शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
2
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
3
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
4
Breaking: भाजपचे जोरदार धक्कातंत्र! उज्ज्वल निकमांना लोकसभेची उमेदवारी; पूनम महाजनांचे तिकीट कापले
5
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
6
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
7
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
8
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
9
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
10
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
11
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
12
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
13
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
14
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
15
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
16
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
17
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
18
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
19
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
20
Sadguru Diet: सद्गुरू सांगताहेत बॅलेन्स डाएटचा कानमंत्र; वजन कमी होईल आणि नियंत्रितही राहील!

साखरपा धरणातून गळतीमुळे धोका, अधिकाऱ्यांकडून धरणाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 6:01 PM

संतोष पोटफोडेसाखरपा : संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव - साखरपा धरणाला गळती लागली आहे. धरणाची तातडीने दुरूस्ती न झाल्यास ५०० घरांना धोका आहे. शनिवारी पाटबंधारे खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी धरणाची पाहणी केली.तत्कालिन राज्यमंत्री रवींद्र माने यांच्या प्रयत्नाने साखरपा येथे धरण बांधण्यात आले. १९९५ साली या धरणाच्या कामाला सुरुवात झाली. २००० साली काम पूर्ण ...

ठळक मुद्दे तालुक्यातील कोंडगाव - साखरपा परिसरातील पाचशे घरे भीतीच्या छायेत धरणाला मोठे भगदाड पडून ते फुटण्याची शक्यता

संतोष पोटफोडे

साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव - साखरपा धरणाला गळती लागली आहे. धरणाची तातडीने दुरूस्ती न झाल्यास ५०० घरांना धोका आहे. शनिवारी पाटबंधारे खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी धरणाची पाहणी केली.तत्कालिन राज्यमंत्री रवींद्र माने यांच्या प्रयत्नाने साखरपा येथे धरण बांधण्यात आले. १९९५ साली या धरणाच्या कामाला सुरुवात झाली. २००० साली काम पूर्ण होऊन पाणीसाठा करण्यास सुरुवात झाली. तत्कालिन ठेकेदार चन्ना रेड्डी यांनी या धरणाचे काम घेतले होते. प्रथम धरणातून गढूळ पाणी येत असल्याचे निवृत्त प्राथमिक शिक्षक दत्ताराम शिंदे यांच्या निदर्शनास आले.

हे गढूळ पाणी कोठून येते, याची खातरजमा करण्यासाठी दत्ताराम शिंदे यांनी धरण परिसरात पाहणी केली असता, धरणाच्या जॅकवेल शेजारील भिंतीमधून तळाच्या भागातून पाणी येत असल्याचा अंदाज त्यांनी बांधला. शिंदे यांना गळती होत असल्याची पक्की खात्री पटताच त्यांनी त्वरित पाटबंधारे विभागाशी संपर्क साधला.

या घटनेचे गांभीर्य ओळखून लांजा पाटबंधारे विभागाचे लवंदे व नलावडे हे घटनास्थळी दाखल झाले. प्रथम १६ तारखेला त्यानंतर १७ व २० आॅक्टोबर रोजी रत्नागिरी विभागाचे अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर २८ आॅक्टोबरला गडगडी प्रकल्पाच्या प्रसादे मॅडम यांनी धरणाची पाहणी केली. या सर्वांनी धरणाला शंभर टक्के धोका असल्याचा निष्कर्ष काढला असून, धरणाची त्वरित दुरुस्ती केली नाही तर धरणाला मोठे भगदाड पडून ते फुटण्याची शक्यता आहे.धरणाची गळती सुरु असताना याबाबतची कल्पना सरपंचांना व पोलीसपाटीलांना का देण्यात आली नाही, धरणापासून सुमारे १०० ते १५० मीटर अंतरावर वस्ती असतानाही खबरदारीचा म्हणून त्यांना का कळविण्यात आले नाही, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. यापूर्वी धरण पूर्ण भरल्यावर पोलीस पाटलांना कळविले जात असे. मात्र धरण धोकादायक स्थितीत असताना संबंधित अधिकाऱ्यांनी पोलीस पाटलांना कळविण्याची तसदीदेखील घेतली नाही.

धरणाची देखरेख करण्यासाठी पाडावे नामक व्यक्ती सुरक्षारक्षक म्हणून सुमारे १० वर्षे काम करीत होते. मात्र, सध्या येथे सुरक्षा रक्षकच नाही. धरणाच्या आजूबाजूला जंगल असल्याने गुराखी जनावरांना चरण्यासाठी नेतात. याआधी पाटबंधारे विभागाचे अभियंता लवंदे यांच्याकडून धरणाची देखरेख होत होती. मात्र, त्यांच्या बदलीनंतर धरणाकडे दुर्लक्ष होत गेल्याचे शिंदे यांनी सांगितले.सुमारे पाचशे घरांना धोकाधरणापासून १०० ते १५० मीटर अंतरावर असणाऱ्या जोयशीवाडी, बौद्धवाडी, बार्इंगवाडी, केतकरआळी, मच्छीमार्के ट परिसरातील घरांना धरणाचा धोका असून, यामध्ये ग्रामदेवता गांगेश्वर मंदिर, जांगळदेव मंदिर, प्राथमिक शाळा, तु. ग. गांधी विद्यालय, सान बार्इंगवाडी येथील प्राथमिक शाळा, अंगणवाडी, मच्छीमार्के ट परिसरातील वस्ती व कार्यालये यांनाही धोका पोहोचू शकतो. एवढे असूनदेखील पोलीसपाटीलांना कल्पना का देण्यात आली नाही, याचीदेखील चौकशी करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीDamधरण