शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: विजयी घोषणेपूर्वीच सुनेत्रा पवारांचं सर्व कार्यकर्त्यांना भावूक आवाहन, म्हणाल्या...
2
आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
3
Thalapathy Vijay Net Worth: अभिनेता ते राजकारणी; ६०० कोटींपेक्षा अधिकचं साम्राज्य, कशी आहे थलापति विजय यांची लक्झरी लाईफ 
4
लग्नानंतर सासरची पायरी चढण्याआधीच मोडला संसार! २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचा असा झाला भांडाफोड
5
दोन राज्यांतून भाजपसाठी वाईट बातमी; गेल्या वेळी शून्य, आता फक्त ५ जागांवर आघाडी
6
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला 'थलापती' का म्हणतात? जाणून घ्या ३२ वर्षे जुनी कहाणी!
7
IPL 2026: RCBला मोठा धक्का! तुफान घोडदौड सुरू असताना स्टार खेळाडू संघ सोडून घरी परतला
8
भीषण अपघात! प्रभू श्रीरामाचं दर्शन घेऊन परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; ६ जणांचा मृत्यू
9
तामिळनाडूमध्ये 'थलापती' विजय बहुमतापासून दूर; एआयडीएमके जाण्यापूर्वीच काँग्रेसने पाठिंब्याचा हात पुढे केला...
10
युद्ध थांबणार की ठिणगी पडणार? इराणचा पाकिस्तानमार्गे ट्रम्प यांना निरोप; अटी वाचून व्हाल थक्क!
11
Video - बापरे! चावीच हरवली... कर्नाटकात हातोड्याने तोडावं लागलं EVM स्ट्रॉन्ग रूमचं कुलूप
12
रितेश देशमुखचा वेडा चाहता! रत्नागिरीच्या पठ्ठ्याने 'राजा शिवाजी' सिनेमा पाहण्यासाठी बुक केलं अख्खं थिएटर
13
अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: भीती, नैराश्य, संकटांपासून मुक्तीसाठी पठण करा 'गणेश रक्षा मंत्र'
14
केरळमध्ये मुख्यमंत्री कोण? निकाल नाही आले तोवर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये लॉबिंग सुरु झाली, १० वर्षांनी...
15
ममता बॅनर्जी यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणारे भाजपचे '५' नायक; या नेत्यांनी शांतपणे बंगालची समीकरण बदलली
16
IPL 2026: 'टेबल टॉपर' पंजाब किंग्जचा सलग दुसरा पराभव, श्रेयस अय्यर 'या' गोष्टीवर संतापला...
17
मोफत ८ ग्रॅम सोने अन् दरमहा २५०० रूपये...; कोणती ५ आश्वासने ज्यानं अभिनेता विजयची जादू चालली?
18
"हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे, विजयी जल्लोष नको, गुलालही उधळू नका" सुनेत्रा पवार भावूक!
19
इकडे 'विजय'चा राजकीय उदय, तिकडे 'सन टीव्ही'च्या स्टॉकला उतरती कळा; काय आहे कनेक्शन?
20
भाजपाचा विजय निश्चित होताच शुभेंदू अधिकारींचं मोठं विधान, विजयाचं गुपित उघड करत म्हणाले....
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:32 IST

रत्नागिरी : जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात ‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी’ मोहीम प्रभावीपणे राबविण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत ७ लाख ९८ ...

रत्नागिरी : जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात ‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी’ मोहीम प्रभावीपणे राबविण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत ७ लाख ९८ हजार ८५६ नागरिकांची गृहभेटीतून तपासणी करण्यात आली आहे. यातून ५९७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तपासणीमुळे निदान वेळेत होत आहे.

लसीकरणात गोंधळ

लांजा : अजूनही लसींसाठी पुरेसे डोस उपलब्ध होत नसल्यामुळे नागरिकांना धावपळ करावी लागत आहे. काही नागरिकांना पहिला डोस अद्याप झालेला नाही, तर पहिला डोस झाल्यानंतर सुमारे ६ आठवडे ओलांडूनही अनेकांना दुसऱ्या डोसची प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे पुरेशी लस कधी येणार, असा प्रश्न नागरिकांमधून केला जात आहे.

वाहनांची गती संथ

खेड : मुंबई - गोवा महामार्गावरील भरणे येथे भुयारी मार्गाचे काम सध्या सुरु आहे. या कामासाठी आंबवलीकडे जाणारा मार्ग मध्यवर्ती ठिकाणी बंद करण्यात आला आहे. दोन्ही बाजूंनी एकेरी मार्गाचा अवलंब आणि अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी झाल्याने अडचण होत आहे.

धुळीने केले त्रस्त

सावर्डे : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरु करण्यात आले आहे. या मार्गावर सध्या धुळीचा त्रास होत आहे. धुळीचे लोळ निर्माण होत असल्याने वाहन चालक त्रस्त झाले आहेत. याबाबत ठेकेदार व्यवस्थापनाकडे सातत्याने तक्रार करूनही याबाबत अद्याप कोणतीच कार्यवाही झालेली नाही.

तिसऱ्या लाटेचा धसका

दापोली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सगळ्यांच्या मनात धडकी भरविली आहे. अजूनही कोरोना रुग्णांची संख्या कमी येत नसल्याने आरोग्य विभाग त्रस्त झाला आहे. अशातच आता पुन्हा तिसऱ्या लाटेचे सुतोवाच आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी केले आहे. त्यामुळे दुसरी लाट थांबण्याआधीच तिसऱ्या लाटेचा धसका नागरिकांनी घेतला आहे.

कंत्राटी कर्मचाऱ्यांची मदत

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या २५ हजारपेक्षा अधिक झाली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या सध्या साडेचार हजारपेक्षा अधिक आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेच्या अपुऱ्या कर्मचाऱ्यांवर ताण येत होता. परंतु आता कंत्राटी कर्मचारी यांची भरती करण्यात आल्याने यंत्रणेला हातभार लागला आहे.

गणेश मोरेंचा गौरव

आवाशी : खेड तालुक्यातील चिंचघर गडाचे पंचायत समिती सदस्य यांनी काव्यलेखन उपक्रमात काव्यलेखन केल्याने त्यांचा सन्मानपत्राने नुकताच गौरव करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचार मंचच्यावतीने हा उपक्रम आयोजित केला होता. ‘मी एक भारतीय नागरिक’ यावर मोरे यांनी कव्यलेखन केले.

कारवाईची मागणी

देवरुख : कोरोना काळात शासनाकडून निर्बंधांचे आदेश असतानाही संगमेश्वर तालुक्यातील माखजन, धामापूर भागात चिरेखाण व्यवसाय बेकायदा सुरू आहे. या चिरेखाणीवर काम करणाऱ्या व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात यावी तसेच या व्यवसायावर कारवाई व्हावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमी करीत आहेत.