शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
3
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
4
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
5
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
6
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
7
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
8
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन फेका
9
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
10
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
11
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
12
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
13
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
14
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
15
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
16
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
17
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
18
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
19
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
20
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण

महापूर ओसरल्यानंतरही चिपळूणचे जनजीवन ठप्पच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:33 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क संदीप बांद्रे/चिपळूण : महापूर ओसरल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह अन्य नेत्यांनी ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

संदीप बांद्रे/चिपळूण : महापूर ओसरल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह अन्य नेत्यांनी चिपळुणात दौरे केले. मात्र, अजूनही चिपळूणकरांच्या हाती काहीही मदत किंवा सहकार्य लाभलेले नाही. उलट येथील जनजीवन आजही ठप्प असून, पूरग्रस्त नागरिकांना अन्नधान्य, कपडे, पाणी, वीज व पेट्रोल टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.

महापुरामुळे संपूर्ण बाजारपेठ उद्ध्वस्त झाली, हजारो गाड्या वाहून गेल्या, तर काही निकामी झाल्या. आता पूर ओसरून तीन दिवस झाले तरी आपत्ती व्यवस्थापनाच्या कामकाजात सुसूत्रता आलेली नाही. बाहेरच्या ठिकाणाहून येत असलेली मदत ठराविक ठिकाणी व रस्त्यालगत असलेल्या भागात होत आहे. परंतु, अंतर्गत भागात अजूनही मदत पोहोचलेली नाही. अनेक नागरिक अन्नधान्य व अन्य वस्तूंपासून वंचित आहेत. त्याशिवाय पुरासोबत कपडे, अंथरूण वाहून गेल्याने किमान चटई, ब्लँकेट मिळावे, अशी मागणी केली जात आहे.

चिपळूणकरांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिवांसोबत पाहणी दौरा केला. त्याचवेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप प्रदेश सरचिटणीस नीलेश राणे, माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार निरंजन डावखरे, भाजपचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू, माजी जिल्हाध्यक्ष बाळ माने, चिपळूणच्या नगराध्यक्ष सुरेखा खेराडे यांनीही पूरग्रस्त भागाची पाहणी केली. मात्र, आश्वासनांशिवाय अद्याप हाती काहीच पडलेले नाही.

शहरातील काही भागात पाणी पुरवठा होत नाही. अनेकांच्या घरात अजूनही अंधार आहे. पाच दिवसानंतरही बाजारपेठ व परिसरातील रस्त्यांवर आलेल्या चिखलातून मार्ग काढताना जीव मेटाकुटीला येत आहे.

-------------------------

मदत नक्की कधी मिळणार?

शहरात नुकसानाचे पंचनामे सुरु झाले आहेत. पण, हे पंचनामे अतिशय संथगतीने सुरू असल्याने मदत नक्की कधी मिळणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यातच काही व्यापाऱ्यांनी पंचनाम्याच्या प्रतीक्षेत दुकानेही उघडलेली नाहीत.

------------------------------

विमा कंपन्यांच्या नियमावलीने व्यापारी हैराण

बाजारपेठेतील केवळ ३० टक्के व्यापाऱ्यांनी दुकानातील मालाचा विमा उतरवला आहे. त्याव्यतिरिक्त ७० टक्के व्यापाऱ्यांकडे विमाच नाही. अशावेळी ज्यांच्याकडे विमा आहे व ज्यांच्याकडे विमा नाही, असे दोन पद्धतीने पंचनामे केले जात आहेत. परंतु, ज्यांच्याकडे विमा आहे ते व्यापारी विमा कंपन्यांच्या नियमावलीनेच हैराण झाले आहेत.

----------------------------------

चिपळूण बाजारपेठेत यापुढे व्यापार करु नये, अशी मानसिकता तयार झाली आहे. दुकानातील मालाचा विमा उतरवूनही सुरक्षितता नसेल व अशाप्रसंगी व्यापाऱ्यांना मदत मिळत नसेल तर व्यापार, व्यवसाय न केलेलाच बरा. आता तर अन्य ठिकाणी व्यापार करायला जावे, असे वाटू लागले आहे.

- अरुण भोजने, व्यापारी, चिपळूण.