शहरं
Join us  
Trending Stories
1
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
2
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
3
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
4
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
5
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
6
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
7
“TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान
8
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
9
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
10
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
11
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
12
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
13
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
14
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
15
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
16
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
17
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
18
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
19
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
20
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?

मला भाजपची ताकद बघायचीच आहे : भास्कर जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2021 4:16 PM

आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकणातील राजकीय वातावरण तापू लागेल. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आमच्यासोबत आली तर स्वागतच आहे, असे खुले आव्हानही जाधव यांनी यावेळी दिले़.

गुहागर : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका जवळ येऊन ठेपल्या आहेत. राष्ट्रवादीला लाचार म्हणणारी भाजप राष्ट्रवादीबरोबर जाते की स्वतःच्या बळावर निवडणुका लढवते, हे पाहायचे आहे. या निवडणुकीत भाजपची ताकद मला बघायचीच आहे, असा टोला आमदार भास्कर जाधव यांनी लगावला. राज्यात आघाडी सरकार आहे, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकाँग्रेस आमच्यासोबत आली तर स्वागतच आहे, असे खुले आव्हान त्यांनी दिले़

गुहागर तालुक्यातील पालशेत जिल्हा परिषद गटातील शिवसेना मेळावा पाटपन्हाळे ग्रामपंचायत सभागृह येथे आयाेजित करण्यात आला हाेता. यावेळी भास्कर जाधव बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, तालुकाप्रमुख सचिन बाईत, नेत्रा ठाकूर, सचिन जाधव, अमरदीप परचुरे, अनंत चव्हाण उपस्थित होते.

भास्कर जाधव म्हणाले, निवडणुकीमध्ये असे काम करा की लोकांना तुम्ही आपले वाटले पाहिजेत. आपला विकास करेल तो नेता व तो पक्ष त्यांनाच निवडून दिले पाहिजे, असे ते म्हणाले. तालुक्याला माझ्या रूपाने पहिल्यांदा मंत्रिपद व मुलाच्या रूपाने अध्यक्षपद मिळाले. असे असताना ‘हतबल मातोश्री, लाचार राष्ट्रवादी’ अशी खोचक टीका करणाऱ्यांनी एवढे चांगले बदल मोठ्या मनाने स्वीकारायला हवे होते, असा टोला विनय नातूंचे नाव न घेता लगावला.

जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव म्हणाले की, ज्या दिवशी अध्यक्षपदावरून खाली येईन तेव्हा तालुक्यासाठी मी चांगले काम केले, असे प्रत्येकाला वाटले पाहिजे, असे काम करण्याचा माझा प्रयत्न आहे, असे सांगितले. यावेळी तालुकाप्रमुख सचिन बाईत, सुनील पवार, पांडुरंग कापले, पूर्वी निमुणकर, विलास वाघे, नेत्रा ठाकूर, महेश नाटेकर यांनी मनोगत व्यक्त केले. विनायक मुळे यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हा परिषद सदस्य प्रवीण ओक यांनी प्रास्ताविक केले. पाटपन्हाळे सरपंच संजय पवार यांनी आभार मानले.

नवीन पदाधिकारी निवड

तालुक्यातील काही पदांवर नव्याने नियुक्त्या करण्यात आल्या. यामध्ये तालुका सहसचिवपदी शरद साळवी (खोडदे), सचिवपदी विलास गुरव यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच आबलोली उपतालुका प्रमुखपदी विलास वाघे व काशीराम मोहिते यांची निवड जाहीर करण्यात आली.

पक्षांतर्गत वादावर टाेचले कान

पक्षात चांगले काम करतो आहे त्याला मानाचे पान मिळणार. पक्षात जुना - नवा वाद खपवून घेणार नाही. मी सगळ्यांना बरोबर घेऊन जातो. ‘आलास तर बस पाटावर, नाहीतर जा घाटावर’ अशा कडक शब्दांत पक्षांतर्गत जुन्या - नव्या वादावर कार्यकर्त्यांना सुनावले.

भाजपच्या नादाला लागलेले लयास गेले

अजूनपर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात एसटी महामंडळात पगारवाढ झालेली नाही. ही प्रथमच झाली आहे. तरीही कर्मचारी संपावर ठाम आहेत. भाजपच्या नादाला लागू नका. नादाला लागले ते लयास गेले, असे भास्कर जाधव यांनी एसटी संपाबाबत बाेलताना सुनावले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीElectionनिवडणूकBhaskar Jadhavभास्कर जाधवShiv SenaशिवसेनाBJPभाजपाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस