माेबाईलवरून आई ओरडल्याने युवतीची आत्महत्या, रत्नागिरीतील घटना
By अरुण आडिवरेकर | Updated: May 23, 2023 19:23 IST2023-05-23T19:22:12+5:302023-05-23T19:23:15+5:30
सतत मोबाईलचा वापर करत असल्याच्या कारणातून तिला आई ओरडली होती.

माेबाईलवरून आई ओरडल्याने युवतीची आत्महत्या, रत्नागिरीतील घटना
रत्नागिरी : सतत माेबाईलचा वापर करत असल्याने आई ओरडल्याने शहरातील मुरुगवाडा येथील युवतीने समुद्रात उडी घेत आत्महत्या केल्याची घटना रविवारी (२१ मे) रात्री ८:३० वाजण्याच्या दरम्यान घडली. कीर्ती जयेश बोरकर (१९, रा. झाडगाव - मुरुगवाडा मिऱ्यारोड, रत्नागिरी) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.
सोमवारी रात्री कीर्ती घरात कोठेही न दिसल्याने तिच्या नातेवाईकांनी तिचा शोध घेतला असता ती पांढरा समुद्राच्या पाण्यात दिसली. नातेवाईकांनी आरडाओरडा केल्यावर आजूबाजूच्या नागरिकांनी तिला पाण्याबाहेर काढले. तिला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून रात्री ११:३० मृत घोषित केले.
दरम्यान, सतत मोबाईलचा वापर करत असल्याच्या कारणातून तिला आई ओरडली होती. या रागातून तिने रात्री पांढरा समुद्रात उडी मारुन आत्महत्या केल्याचे तपासात पुढे आले आहे. याप्रकरणी शहर पोलिस स्थानकात २२ मे राेजी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.