शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
4
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
5
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
6
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
7
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
8
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
9
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
10
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
11
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
12
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
13
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
14
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
15
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
16
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
17
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
18
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
19
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
20
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज

नाना पाटेकर यांच्या ‘नाम’मुळे काेकणातील अनेक गावे झाली जलसमृद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : नाम फाऊंडेशनच्या मदतीने कोकणातील अनेक गावांमधील ग्रामस्थांनी एकत्र येत नदी, ओढे, तलाव गाळमुक्त करून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : नाम फाऊंडेशनच्या मदतीने कोकणातील अनेक गावांमधील ग्रामस्थांनी एकत्र येत नदी, ओढे, तलाव गाळमुक्त करून जलक्रांती करून पाणीटंचाईला रोखले आहे. या गावांनी दिलेल्या ‘जल है, तो कल है’च्या संदेशातून प्रेरणा घेत आता कोकणातील अनेक गावे नामच्या मदतीने जलक्रांतीसाठी पुढे येत आहेत.

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या संकल्पनेतून भविष्यातील पाण्याचे मोठे संकट लक्षात घेऊन ‘जल है, तो कल है’च्या जनजागृतीसाठी नाम फाऊंडेशनची स्थापना केली. केवळ जनजागृतीसाठीच नाही, तर प्रत्यक्ष जलक्रांती करण्यासाठी अनेक गावांना उद्युक्त करीत त्यासाठी त्यांना अद्यावत यंत्रसामग्री अनेक महिने मोफत उपलब्ध करून दिली. नाना पाटेकरांच्या नामचे कार्य अल्पावधीतच खेडोपाडी पोहोचले.

कोकणात पाऊस खूप पडतो, तरीही मार्च-एप्रिलपासून पाणीटंचाईला सुरुवात होते. त्यामुळे कोकणात गाळाच्या समस्येबरोबरच ‘पाणी अडवा-पाणी जिरवा’ याबाबत जागृती होणे गरजेचे असल्याने नामचे नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी कोकणाकडे लक्ष केंद्रित केले. रत्नागिरी जिल्ह्यात २०१६ मध्ये नाम फाऊंडेशनने चिपळूण आणि परिसरातील ९ शाळांमध्ये अडीच हजार झाडे लावून आपल्या कार्याला सुरुवात केली. त्यानंतर संगमेश्वर तालुक्यातील कोंड असुर्डे या दुर्गम भागात कोकणातील पहिल्या जलसमृद्धीच्या प्रकल्पाचा प्रारंभ झाला. या ग्रामस्थांची एकी वाखाणण्याजोगी होती. प्रत्येक घरातून २०० रुपये वर्गणी काढून, मुंबईस्थित ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन मुंबईत पारंपरिक कार्यक्रम करून गोळा झालेल्या निधीतून या गावाने नदीतील गाळ उपसा करून गावातील पाणीटंचाई दूर केली. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काेळोशी येथील ग्रामस्थांच्या एकीतून आणि नामच्या माध्यमातून पाझर तलावाचे काम हा महत्त्वाकांक्षी प्रकल्पच मानायला हवा. नामकडून मशीनरी मोफत पुरविली जाते. फक्त त्यासाठी लागणारा डिझेलचा खर्च त्या गावाला करावा लागतो.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावांमध्ये नामच्या माध्यमातून कामाला सुरुवात झाल्यानंतर काही गावांमध्ये स्वत: नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे यांच्याहस्ते कामांचा प्रारंभ झाला. कोकणातील या कामांमध्ये या दोघांसोबतच मुख्य समन्वयक गणेश थोरात, जलतज्ज्ञ डाॅ. अजित गोखले, कोकण समन्वयक समीर जानवलकर, अविनाश गोखले, राजीव सावंत तसेच नामचे दापोली प्रतिनिधी योगेश पिंपळे, समीर पाटील, लांजाचे प्रकाश सावंत, पाटोळे, गुहागरचे हेमंत चव्हाण, रत्नागिरीचे राजेंद्र चव्हाण, नीलेश मुळ्ये, चिपळूणचे महेंद्र कासेकर, रमण डांगे, राजापूरचे रघुवीर बापट, संगमेश्वरचे रोहित सावंत, भगवत सिंह चुनदावत, खेडचे सुनील आंबरे, अंकुश विचारे यांचे योगदान महत्त्वाचे आहे.

यावर्षी नामच्या संपर्कात असलेल्या संगमेश्वर, आरवली, हरचेरी, सांगवे, मंडणगड, हेदवी, दाभोळे, सिंधुदुर्गातील नांदोसकट्टा तसेच देवळे येथे अपूर्ण राहिलेले काम नामच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. राजकारणविरहीत सुरू असलेल्या नामच्या कार्यामुळे कोकणातील अनेक गावे जलसमृद्ध झाली आहेत, होत आहेत

.............................

नाम फाऊंडेशन गावांमध्ये काम करण्यासाठी सदैव तयार आहे. ग्रामस्थांनी राजकारणविरहीत पाण्याचे दुर्भिक्ष्य दूर करण्यासाठी एकत्र यायला हवे. प्रत्येक ठिकाणी झाडे लावली, तर जमिनीची धूप थांबेल. भविष्यातील पाणीसंकट लक्षात घेऊन आताच काम करायला हवे.

- समीर जानवलकर, कोकण समन्वयक, नाम फाऊंडेशन