शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

मिरची, मसाले जिन्नसांना महागाईचा ठसका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : वर्षभरासाठी लागणारे तिखट अथवा मसाला घरोघरी तयार करण्यात येतो. सध्या घरोघरी मिरची खरेदी करणे, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : वर्षभरासाठी लागणारे तिखट अथवा मसाला घरोघरी तयार करण्यात येतो. सध्या घरोघरी मिरची खरेदी करणे, वाळविणे, दळण काढून आणणे, याची लगबग सुरू आहे. मात्र, गतवर्षीच्या तुलनेत मसाल्यासाठी लागणारी मिरची व मसाल्याच्या अन्य जिन्नसाच्या दरात कमालीची वाढ झाली आहे. लाल मिरचीच्या किमतीत शंभर रुपयांनी वाढ झाली आहे.

तिखटासाठी लवंगी, तर रंगासाठी काश्मिरी मिरचीचा वापर केला जातो. मात्र, दरामुळे एकाच प्रकारची मिरची खरेदी न करता, बजेटप्रमाणे मिश्र मिरचीची खरेदी करण्यात येत आहे. वर्षभरासाठी लागणाऱ्या तिखटाचा अंदाज असल्याने त्याप्रमाणे मिरची खरेदी सुरू असली तरी वाढत्या दरामुळे खरेदीच्या प्रमाणात घट झाली आहे. कोरोनामुळे गतवर्षी लॉकडाऊन मार्चमध्ये झाले होते. त्यामुळे कित्येकांना मसाले बनविता आले नव्हते. कोरोना रूग्ण वाढत असल्याने लॉकडाऊन होण्याची भीती असल्यामुळेच गृहिणींची मिरची खरेदीबरोबर तिखट दळून आणण्याची लगबग सुरू असल्याने मसाल्याची गिरण, डंकावर नंबर लागत आहेत. महागाईने पोळलेल्या ग्राहकांना मिरची व मसाल्याच्या जिन्नसाची दरवाढ सोसावी लागत आहे.

कोल्हापुरातून आवक

- जिल्ह्यात विक्रीसाठी येणारी मिरची, मसाल्याचे अन्य साहित्य कोल्हापूर तसेच नवी मुंबई येथून विक्रीसाठी येत आहे.

- घाऊक बाजारात गुजरातमधून मिरचीची आवक होत आहे

- स्थानिक शेतकरी मिरचीचे उत्पादन घेऊ लागले असले तरी या मिरच्यांचा वापर अद्याप तरी वाळवणांसाठी होत नाही.

वर्षभरासाठी लागणारे तिखट एकदाच तयार केले जाते. मिरचीच्या दरात तसेच मसाल्यासाठी लागणाऱ्या अन्य जिन्नसाचे दरही कडाडले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत शंभर रुपयांनी घसघशीत वाढ झाली आहे. महागाईने आधीच जीव मेटाकुटीस आणला आहे. प्रत्येक जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ अद्याप सुरू आहे. आधीच कोरोनामुळे आर्थिक कंबरडे मोडले आहे. त्यामुळे खर्चाला कोठे कात्री लावावी, हा प्रश्न आहे. यावर्षी इंधनाच्या दरात झालेल्या दरवाढीचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंवर होत असल्याने शासनाने महागाईवर कुठेतरी निर्बंध आणणे गरजेचे आहे.

- दुर्वा रसाळ, गृहिणी

महागाईचा दर निश्चित करताना सर्वसामान्यांचा विचार करणे आवश्यक आहे. महागाई सातत्याने वाढत असली तरी मजुरीचे दर मात्र सतत वाढत नाहीत. जीवनाश्यक वस्तूंमध्ये डाळी, तेल, कडधान्य, तांदूळ, गव्हाचे दर आधीच वाढलेले आहेत. कांद्याचे दर आता खाली येऊ लागले आहेत. मात्र, मसाल्यांचे दर चांगलेच भडकले आहेत. पोटाला चिमटे काढून जमवलेली पूंजी लॉकडाऊन काळात संपली. आता लॉकडाऊन झाले तर आर्थिक परिस्थिती विचित्र होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचा विचार करूनच दरवाढ करणे आवश्यक आहे.

- शिल्पा जोशी, गृहिणी