शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

शैक्षणिक निर्देशांकात राज्यात सातारा प्रथम क्रमांकावर; सिंधुदुर्ग-रत्नागिरी द्वितीय, तृतीय स्थानावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2022 12:06 IST

शिष्यवृत्ती परीक्षेसह नवोदय विद्यालय परीक्षेतही जिल्हा परिषद शाळांच्या विद्यार्थ्यांनी आपला ठसा उमटविला

रत्नागिरी : गेली काही वर्षे रत्नागिरी जिल्हा परिषदेतर्फे शाळांची गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. राज्य शासनाकडून जिल्हा शैक्षणिक निर्देशांक जाहीर करण्यात आला असून, त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याने तृतीय क्रमांक मिळविला आहे.गेली तीन वर्षे जिल्हा परिषदेतर्फे शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यासाठी गुणवत्ता कक्षाची स्थापनाही करण्यात आली आहे. विशेषत: स्पर्धा परीक्षेसाठी विशेष लक्ष दिले जात आहे. शिष्यवृत्ती परीक्षेसह नवोदय विद्यालय परीक्षेतही जिल्हा परिषद शाळांच्या विद्यार्थ्यांनी आपला ठसा उमटविला आहे. याचा परिणाम जिल्ह्याच्या गुणवत्ता वाढीवर होत आहे.शैक्षणिक निर्देशांक भरताना सहा मुख्य निर्देशांक व त्या अंतर्गत असणाऱ्या एकूण ८३ निर्देशांकाच्या आधारे ६०० गुणांचे गुणांकन केले जाते. भारत सरकारकडून यू-डायस प्लस प्रणालीवर शाळांनी भरलेली माहिती, राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण, समग्र शिक्षा योजनेतील भौतिक सुविधा मोफत पाठ्यपुस्तके, मोफत गणवेश, दिव्यांगांसाठी सुविधा, स्कूल सेफ्टी व चाईल्ड प्रोटेक्शन अंतर्गत मंजूर बाबी, डिजिटल लर्निंग अंतर्गत मंजूर बाबी, गव्हर्नस प्रोसेसअंतर्गत मंजूर बाबी, लीडर डेव्हलपमेंटअंतर्गत मंजूर बाबी, स्वच्छ भारत व जलसुरक्षा, फिट इंडिया, एक भारत श्रेष्ठ भारत आदी स्रोतांद्वारे शैक्षणिक निर्देशांक काढला जातो. ही माहिती ऑनलाइन भरल्यानंतर सॉफ्टवेअरद्वारे क्रमांक निश्चित केले जातात.२०१९-२० या वर्षात रत्नागिरी जिल्हा शैक्षणिक गुणवत्तेत तृतीय क्रमांकावर होता. त्यात आता सुधारणा झाली आहे. विविध उपक्रम, स्पर्धा, परीक्षा या माध्यमातून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न सुरू आहेत. यावर्षी जिल्ह्याने शैक्षणिक गुणवत्तेच्या कामात तृतीय क्रमांक मिळविला आहे. ६०० पैकी ४२८.४८ गुण मिळाले आहेत.

राज्यात पहिल्या १० क्रमांकामध्ये सातारा सलग दुसऱ्यांदा प्रथम क्रमांक, सिंधुदुर्ग जिल्हा द्वितीय, तर रत्नागिरी जिल्ह्याने तृतीय क्रमांक मिळविला. बीड चौथा क्रमांक, मुंबई पाचवा, उस्मानाबाद सहा, पुणे सात, लातूर आठ, अहमदनगर नऊ, तर औरंगाबाद जिल्हा दहाव्या क्रमांकावर राहिला आहे

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीsindhudurgसिंधुदुर्गSatara areaसातारा परिसरEducationशिक्षण