शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

आचारसंहितेचा विमान उड्डानाला लाल दिवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 11:32 AM

लोकसभा निवडणुकीमुळे रत्नागिरीतील विमानतळाचे काम रखडले आहे. विमान कंपनी सेवा देण्यास तयार असतानाही निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे रत्नागिरीतील विमान

ठळक मुद्देही योजना पूर्ण होण्यासाठी आणखीन विलंब होण्याची शक्यता आहे.

रत्नागिरी : लोकसभा निवडणुकीमुळे रत्नागिरीतील विमानतळाचे काम रखडले आहे. विमान कंपनी सेवा देण्यास तयार असतानाही निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे रत्नागिरीतील विमान उड्डानाला ‘ब्रेक’ लागला आहे.

सर्वसामान्यांना विमान प्रवास करता यावा, यासाठी केंद्र सरकारने  ‘उडान’ योजनेद्वारे बंद पडलेले विमानतळ व धावपट्ट्यांचे काम करून तेथून विमान सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत पहिल्या तीन टप्प्यात राज्यातील नाशिक, नांदेड, कोल्हापूर व जळगाव या विमानतळांवरून सामान्यांना परवडेल, अशी सेवा सुरू झाली आहे. त्यानंतर ‘उडान ३.१’ची घोषणा करण्यात आली होती. निवडणुकीच्या तोंडावरच ही घोषणा करण्यात आल्याने या योजनेला आचारसंहितेचा फटका बसला आहे.

‘उडान ३.१’मध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन शहरांना मुंबईशी जोडण्यासाठी सरकारी अलायन्स इंडिया या कंपनीने तयारी दर्शविली होती. कंपनीने ही तयारी दर्शवली असली तरी आचारसंहितेमुळे हे काम रखडले आहे. मात्र, पुण्याहून कोकणात सेवा देण्यासाठी कोणतीच कंपनी तयार नसल्याचे दिसत आहे. रत्नागिरी विमानतळ सध्या तटरक्षक दलाच्या ताब्यात आहे. पण आता लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे हे काम थांबले आहे. 

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता १० मार्च रोजी जाहीर करण्यात आली. ‘उडान’च्या नियमानुसार कोकणची विमानसेवा त्यानंतर सहा महिन्यात अर्थात ८ सप्टेंबरपूर्वी सुरू होणे अपेक्षित आहे. मात्र, आता हे काम आचारसंहिता संपल्यानंतरच सुरू होणार आहे.

सिंधुदुर्ग विमानतळ तयार

सिंधुदुर्गचा विमानतळ सध्या तयार आहे.  मात्र, रत्नागिरी विमानतळाचा विकास साधण्यासाठी आधीच एक महिना उलटून गेला आहे. निवडणूक संपण्यास आणखी किमान दीड महिन्याचा कालावधी आहे. त्यामुळे ही योजना सद्यस्थितीत रखडलेली आहे. ही योजना पूर्ण होण्यासाठी आणखीन विलंब होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीsindhudurgसिंधुदुर्ग