शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

उत्पन्न मिळवून देणारं ‘पांढरं साेनं’ काळवंडलं; रत्नागिरीत आंबा पिकापाठोपाठ काजूवर थ्रीप्स रोगाचा प्रादुर्भाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2023 14:14 IST

हवामानातील बदलामुळे काजू पीकही धोक्यात

रत्नागिरी :  ‘पांढर सोनं’ म्हणून जिल्ह्याला उत्पादन देणारे काजू पीकही हवामानातील बदलामुळे धोक्यात आले आहे. काजूवर फुलकिडे, टीम माॅस्क्यूटो रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. टरफल काळे पडले असून, काही ठिकाणी गरही काळा पडला आहे. उत्पादन कमी असताना बाजारातील दरही खालावल्याने आंबा पिकापाठाेपाठ काजू पीकही धोक्यात आले आहे.ओले काजूगर विक्रीबरोबर वाळलेल्या काजू बीची विक्री करून शेतकऱ्यांना आर्थिक प्राप्ती होते. गावठी काजूबरोबरच कोकण कृषी विद्यापीठ प्रमाणित ‘वेंगुर्ला ४ व ५’ या वाणांची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे. यावर्षी हवामानामुळे काजू उत्पादन अत्यल्प आहे. त्यातच सुरुवातीपासून फुलकिडे (थ्रीप्स), टीम माॅस्क्यूटो रोगाचा प्रादुर्भाव राहिला आहे. त्यामुळे काजू पिकावरही कीड प्रतिबंधात्मक फवारणी करावी लागत आहे.

फवारणी करूनही शेतकरी फुलकिड्यांवर नियंत्रण मिळवू शकलेले नाहीत. त्यामुळे काजू बीच्या टरफलावर काळे डाग पडले आहेत. काळपटपणा गरापर्यंत पोहोचला असून, गर खराब झाला आहे. काळे डाग पडलेली काजू बी बाजारात विक्रीसाठी चालत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. काही ठिकाणी काजू बीचा आकारही कमी झाला आहे.

दरात घसरणवाळलेली काजू बी फेब्रुवारीपासूनच काही ठिकाणी बाजारात आली. सुरुवातीला १३८ रुपये दर देण्यात आला. मात्र, आता दरात  घट झाली आहे. गावठी काजूला १०० ते १०५ रुपये तर वेंगुर्ला काजू बीसाठी ११२ ते ११५ रुपये दर प्राप्त होत आहे. वेंगुर्ला काजू लागवडीनंतर चार ते पाच वर्षांत उत्पादन सुरू होते. काजू बीचा आकार, चव व दर्जा चांगला असल्याने दर अधिक मिळतो. त्यामुळे वेंगर्ला काजू लागवडीवर विशेष भर आहे.

परदेशी काजू आयातदोन वर्षांपूर्वी काजू बीला १५० रुपये दर मिळाला होता.  प्रक्रिया करणाऱ्या उद्योजकांना काजू प्रक्रियेसाठी दरामुळे खरेदीसाठी भांडवल गुंतवणुकीचा प्रश्न निर्माण होत आहे. तुलनेने परदेशी काजूचा दर कमी आहे. चव, दर्जा याचा प्रश्न असला तरी भांडवल गुंतविणे शक्य नसल्याने प्रक्रिया उद्योजक स्थानिक काजूपेक्षा परदेशी काजू खरेदी करतआहेत.

राेगाबाबत संशोधन हाेणे गरजेचेआंबा तसेच काजू पिकावर थ्रीप्स (फुलकिडे) चा प्रादूर्भाव होत असून, पिकाची उत्पादकता धोक्यात येत आहे. बाजारात विविध कंपन्यांची महागडी कीटकनाशके उपलब्ध आहेत. मात्र त्याची फवारणी करूनही अपेक्षित रिझल्ट मिळत नाहीत. कीडरोग नियंत्रणात येत नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याने त्यावर प्रभावी कीटनाशकांसाठी कोकण कृषी विद्यापीठामध्ये संशोधन होणे गरजेचे आहे. हे संशाेधन हाेण्यासाठी लाेकप्रतिनिधींनीही लक्ष देण्याची मागणी आता हाेऊ लागली आहे.

यावर्षी उत्पादन कमी असताना फूलकिडे, टीम माॅस्क्यूटोचा प्रादूर्भाव अधिक राहिला त्यामुळे काजू पिकाचे नुकसान झाले आहे. उत्पादन कमी आहे, शिवाय काळे डाग, आकार कमी, गर खराब होत दर्जावर परिणाम झाल्याने आर्थिक नुकसान होत आहे. -के. व्ही. बापट, शेतकरी

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMangoआंबाweatherहवामान