शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

माणसंं मेली तरी चालतील, आम्ही भांंडतच राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:35 IST

कोरोना महामारीमध्ये अनेक माणसं मेली. अनेक कुटुंबीयांचे होत्याचं नव्हतं झालं. कुणाचा पती गेला, कुणाचा मुलगा गेला, कुणाची मुलगी ...

कोरोना महामारीमध्ये अनेक माणसं मेली. अनेक कुटुंबीयांचे होत्याचं नव्हतं झालं. कुणाचा पती गेला, कुणाचा मुलगा गेला, कुणाची मुलगी गेली तर कुणाचे आई-वडील गेले. तर अनेक ठिकाणी अख्खे कुटुंबच कोरोनामुळे बळी गेले. त्यामुळे आज प्रत्येक गावात कोरोनामुळे अनेक संसार उद्ध्वस्त झाले आहेत. आई-वडिलांचे छत्र हरपल्याने त्या मुलांच्या भवितव्याचे काय, असे अनेक प्रश्न डोळ्यासमोर उभे राहतात. काही कुटुंबीयांची अशीही परिस्थिती आहे की वडील गेल्याची मुलाला कल्पना नाही तर पती गेल्याची त्यांच्या पत्नीला कल्पनाच नाही, अशी भयानक स्थिती आज पहावयास मिळत आहे. रत्नागिरीतील एका कुटुंबात तर आई, वडील, मुलगा आणि मुलगी अशी चारही माणसं कोरोनाने हिरावून घेतल्याने त्या कुटुंबाने करावयाचे काय. कल्पनाच करता येणार नाही, अशी परिस्थिती अनेक कुटुंबीयांवर ओढवली आहे. हे दु:ख कोणाला सांगणार. माणसं मेली तरी त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करायला नातेवाईकही पुढे येत नाहीत. प्रसंग कधी तरी आपल्यावरही येईल, असा विचारही करायला कोणी तयार नाहीत. कोरोनामुळे माणुसकीही हरवली आहे, असेच म्हणावे लागत आहे.

कोरोनाच्या विळख्यात सापडलेल्या संपूर्ण कुटुंबीयांची तर त्यापेक्षा भयानक परिस्थिती आहे. वडील कोरोनाने पॉझिटिव्ह झालेले असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर मुलगा, सून अचानक आजारी पडतात. त्यानंतर होणारी ससेहोलपट ही फार वाईट असते. कारण वडील रुग्णालयात, त्यांची सेवा करणाऱ्या चिरंजीवालाही कोरोनाची लागण झाल्याने त्याच्या मदतीसाठी कोण धावणार. तसेच त्या वडिलांना जेवण घेऊन जाणाराच जागेवर पडल्याने त्या कुटुंबाची काय अवस्था असेल ही परिस्थिती विचार करण्यापलीकडची आहे. त्यामुळे कोरोनामुळे फार दयनीय अवस्था निर्माण झाली आहे, हे न सांगण्यासारखे सत्य आहे. याची जाणीव राजकारण्यांना व्हायला पाहिजेत. कारण ते लोक जीव गमवावत असतानाच हे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात गुंतले आहेत. सर्वांनाच असे म्हणता येणार नाही. पण जास्तीत जास्त राजकीय मंडळी कुरघोड्या करण्यापलीकडे काही करीत नाहीत, असे चित्र पहावयास मिळत आहे.

कोरोना महामारी, चक्रीवादळ या गोष्टी काही राजकारण्यांसाठी नव्या राहिलेल्या नाहीत. यामध्ये राजकारण आणून केवळ आरोप-प्रत्यारोप करण्यापलीकडे काहीही काम करीत नाहीत. काही राजकारणी या महामारीमध्येही खालच्या थराचे राजकारण करीत आहेत. आपण स्वत: काही करायचं नाही आणि दुसरा कोणी काम करीत असेल त्याच्या तंगड्या खेचण्यातच धन्यता मानणाऱ्यांची संख्याही कमी नाही. त्यामुळे लोक मरताहेत, त्यांना वाचविण्यासाठी काही करण्याऐवजी घरी बसून नुसताच तमाशा पहावयाचा आणि नंतर त्याचा बाऊ करायचा, असा काहीसा प्रकार सुरू आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असतानाच रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या रुग्णांसाठी काहीतरी करावे, त्यांच्या कुटुंबीयांना मदतीचा हात पुढे करावा तसेच त्या रुग्णांना चांगली सेवा देण्याची धडपड करण्याची गरज आहे. पण परिस्थिती उलट आहे. लोक मेले तरी चालतील, पण आपण भांडतच राहू, आरोप करू, त्यातून काही निष्पन्न नाही झाले तरी चालेल, याला काय म्हणावे. माणुसकी मेली की जिवंत आहे?