शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
2
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
3
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
4
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
5
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
6
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
7
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
8
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना
9
गेल्या २४ तासांत जपानमध्ये भूकंपाचे धक्के, सर्वात मोठा भूकंप ६.८ रिश्टर स्केलचा; त्सुनामीचा इशारा जारी
10
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
11
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
12
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
13
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
14
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
15
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
16
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
17
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
18
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
19
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
20
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा

उत्पन्न मिळवून देणारं ‘पांढरं साेनं’ काळवंडलं; रत्नागिरीत आंबा पिकापाठोपाठ काजूवर थ्रीप्स रोगाचा प्रादुर्भाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2023 14:14 IST

हवामानातील बदलामुळे काजू पीकही धोक्यात

रत्नागिरी :  ‘पांढर सोनं’ म्हणून जिल्ह्याला उत्पादन देणारे काजू पीकही हवामानातील बदलामुळे धोक्यात आले आहे. काजूवर फुलकिडे, टीम माॅस्क्यूटो रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. टरफल काळे पडले असून, काही ठिकाणी गरही काळा पडला आहे. उत्पादन कमी असताना बाजारातील दरही खालावल्याने आंबा पिकापाठाेपाठ काजू पीकही धोक्यात आले आहे.ओले काजूगर विक्रीबरोबर वाळलेल्या काजू बीची विक्री करून शेतकऱ्यांना आर्थिक प्राप्ती होते. गावठी काजूबरोबरच कोकण कृषी विद्यापीठ प्रमाणित ‘वेंगुर्ला ४ व ५’ या वाणांची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे. यावर्षी हवामानामुळे काजू उत्पादन अत्यल्प आहे. त्यातच सुरुवातीपासून फुलकिडे (थ्रीप्स), टीम माॅस्क्यूटो रोगाचा प्रादुर्भाव राहिला आहे. त्यामुळे काजू पिकावरही कीड प्रतिबंधात्मक फवारणी करावी लागत आहे.

फवारणी करूनही शेतकरी फुलकिड्यांवर नियंत्रण मिळवू शकलेले नाहीत. त्यामुळे काजू बीच्या टरफलावर काळे डाग पडले आहेत. काळपटपणा गरापर्यंत पोहोचला असून, गर खराब झाला आहे. काळे डाग पडलेली काजू बी बाजारात विक्रीसाठी चालत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. काही ठिकाणी काजू बीचा आकारही कमी झाला आहे.

दरात घसरणवाळलेली काजू बी फेब्रुवारीपासूनच काही ठिकाणी बाजारात आली. सुरुवातीला १३८ रुपये दर देण्यात आला. मात्र, आता दरात  घट झाली आहे. गावठी काजूला १०० ते १०५ रुपये तर वेंगुर्ला काजू बीसाठी ११२ ते ११५ रुपये दर प्राप्त होत आहे. वेंगुर्ला काजू लागवडीनंतर चार ते पाच वर्षांत उत्पादन सुरू होते. काजू बीचा आकार, चव व दर्जा चांगला असल्याने दर अधिक मिळतो. त्यामुळे वेंगर्ला काजू लागवडीवर विशेष भर आहे.

परदेशी काजू आयातदोन वर्षांपूर्वी काजू बीला १५० रुपये दर मिळाला होता.  प्रक्रिया करणाऱ्या उद्योजकांना काजू प्रक्रियेसाठी दरामुळे खरेदीसाठी भांडवल गुंतवणुकीचा प्रश्न निर्माण होत आहे. तुलनेने परदेशी काजूचा दर कमी आहे. चव, दर्जा याचा प्रश्न असला तरी भांडवल गुंतविणे शक्य नसल्याने प्रक्रिया उद्योजक स्थानिक काजूपेक्षा परदेशी काजू खरेदी करतआहेत.

राेगाबाबत संशोधन हाेणे गरजेचेआंबा तसेच काजू पिकावर थ्रीप्स (फुलकिडे) चा प्रादूर्भाव होत असून, पिकाची उत्पादकता धोक्यात येत आहे. बाजारात विविध कंपन्यांची महागडी कीटकनाशके उपलब्ध आहेत. मात्र त्याची फवारणी करूनही अपेक्षित रिझल्ट मिळत नाहीत. कीडरोग नियंत्रणात येत नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याने त्यावर प्रभावी कीटनाशकांसाठी कोकण कृषी विद्यापीठामध्ये संशोधन होणे गरजेचे आहे. हे संशाेधन हाेण्यासाठी लाेकप्रतिनिधींनीही लक्ष देण्याची मागणी आता हाेऊ लागली आहे.

यावर्षी उत्पादन कमी असताना फूलकिडे, टीम माॅस्क्यूटोचा प्रादूर्भाव अधिक राहिला त्यामुळे काजू पिकाचे नुकसान झाले आहे. उत्पादन कमी आहे, शिवाय काळे डाग, आकार कमी, गर खराब होत दर्जावर परिणाम झाल्याने आर्थिक नुकसान होत आहे. -के. व्ही. बापट, शेतकरी

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMangoआंबाweatherहवामान