शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

HSC 12th Result 2022: बारावी परीक्षेत रत्नागिरी राज्यात दुसऱ्या क्रमांकावर, यंदाही मुलींचा वरचष्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 19:01 IST

जिल्ह्यात शाखानिहाय निकालात व्यवसायिक शाखेचा निकाल सर्वाधिक ९८.७० टक्के लागला.

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च - एप्रिलमध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक (बारावी) प्रमाणपत्र परीक्षेत रत्नागिरी जिल्ह्याने राज्यात दि्वतीय क्रमांक पटकावला असून जिल्ह्याचा निकाल ९६.३९ टक्के लागला आहे. यंदाही मुलींनीच बाजी मारली असून मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा १.८१ टक्क्यांनी अधिक आहे. पुनर्परीक्षार्थींचा निकाल ५७.६६ टक्के इतका लागला आहे.बारावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. रत्नागिरी जिल्ह्यातील १५४ कनिष्ठ महाविद्यालयांमधील १९,१८३ मुलांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यापैकी १९०९१ मुले परीक्षेला बसली. यापैकी मुले ९६५७, तर मुली ९४३४ होत्या. या परीक्षेसाठी मुख्य केंद्रे ३७ आणि १४८ उपकेंद्रे होती. यातून १८,४०२ मुले (९६.३९ टक्के) उत्तीर्ण झाली आहेत. यात मुलांची संख्या ९,२२२, तर मुलींची संख्या ९,१८० इतकी आहे. मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९५.४९ टक्के, तर मुलींचे ९७.३० टक्के इतके आहे. मुलींची टक्केवारी मुलांपेक्षा १.८१ टक्क्यांनी अधिक आहे. तसेच ३०० पुनर्परीक्षार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी १७३ (५७.६६ टक्के) उत्तीर्ण झाले.जिल्ह्यात शाखानिहाय निकालात व्यवसायिक शाखेचा निकाल सर्वाधिक ९८.७० टक्के लागला. त्याखालोखाल विज्ञान शाखेचा ९८.५२, वाणिज्यचा ९६.६१, कला शाखेचा ९३.१७ आणि टेक्निकल सायन्सचा ४६.१५ टक्के निकाल लागला.या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचे गुणपत्रक त्यांच्या उच्च माध्यमिक शाळेत किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत शुक्रवार, दि. १७ रोजी दुपारी ३ वाजता वितरित करण्यात येणार आहे. त्याबाबतचे परिपत्रक़ स्वतंत्रपणे मंडळाकडून काढले जाणार आहे. पुरवणी परीक्षेसाठीही पुनर्परीक्षार्थी आणि श्रेणीसुधार विद्यार्थ्यांसाठी शुक्रवार, दि. १० जूनपासून मंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरून घेण्यात येणार आहेत.गुणपत्रिकेच्या पडताळणीसाठी १० ते २० जून या कालावधीत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे, तर छायाप्रतीसाठी १० ते २९ जून या कालावधीत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. त्यासाठी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घ्यावी लागणार आहे. सर्व विषय घेऊन बसलेल्या व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या दोनच संधी श्रेणी-गुण सुधार योजनेअंतर्गत उपलब्ध होतील, असे कोकण विभागीय मंडळाने कळविले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीHSC Exam Resultबारावी निकाल