शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
2
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
3
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
4
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
5
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
6
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
7
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
8
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
9
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
10
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
11
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
12
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
13
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
14
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
15
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
16
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
17
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
18
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
19
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
20
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?

रत्नागिरी जिल्ह्यातील कर्दे गाव कृषी पर्यटनात देशात अव्वल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2024 19:23 IST

रत्नागिरी : केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या कृषी पर्यटन श्रेणीमध्ये देशातील सर्वोत्कृष्ट गाव म्हणून दापोली तालुक्यातील कर्दे गावाची निवड करण्यात आली ...

रत्नागिरी : केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या कृषी पर्यटन श्रेणीमध्ये देशातील सर्वोत्कृष्ट गाव म्हणून दापोली तालुक्यातील कर्दे गावाची निवड करण्यात आली आहे. दिल्ली येथे झालेल्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात सरपंच सचिन तोडणकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी हा पुरस्कार स्वीकारला.ग्रामीण पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन मंत्रालयाकडून दरवर्षी पर्यटनातील विविध क्षेत्रांचे पुरस्कार दिले जातात. या स्पर्धेत देशातील ३० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील ९८१ गावे सहभागी झाली होती. यातील आठ वेगवेगळ्या श्रेणींमध्ये ३६ गावांची विजेते म्हणून निवड करण्यात आली. यातील कृषी क्षेत्रासाठी कर्दे गावाची निवड करण्यात आली आहे. स्थानिक अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या कृषी पर्यटनाला चालना देण्याच्या प्रयत्नांसाठी कर्दे गावाला हा सन्मान मिळाला आहे.निसर्गसंपन्न आणि मिनी महाबळेश्वर, अशी ओळख असलेल्या दापोली तालुक्यातील अनेक गावांनी आपली स्वतंत्र ओळख जपली आह. कर्दे हे गावही अशीच स्वतंत्र ओळख असलेले आहे. स्वच्छ समुद्रकिनारे, पांढरी वाळू आणि नयनरम्य परिसर यामुळे कर्दे गाव पर्यटकांचे विशेष आकर्षण आहे. कृषी पर्यटन, महिला सक्षमीकरण आणि शाश्वत विकासासाठीच्या नावीन्यपूर्ण दृष्टिकोन बाळगून कर्दे गाव मार्गक्रमण करत आहे. गावाने पर्यावरणीय पर्यटनाला चालना देण्यासाठी नैसर्गिक संसाधनांचा वापर, जल व्यवस्थापन आणि कचरा व्यवस्थापन यासह विविध उपक्रम राबवले आहेत. त्यामुळे कर्दे गावाची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.जागतिक पर्यटनदिनी शुक्रवार, २७ राेजी दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात हे पुरस्कार वितरण झाले. सरपंच सचिन तोडणकर, उपसरपंच दत्ताराम भुवड आणि कृषी अधिकारी सुनील खरात यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीtourismपर्यटनdapoli-acदापोली