शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

नितीन गडकरींना 'याचे' वाटतं दु:ख, रत्नागिरीत बोलून दाखवली मनातली खंत

By मनोज मुळ्ये | Updated: March 30, 2023 16:34 IST

आतापर्यंत देशात एक लाख कोटी रुपयांची रस्त्यांची कामे

रत्नागिरी : आतापर्यंत देशात एक लाख कोटी रुपयांची रस्त्यांची कामे केली. सर्व कामे अत्यंत वेळेत झाली. केवळ मुंबई गोवा महामार्गाचे कामच खूप काळ रखडले. सर्वाधिक वेळ लागलेले हे एकमेव काम आहे. हा रस्ता वेळेत झाला नाही, याचे दु:ख आपल्याला नेहमी वाटते, अशी खंत केंद्रीय रस्ते व भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.रत्नागिरी एमआयडीसी येथील पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी या कामाचा पूर्ण आढावा घेतला. २०११ साली या रस्त्याला मंजुरी मिळाली. २०१६ साली वनखात्याची परवानगी मिळल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. काहीवेळा ठेकेदार बदलावे लागले, भूसंपादन, मोबदला वाटप, न्यायालयात दाखल झालेले दावे अशा अनेक कारणांमुळे या रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम लांबले. या मार्गावर खूप अपघात होतात. अनेकांचे बळी आतापर्यंत गेले आहेत. त्यामुळे हे काम लवकर होणे अपेक्षित आहे. मात्र ते वेळेत झाले नाही, याचे आपल्याला दु:ख वाटतं, असे ते म्हणाले.प्रलंबित कामांसाठी २२० कोटींचा निधी विविध कारणांमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील दोन टप्प्यातील काम रखडले आहे. आता त्यालाही गती आहे. त्यामुळे डिसेंबरमध्ये चौपदरीकरणाचे काम पूर्ण होईल आणि जानेवारीमध्ये कोकणवासीय नव्या महामार्गावरुन जातील, असे मंत्री गडकरी यांनी जाहीर केले. तसेच मार्गातील काही प्रलंबित कामांसाठी २२० कोटी रुपये निधीची घोषणा त्यांनी केली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMumbaiमुंबईgoaगोवाhighwayमहामार्गNitin Gadkariनितीन गडकरी