शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

नुकसानग्रस्तांना २ कोटी अनुदान वाटप

By admin | Updated: October 27, 2015 00:09 IST

संगमेश्वर तालुका : मंडल स्तरावर २ रोजी विशेष मोहीम

मार्लेश्वर : संगमेश्वर तालुक्यात फेब्रुवारी व मार्चमध्ये अवेळी पाऊस व गारपीट झाली होती. यामध्ये तालुक्यातील अनेक आंबा व काजू शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यापैकी १ हजार ५४६ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून आतापर्यंत २ कोटी ७०८ रुपये इतके अनुदान वाटप करण्यात आले आहे. उर्वरित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जलदगतीने अनुदान प्राप्त होण्यासाठी २ नोव्हेंबर रोजी मंडल स्तरावर विशेष मोहीम हाती घेण्यात येणार आहे.तालुुक्यात फेब्रुवारी व मार्च २०१५ मध्ये अवकाळी पाऊस व गारपीट मोठ्या प्रमाणात झाली होती. यामध्ये आंबा व काजू पिकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. त्यामुळे शासनाकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी करण्यात आली होती. यानंतर कृ षी विभागामार्फ त पंचनामे करण्यात आले होते. याचा अहवाल महसूल विभागाकडे सादर करण्यात आला होता.मात्र, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या सातबारावर असलेल्या सर्व व्यक्तींचे संमत्तीपत्र जोडण्याची जाचक अट शासनाने घातल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्याच्या घरातील काही मंडळी कामानिमित्त मुंबई, पुणे सारख्या मोठमोठ्या शहरात बाहेरगावी असतात. अशावेळी केवळ काही हजार रुपये नुकसान भरपाई मिळण्यापोटी या सर्वांना संमत्तीपत्रासाठी वेगवेगळ्या ठिकाणांहून बोलावणे शक्य नसल्याचे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे शासनाने संमत्तीपत्राची जाचक अट रद्द करावी, अशी आग्रही मागणी होत आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ अनुदान मिळावे, यासाठी शासनाकडून मंडल स्तरावर ही विशेष मोहीम राबवण्यात येत असून, अनुदानाची रक्कम संबंधित शेतकऱ्याच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी २ नोव्हेंबर रोजी आपली परिपूर्ण माहिती मंडल अधिकारी कार्यालयात सादर करावी, असे आवाहन तहसील कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. (वार्ताहर)संगमेश्वर तालुक्यातील आंबा व काजू नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाकडून सुमारे १३ कोटी ८५ लाख २२ हजार ५०० रुपये इतके अनुदान प्राप्त झाले आहे. परिपूर्ण कागदपत्र सादर केलेल्या १ हजार ५४६ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने २ कोटी ७०८ रुपये इतके अनुदान वाटप केले आहे. परंतु, उर्वरित ११ कोटी ८५ लाख २१ हजार ७१२ रुपयांचे अनुदान शासन केव्हा देणार? असा प्रश्न नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. ही मदत तात्काळ मिळण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे. मात्र, काही त्रुटींमुळे ही मदत रखडली आहे.