शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

रत्नागिरी नगरपरिषदेच्या नळपाणी योजनेबाबत ८ रोजी सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 5:01 PM

रत्नागिरी नगर परिषदेसाठी शासनाने मंजूर केलेली ५४ कोटी खर्चाची सुधारित नळपाणी योजना सत्ताधारी शिवसेना व विरोधक यांच्यातील दावे - प्रतिदाव्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

ठळक मुद्देशिवसेना व विरोधक यांच्यातील दावे - प्रतिदाव्यांमुळे योजना वादाच्या भोवऱ्यात विरोधी पक्षाच्या नगरसेवकांचे कोकण आयुक्तांकडे अर्ज

रत्नागिरी , दि. २८ : रत्नागिरी नगर परिषदेसाठी शासनाने मंजूर केलेली ५४ कोटी खर्चाची सुधारित नळपाणी योजना सत्ताधारी शिवसेना व विरोधक यांच्यातील दावे - प्रतिदाव्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

शासनाने मंजूर केलेल्या ५४ कोटींमध्ये या योजनेचे काम होणार नाही, असे दर्शवित एकूण ६३ कोटींच्या योजनेला नगर परिषदेत सत्ताधारी सेनेने मंजुरी दिली. हा विषय कोकण आयुक्तांकडे गेल्यानंतर त्यांनी योजना काम सुरू करण्यास तात्पुरती स्थगिती दिली होती. येत्या ८ नोव्हेंबरला आयुक्तांपुढे सुनावणी होणार आहे.

रत्नागिरी नगर परिषदेची सध्याच्या नळपाणी योजनेची वितरण व्यवस्था पूर्णत: बाद झाली आहे. शीळ धरणारून साळवी स्टॉप येथील जलशुध्दिकरण प्रकल्पापर्यंत येणारी मुख्य जलवाहिनी गंजल्याने पूर्णत: सडली आहे.

जागोजागी सडलेली ही मुख्य जलवाहिनी केव्हाही फुटेल, अशी भयावह स्थिती आहे. तसे झाले तर संपूर्ण शहरात पाण्याविना हाहाकार माजेल. गेल्या दहा वर्षात नळपाणी योजनेच्या वितरण वाहिनी बदलण्याबाबत, दुरुस्तीबाबत नगर परिषदेतील कारभाऱ्यांकडून कोणतेही प्रयत्न झाले नव्हते. त्यामुळे रत्नागिरीकरांना केवळ आश्वासनांचे पाणी पाजले जात होते.

राज्यात भाजपचे फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर रत्नागिरीचे तत्कालिन नगराध्यक्ष महेंद्र मयेकर व भाजपचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र तथा बाळ माने यांनी या योजनेसाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यामुळे आॅक्टोबर २०१६मध्ये राज्य शासनाने नगरोत्थान योजनेतून रत्नागिरीच्या सुधारित नळपाणी योजनेसाठी ५४ कोटी खर्चाला मंजुरी दिली.

त्यानंतर या योजनेची निविदा प्रक्रिया होईपर्यंत तब्बल ११ महिन्यांचा कालावधी उलटला आहे. निविदा प्रक्रिया पूर्णत्वास येत असताना ५४ कोटींमध्ये योजनेचे काम पूर्ण होणार नाही, असे निदर्शनास येताच सत्ताधारी सेनेचे नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी आणखी ९ कोटींच्या वाढीव खर्चाला नगर परिषद सभागृहात मंजुरी घेतली.

मात्र, या वाढीव खर्चाला नगर परिषदेतील राष्ट्रवादी कॉँग्रेस, भाजप व अपक्षांनी आक्षेप घेतला. वाढीव खर्च हा नगर परिषदेच्या फंडातून केला जाणार असल्याने त्याला विरोध दर्शवण्यात आला. या वाढीव खर्चाला विरोधकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे आक्षेप घेतला. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी आक्षेप फेटाळला.

विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी त्यानंतर कोकण आयुक्तांकडे अर्ज दाखल केल्यानंतर योजनेच्या कार्यवाहिला आयुक्तांनी स्थगिती दिली आहे. या आक्षेपांवर येत्या ८ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीWaterपाणी