शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

महापूर ओसरल्यानंतरही चिपळूणचे जनजीवन ठप्पच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:33 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क संदीप बांद्रे/चिपळूण : महापूर ओसरल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह अन्य नेत्यांनी ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

संदीप बांद्रे/चिपळूण : महापूर ओसरल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह अन्य नेत्यांनी चिपळुणात दौरे केले. मात्र, अजूनही चिपळूणकरांच्या हाती काहीही मदत किंवा सहकार्य लाभलेले नाही. उलट येथील जनजीवन आजही ठप्प असून, पूरग्रस्त नागरिकांना अन्नधान्य, कपडे, पाणी, वीज व पेट्रोल टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.

महापुरामुळे संपूर्ण बाजारपेठ उद्ध्वस्त झाली, हजारो गाड्या वाहून गेल्या, तर काही निकामी झाल्या. आता पूर ओसरून तीन दिवस झाले तरी आपत्ती व्यवस्थापनाच्या कामकाजात सुसूत्रता आलेली नाही. बाहेरच्या ठिकाणाहून येत असलेली मदत ठराविक ठिकाणी व रस्त्यालगत असलेल्या भागात होत आहे. परंतु, अंतर्गत भागात अजूनही मदत पोहोचलेली नाही. अनेक नागरिक अन्नधान्य व अन्य वस्तूंपासून वंचित आहेत. त्याशिवाय पुरासोबत कपडे, अंथरूण वाहून गेल्याने किमान चटई, ब्लँकेट मिळावे, अशी मागणी केली जात आहे.

चिपळूणकरांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिवांसोबत पाहणी दौरा केला. त्याचवेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप प्रदेश सरचिटणीस नीलेश राणे, माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार निरंजन डावखरे, भाजपचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू, माजी जिल्हाध्यक्ष बाळ माने, चिपळूणच्या नगराध्यक्ष सुरेखा खेराडे यांनीही पूरग्रस्त भागाची पाहणी केली. मात्र, आश्वासनांशिवाय अद्याप हाती काहीच पडलेले नाही.

शहरातील काही भागात पाणी पुरवठा होत नाही. अनेकांच्या घरात अजूनही अंधार आहे. पाच दिवसानंतरही बाजारपेठ व परिसरातील रस्त्यांवर आलेल्या चिखलातून मार्ग काढताना जीव मेटाकुटीला येत आहे.

-------------------------

मदत नक्की कधी मिळणार?

शहरात नुकसानाचे पंचनामे सुरु झाले आहेत. पण, हे पंचनामे अतिशय संथगतीने सुरू असल्याने मदत नक्की कधी मिळणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यातच काही व्यापाऱ्यांनी पंचनाम्याच्या प्रतीक्षेत दुकानेही उघडलेली नाहीत.

------------------------------

विमा कंपन्यांच्या नियमावलीने व्यापारी हैराण

बाजारपेठेतील केवळ ३० टक्के व्यापाऱ्यांनी दुकानातील मालाचा विमा उतरवला आहे. त्याव्यतिरिक्त ७० टक्के व्यापाऱ्यांकडे विमाच नाही. अशावेळी ज्यांच्याकडे विमा आहे व ज्यांच्याकडे विमा नाही, असे दोन पद्धतीने पंचनामे केले जात आहेत. परंतु, ज्यांच्याकडे विमा आहे ते व्यापारी विमा कंपन्यांच्या नियमावलीनेच हैराण झाले आहेत.

----------------------------------

चिपळूण बाजारपेठेत यापुढे व्यापार करु नये, अशी मानसिकता तयार झाली आहे. दुकानातील मालाचा विमा उतरवूनही सुरक्षितता नसेल व अशाप्रसंगी व्यापाऱ्यांना मदत मिळत नसेल तर व्यापार, व्यवसाय न केलेलाच बरा. आता तर अन्य ठिकाणी व्यापार करायला जावे, असे वाटू लागले आहे.

- अरुण भोजने, व्यापारी, चिपळूण.