शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

शैक्षणिक निर्देशांकात राज्यात सातारा प्रथम क्रमांकावर; सिंधुदुर्ग-रत्नागिरी द्वितीय, तृतीय स्थानावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2022 12:06 IST

शिष्यवृत्ती परीक्षेसह नवोदय विद्यालय परीक्षेतही जिल्हा परिषद शाळांच्या विद्यार्थ्यांनी आपला ठसा उमटविला

रत्नागिरी : गेली काही वर्षे रत्नागिरी जिल्हा परिषदेतर्फे शाळांची गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. राज्य शासनाकडून जिल्हा शैक्षणिक निर्देशांक जाहीर करण्यात आला असून, त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याने तृतीय क्रमांक मिळविला आहे.गेली तीन वर्षे जिल्हा परिषदेतर्फे शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यासाठी गुणवत्ता कक्षाची स्थापनाही करण्यात आली आहे. विशेषत: स्पर्धा परीक्षेसाठी विशेष लक्ष दिले जात आहे. शिष्यवृत्ती परीक्षेसह नवोदय विद्यालय परीक्षेतही जिल्हा परिषद शाळांच्या विद्यार्थ्यांनी आपला ठसा उमटविला आहे. याचा परिणाम जिल्ह्याच्या गुणवत्ता वाढीवर होत आहे.शैक्षणिक निर्देशांक भरताना सहा मुख्य निर्देशांक व त्या अंतर्गत असणाऱ्या एकूण ८३ निर्देशांकाच्या आधारे ६०० गुणांचे गुणांकन केले जाते. भारत सरकारकडून यू-डायस प्लस प्रणालीवर शाळांनी भरलेली माहिती, राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण, समग्र शिक्षा योजनेतील भौतिक सुविधा मोफत पाठ्यपुस्तके, मोफत गणवेश, दिव्यांगांसाठी सुविधा, स्कूल सेफ्टी व चाईल्ड प्रोटेक्शन अंतर्गत मंजूर बाबी, डिजिटल लर्निंग अंतर्गत मंजूर बाबी, गव्हर्नस प्रोसेसअंतर्गत मंजूर बाबी, लीडर डेव्हलपमेंटअंतर्गत मंजूर बाबी, स्वच्छ भारत व जलसुरक्षा, फिट इंडिया, एक भारत श्रेष्ठ भारत आदी स्रोतांद्वारे शैक्षणिक निर्देशांक काढला जातो. ही माहिती ऑनलाइन भरल्यानंतर सॉफ्टवेअरद्वारे क्रमांक निश्चित केले जातात.२०१९-२० या वर्षात रत्नागिरी जिल्हा शैक्षणिक गुणवत्तेत तृतीय क्रमांकावर होता. त्यात आता सुधारणा झाली आहे. विविध उपक्रम, स्पर्धा, परीक्षा या माध्यमातून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न सुरू आहेत. यावर्षी जिल्ह्याने शैक्षणिक गुणवत्तेच्या कामात तृतीय क्रमांक मिळविला आहे. ६०० पैकी ४२८.४८ गुण मिळाले आहेत.

राज्यात पहिल्या १० क्रमांकामध्ये सातारा सलग दुसऱ्यांदा प्रथम क्रमांक, सिंधुदुर्ग जिल्हा द्वितीय, तर रत्नागिरी जिल्ह्याने तृतीय क्रमांक मिळविला. बीड चौथा क्रमांक, मुंबई पाचवा, उस्मानाबाद सहा, पुणे सात, लातूर आठ, अहमदनगर नऊ, तर औरंगाबाद जिल्हा दहाव्या क्रमांकावर राहिला आहे

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीsindhudurgसिंधुदुर्गSatara areaसातारा परिसरEducationशिक्षण