शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

रत्नागिरीच्या हापूस, काजू, मत्स्योत्पादनाचं तुटीचं अर्थकारण

By admin | Updated: March 23, 2015 00:33 IST

रत्नागिरी जिल्ह्यात एकूण ६५ हजार १०९ हेक्टर क्षेत्रावर आंबा पिकाची लागवड करण्यात आली आहे

मेहरून नाकाडे-रत्नागिरी  --पर्यावरणातील असमतोलामुळे दिवसेंदिवस हवामानावर विपरित परिणाम होत आहे. पावसाळा उशिरा सुरू होण्याबरोबर अवेळी पाऊस पडणे, तसेच नीचांकी तापमान व उच्चांक तापमानाचा सामना करावा लागत आहे. हवामानात सातत्याने होणारे बदलही जाणवू लागले आहेत. आंबा, काजूबरोबर जिल्ह्याचे मुख्य अर्थकारण मासेमारीवरही परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. माशांच्या उत्पादनातही मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात एकूण ६५ हजार १०९ हेक्टर क्षेत्रावर आंबा पिकाची लागवड करण्यात आली आहे. पैकी ५८ हजार ८३७ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम असून, नुकत्याच होऊन गेलेल्या अवकाळी पावसामुळे ४२ हजार ७३५ हेक्टर क्षेत्रावरील आंबापीक धोक्यात आले आहे. शिवाय जिल्ह्यातील ९१ हजार ५३० हेक्टर क्षेत्रावर काजूची लागवड करण्यात आली आहे. ८३ हजार २९२ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम असून, ५० हजार ९७६ हेक्टर क्षेत्र पावसामुळे बाधित झाल्याने पीक धोक्यात आले आहे. हवामानावर अवलंबून असलेल्या पिकांवर परिणाम होत असलेला दिसून येत आहे. अवेळचा पाऊस वगळता तापमान १७ ते १८ अंश सेल्सियसपेक्षा खाली आले तर फळ गळण्याबरोबर ३५ अंश सेल्सियसपेक्षा अधिक तापमान वाढल्यावर आंबा भाजतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. फयान वादळानंतर गेली चार ते पाच वर्षे वातावरणात सातत्याने बदल दिसून येत आहेत. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल किंवा मे मध्ये पाऊस पडल्याने आंबापिकाचे मोठ्या प्रमाणार नुकसान होते. गेल्या वर्षी मे महिन्यात झालेल्या पावसामुळे आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. रत्नागिरी जिल्ह्याबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्याला त्याचा जोरदार तडाखा बसला होता. गतवर्षी काजूचे १ लाख ४ हजार ८४७ मेट्रीक टन काजू उत्पादन प्राप्त झाले होेते. यावर्षी अवकाळी पावसामुळे ६१.२० टक्के नुकसान झाल्याने यावर्षी काजू उत्पादन घटले आहे. रत्नागिरी जिल्ह्याला सुमारे १५७ किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. किनारपट्टीवरील १०४ गावांतील १४ हजार ८१६ कुटुंब मासेमारी व्यवसायावर अवलंबून आहेत. जिल्ह्यात मच्छी उतरवणारी ४८ केंद्र आहेत. सुरमई, पापलेट, सरंगा आदी माशांच्या पैदासीवर परिणाम झाल्याने उत्पादन घटल्याचे दिसून येत आहे. पावसाळ्यातील तीन महिने मच्छिमारी बंद असली तरी उर्वरित नऊ महिने मासेमारी सुरू असते. मात्र, वादळी वारे किंवा हवामानातील बदलामुळे त्यावेळी मासेमारी बंद ठेवावी लागते. मात्र, संपूर्ण हंगामात मासेमारी कमी अधिक प्रमाणात सुरू असते. गेल्या पाच वर्षात मत्स्य उत्पादनातही घट झाल्याचे दिसून येत आहे. २००५-०६ मध्ये एक लाख ५ हजार ६९ मेट्रीक टन, २००६-०७ मध्ये एक लाख ९ हजार ५५ मेट्रीक टन, २००७-०८ मध्ये ८५ हजार ०९९, २००८-०९ मध्ये ७२ हजार १२२, २००९-१० मध्ये ७५ हजार १२२ मेट्रीक टन, २०१०-११ मध्ये ९५ हजार ९५० मेट्रीक टन, २०११-१२ मध्ये ८८ हजार ४३८ मेट्रीक टन, २०१२-१३ मध्ये ८७ हजार ६९० मेट्रीक टन उत्पादन मिळाले आहे. २०१३-१४ मध्ये १ लाख ६६५३ मेट्रीक टन उत्पादन मिळाले होते. गतवर्षी तारली माशामुळे मच्छिमार बांधवांचा जेमतेम खर्च निभावू शकला होता.गेल्या काही वर्षात पाऊस जूनमध्ये सुरू झाला तरी सातत्य नसते शिवाय तो अवेळी कधीही पडतो. आॅक्टोबर अखेरीस किंवा नोव्हेंबरपासून सुरू होणारी थंडी उशीरा सुरू होते. त्याचप्रमाणे १७ ते १८ अंश सेल्सियसपेक्षा तापमान खाली येत आहे. फेब्रुवारी, मार्चपर्यत थंडी पडत असते. वास्तविक होळीनंतर हवामानात बदल होतो. मे महिन्यात ३४ ते ३५ अंश सेल्सियस इतके तापमान असते. परंतु सध्या तर मार्चमध्येच हे तापमान अनुभवण्यास मिळत आहे. पर्यावरणाचा ऱ्हास हाच येथील आंबा, काजू किंवा मत्स्य उत्पादनावर परिणाम करणारा आहे. बेसुमार होणारी वृक्षतोड तसेच कारखानदारी यामुळे हवामानातील बदलावर परिणाम होत आहे. वास्तविक ६९ टक्के वनक्षेत्र आवश्यक असताना केवळ ३८ टक्के इतकेच आहे. पाऊसदेखील ठराविक कालावधीने पडत असल्यामुळे त्याचा परिणाम पिकाच्या उत्पादनावर होत आहे.- डॉ. श्रीरंग कद्रेकर, माजी कुलगुरू, कोकण कृषी विद्यापीठ, दापोली