उबाठानं काँग्रेससमोर लोटांगण घातलंय, ते लीन झालेत आणि आता विलीनीकरणही होईल"
7
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
8
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
9
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
10
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
11
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
12
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
13
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
14
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
15
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
16
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
17
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
18
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
19
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
20
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या

रत्नागिरीतील धोकादायक धरणांमधील पाणी सोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2019 2:29 PM

जिथे गळतीमुळे धरणांना धोका उद्भवू शकतो, अशा धरणांमधील पाणी कालव्यांमधून सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या धरणांची तत्काळ पाहणी करून हा निर्णय घेतला जाईल. त्यासाठी लोकांना कल्पना देऊनच या हालचाली केल्या जातील, अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी लोकमतला दिली.

ठळक मुद्देरत्नागिरीतील धोकादायक धरणांमधील पाणी सोडणारजिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची माहिती

रत्नागिरी : जिथे गळतीमुळे धरणांना धोका उद्भवू शकतो, अशा धरणांमधील पाणी कालव्यांमधून सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या धरणांची तत्काळ पाहणी करून हा निर्णय घेतला जाईल. त्यासाठी लोकांना कल्पना देऊनच या हालचाली केल्या जातील, अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी लोकमतला दिली.

चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटल्यामुळे आता अन्य धरणांबाबतही प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. अशी दुर्घटना भविष्यात कोठेही घडू नये, यासाठी काही तातडीचे उपाय हाती घेण्यात आले आहेत. पाऊस पडत असल्याने सद्यस्थितीत कोणत्याही धरणाची दुरूस्ती शक्य नाही.

त्यामुळे आता जी धरणे धोकादायक ठरण्याची शक्यता आहे, अशा धरणांमधील पाणी सोडले जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात पाटबंधारे खात्यातील अधिकाऱ्यांची डॅम सेफ्टी ऑर्गनायझेशन असते. जिल्ह्यातील सर्व धरणांची पाहणी करण्याची सूचना या समितीला देण्यात आली असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.धोकादायक ठिकाणचे पुनर्वसनजिथे जिथे धरण क्षेत्रात लोकवस्ती आहे आणि जिला धोका होऊ शकतो, अशा ठिकाणच्या लोकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यावरही भर दिला जाईल. मुळात त्यांच्या काही अडचणी आहेत का? त्यांना पुनर्वसनासाठी जागा देऊन झाली आहे का, हे तपासून लोकांशी चर्चा करूनच पुढील निर्णय घेतला जाईल, असेही सांगितले.

टॅग्स :Damधरणcollectorजिल्हाधिकारीRatnagiriरत्नागिरी