शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
2
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
3
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
4
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
5
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
6
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
7
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
8
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
9
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
10
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
11
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
12
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
13
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
14
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
15
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
16
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
17
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
18
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
19
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
20
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?

रत्नागिरीच्या हापूस, काजू, मत्स्योत्पादनाचं तुटीचं अर्थकारण

By admin | Updated: March 23, 2015 00:33 IST

रत्नागिरी जिल्ह्यात एकूण ६५ हजार १०९ हेक्टर क्षेत्रावर आंबा पिकाची लागवड करण्यात आली आहे

मेहरून नाकाडे-रत्नागिरी  --पर्यावरणातील असमतोलामुळे दिवसेंदिवस हवामानावर विपरित परिणाम होत आहे. पावसाळा उशिरा सुरू होण्याबरोबर अवेळी पाऊस पडणे, तसेच नीचांकी तापमान व उच्चांक तापमानाचा सामना करावा लागत आहे. हवामानात सातत्याने होणारे बदलही जाणवू लागले आहेत. आंबा, काजूबरोबर जिल्ह्याचे मुख्य अर्थकारण मासेमारीवरही परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. माशांच्या उत्पादनातही मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात एकूण ६५ हजार १०९ हेक्टर क्षेत्रावर आंबा पिकाची लागवड करण्यात आली आहे. पैकी ५८ हजार ८३७ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम असून, नुकत्याच होऊन गेलेल्या अवकाळी पावसामुळे ४२ हजार ७३५ हेक्टर क्षेत्रावरील आंबापीक धोक्यात आले आहे. शिवाय जिल्ह्यातील ९१ हजार ५३० हेक्टर क्षेत्रावर काजूची लागवड करण्यात आली आहे. ८३ हजार २९२ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम असून, ५० हजार ९७६ हेक्टर क्षेत्र पावसामुळे बाधित झाल्याने पीक धोक्यात आले आहे. हवामानावर अवलंबून असलेल्या पिकांवर परिणाम होत असलेला दिसून येत आहे. अवेळचा पाऊस वगळता तापमान १७ ते १८ अंश सेल्सियसपेक्षा खाली आले तर फळ गळण्याबरोबर ३५ अंश सेल्सियसपेक्षा अधिक तापमान वाढल्यावर आंबा भाजतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. फयान वादळानंतर गेली चार ते पाच वर्षे वातावरणात सातत्याने बदल दिसून येत आहेत. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल किंवा मे मध्ये पाऊस पडल्याने आंबापिकाचे मोठ्या प्रमाणार नुकसान होते. गेल्या वर्षी मे महिन्यात झालेल्या पावसामुळे आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. रत्नागिरी जिल्ह्याबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्याला त्याचा जोरदार तडाखा बसला होता. गतवर्षी काजूचे १ लाख ४ हजार ८४७ मेट्रीक टन काजू उत्पादन प्राप्त झाले होेते. यावर्षी अवकाळी पावसामुळे ६१.२० टक्के नुकसान झाल्याने यावर्षी काजू उत्पादन घटले आहे. रत्नागिरी जिल्ह्याला सुमारे १५७ किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. किनारपट्टीवरील १०४ गावांतील १४ हजार ८१६ कुटुंब मासेमारी व्यवसायावर अवलंबून आहेत. जिल्ह्यात मच्छी उतरवणारी ४८ केंद्र आहेत. सुरमई, पापलेट, सरंगा आदी माशांच्या पैदासीवर परिणाम झाल्याने उत्पादन घटल्याचे दिसून येत आहे. पावसाळ्यातील तीन महिने मच्छिमारी बंद असली तरी उर्वरित नऊ महिने मासेमारी सुरू असते. मात्र, वादळी वारे किंवा हवामानातील बदलामुळे त्यावेळी मासेमारी बंद ठेवावी लागते. मात्र, संपूर्ण हंगामात मासेमारी कमी अधिक प्रमाणात सुरू असते. गेल्या पाच वर्षात मत्स्य उत्पादनातही घट झाल्याचे दिसून येत आहे. २००५-०६ मध्ये एक लाख ५ हजार ६९ मेट्रीक टन, २००६-०७ मध्ये एक लाख ९ हजार ५५ मेट्रीक टन, २००७-०८ मध्ये ८५ हजार ०९९, २००८-०९ मध्ये ७२ हजार १२२, २००९-१० मध्ये ७५ हजार १२२ मेट्रीक टन, २०१०-११ मध्ये ९५ हजार ९५० मेट्रीक टन, २०११-१२ मध्ये ८८ हजार ४३८ मेट्रीक टन, २०१२-१३ मध्ये ८७ हजार ६९० मेट्रीक टन उत्पादन मिळाले आहे. २०१३-१४ मध्ये १ लाख ६६५३ मेट्रीक टन उत्पादन मिळाले होते. गतवर्षी तारली माशामुळे मच्छिमार बांधवांचा जेमतेम खर्च निभावू शकला होता.गेल्या काही वर्षात पाऊस जूनमध्ये सुरू झाला तरी सातत्य नसते शिवाय तो अवेळी कधीही पडतो. आॅक्टोबर अखेरीस किंवा नोव्हेंबरपासून सुरू होणारी थंडी उशीरा सुरू होते. त्याचप्रमाणे १७ ते १८ अंश सेल्सियसपेक्षा तापमान खाली येत आहे. फेब्रुवारी, मार्चपर्यत थंडी पडत असते. वास्तविक होळीनंतर हवामानात बदल होतो. मे महिन्यात ३४ ते ३५ अंश सेल्सियस इतके तापमान असते. परंतु सध्या तर मार्चमध्येच हे तापमान अनुभवण्यास मिळत आहे. पर्यावरणाचा ऱ्हास हाच येथील आंबा, काजू किंवा मत्स्य उत्पादनावर परिणाम करणारा आहे. बेसुमार होणारी वृक्षतोड तसेच कारखानदारी यामुळे हवामानातील बदलावर परिणाम होत आहे. वास्तविक ६९ टक्के वनक्षेत्र आवश्यक असताना केवळ ३८ टक्के इतकेच आहे. पाऊसदेखील ठराविक कालावधीने पडत असल्यामुळे त्याचा परिणाम पिकाच्या उत्पादनावर होत आहे.- डॉ. श्रीरंग कद्रेकर, माजी कुलगुरू, कोकण कृषी विद्यापीठ, दापोली