शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
2
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
3
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
4
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
5
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
6
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
7
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
8
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
9
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
10
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
11
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
12
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
13
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
14
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
15
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
16
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
17
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
18
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
19
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
20
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर

रत्नागिरीच्या हापूस, काजू, मत्स्योत्पादनाचं तुटीचं अर्थकारण

By admin | Updated: March 23, 2015 00:33 IST

रत्नागिरी जिल्ह्यात एकूण ६५ हजार १०९ हेक्टर क्षेत्रावर आंबा पिकाची लागवड करण्यात आली आहे

मेहरून नाकाडे-रत्नागिरी  --पर्यावरणातील असमतोलामुळे दिवसेंदिवस हवामानावर विपरित परिणाम होत आहे. पावसाळा उशिरा सुरू होण्याबरोबर अवेळी पाऊस पडणे, तसेच नीचांकी तापमान व उच्चांक तापमानाचा सामना करावा लागत आहे. हवामानात सातत्याने होणारे बदलही जाणवू लागले आहेत. आंबा, काजूबरोबर जिल्ह्याचे मुख्य अर्थकारण मासेमारीवरही परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. माशांच्या उत्पादनातही मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात एकूण ६५ हजार १०९ हेक्टर क्षेत्रावर आंबा पिकाची लागवड करण्यात आली आहे. पैकी ५८ हजार ८३७ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम असून, नुकत्याच होऊन गेलेल्या अवकाळी पावसामुळे ४२ हजार ७३५ हेक्टर क्षेत्रावरील आंबापीक धोक्यात आले आहे. शिवाय जिल्ह्यातील ९१ हजार ५३० हेक्टर क्षेत्रावर काजूची लागवड करण्यात आली आहे. ८३ हजार २९२ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम असून, ५० हजार ९७६ हेक्टर क्षेत्र पावसामुळे बाधित झाल्याने पीक धोक्यात आले आहे. हवामानावर अवलंबून असलेल्या पिकांवर परिणाम होत असलेला दिसून येत आहे. अवेळचा पाऊस वगळता तापमान १७ ते १८ अंश सेल्सियसपेक्षा खाली आले तर फळ गळण्याबरोबर ३५ अंश सेल्सियसपेक्षा अधिक तापमान वाढल्यावर आंबा भाजतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. फयान वादळानंतर गेली चार ते पाच वर्षे वातावरणात सातत्याने बदल दिसून येत आहेत. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल किंवा मे मध्ये पाऊस पडल्याने आंबापिकाचे मोठ्या प्रमाणार नुकसान होते. गेल्या वर्षी मे महिन्यात झालेल्या पावसामुळे आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. रत्नागिरी जिल्ह्याबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्याला त्याचा जोरदार तडाखा बसला होता. गतवर्षी काजूचे १ लाख ४ हजार ८४७ मेट्रीक टन काजू उत्पादन प्राप्त झाले होेते. यावर्षी अवकाळी पावसामुळे ६१.२० टक्के नुकसान झाल्याने यावर्षी काजू उत्पादन घटले आहे. रत्नागिरी जिल्ह्याला सुमारे १५७ किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. किनारपट्टीवरील १०४ गावांतील १४ हजार ८१६ कुटुंब मासेमारी व्यवसायावर अवलंबून आहेत. जिल्ह्यात मच्छी उतरवणारी ४८ केंद्र आहेत. सुरमई, पापलेट, सरंगा आदी माशांच्या पैदासीवर परिणाम झाल्याने उत्पादन घटल्याचे दिसून येत आहे. पावसाळ्यातील तीन महिने मच्छिमारी बंद असली तरी उर्वरित नऊ महिने मासेमारी सुरू असते. मात्र, वादळी वारे किंवा हवामानातील बदलामुळे त्यावेळी मासेमारी बंद ठेवावी लागते. मात्र, संपूर्ण हंगामात मासेमारी कमी अधिक प्रमाणात सुरू असते. गेल्या पाच वर्षात मत्स्य उत्पादनातही घट झाल्याचे दिसून येत आहे. २००५-०६ मध्ये एक लाख ५ हजार ६९ मेट्रीक टन, २००६-०७ मध्ये एक लाख ९ हजार ५५ मेट्रीक टन, २००७-०८ मध्ये ८५ हजार ०९९, २००८-०९ मध्ये ७२ हजार १२२, २००९-१० मध्ये ७५ हजार १२२ मेट्रीक टन, २०१०-११ मध्ये ९५ हजार ९५० मेट्रीक टन, २०११-१२ मध्ये ८८ हजार ४३८ मेट्रीक टन, २०१२-१३ मध्ये ८७ हजार ६९० मेट्रीक टन उत्पादन मिळाले आहे. २०१३-१४ मध्ये १ लाख ६६५३ मेट्रीक टन उत्पादन मिळाले होते. गतवर्षी तारली माशामुळे मच्छिमार बांधवांचा जेमतेम खर्च निभावू शकला होता.गेल्या काही वर्षात पाऊस जूनमध्ये सुरू झाला तरी सातत्य नसते शिवाय तो अवेळी कधीही पडतो. आॅक्टोबर अखेरीस किंवा नोव्हेंबरपासून सुरू होणारी थंडी उशीरा सुरू होते. त्याचप्रमाणे १७ ते १८ अंश सेल्सियसपेक्षा तापमान खाली येत आहे. फेब्रुवारी, मार्चपर्यत थंडी पडत असते. वास्तविक होळीनंतर हवामानात बदल होतो. मे महिन्यात ३४ ते ३५ अंश सेल्सियस इतके तापमान असते. परंतु सध्या तर मार्चमध्येच हे तापमान अनुभवण्यास मिळत आहे. पर्यावरणाचा ऱ्हास हाच येथील आंबा, काजू किंवा मत्स्य उत्पादनावर परिणाम करणारा आहे. बेसुमार होणारी वृक्षतोड तसेच कारखानदारी यामुळे हवामानातील बदलावर परिणाम होत आहे. वास्तविक ६९ टक्के वनक्षेत्र आवश्यक असताना केवळ ३८ टक्के इतकेच आहे. पाऊसदेखील ठराविक कालावधीने पडत असल्यामुळे त्याचा परिणाम पिकाच्या उत्पादनावर होत आहे.- डॉ. श्रीरंग कद्रेकर, माजी कुलगुरू, कोकण कृषी विद्यापीठ, दापोली