शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

नितीन गडकरींना 'याचे' वाटतं दु:ख, रत्नागिरीत बोलून दाखवली मनातली खंत

By मनोज मुळ्ये | Updated: March 30, 2023 16:34 IST

आतापर्यंत देशात एक लाख कोटी रुपयांची रस्त्यांची कामे

रत्नागिरी : आतापर्यंत देशात एक लाख कोटी रुपयांची रस्त्यांची कामे केली. सर्व कामे अत्यंत वेळेत झाली. केवळ मुंबई गोवा महामार्गाचे कामच खूप काळ रखडले. सर्वाधिक वेळ लागलेले हे एकमेव काम आहे. हा रस्ता वेळेत झाला नाही, याचे दु:ख आपल्याला नेहमी वाटते, अशी खंत केंद्रीय रस्ते व भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.रत्नागिरी एमआयडीसी येथील पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी या कामाचा पूर्ण आढावा घेतला. २०११ साली या रस्त्याला मंजुरी मिळाली. २०१६ साली वनखात्याची परवानगी मिळल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. काहीवेळा ठेकेदार बदलावे लागले, भूसंपादन, मोबदला वाटप, न्यायालयात दाखल झालेले दावे अशा अनेक कारणांमुळे या रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम लांबले. या मार्गावर खूप अपघात होतात. अनेकांचे बळी आतापर्यंत गेले आहेत. त्यामुळे हे काम लवकर होणे अपेक्षित आहे. मात्र ते वेळेत झाले नाही, याचे आपल्याला दु:ख वाटतं, असे ते म्हणाले.प्रलंबित कामांसाठी २२० कोटींचा निधी विविध कारणांमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील दोन टप्प्यातील काम रखडले आहे. आता त्यालाही गती आहे. त्यामुळे डिसेंबरमध्ये चौपदरीकरणाचे काम पूर्ण होईल आणि जानेवारीमध्ये कोकणवासीय नव्या महामार्गावरुन जातील, असे मंत्री गडकरी यांनी जाहीर केले. तसेच मार्गातील काही प्रलंबित कामांसाठी २२० कोटी रुपये निधीची घोषणा त्यांनी केली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMumbaiमुंबईgoaगोवाhighwayमहामार्गNitin Gadkariनितीन गडकरी