शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३१ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
3
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
4
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
5
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
6
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
7
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
8
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
9
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
10
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
11
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
12
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
13
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
14
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
15
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
16
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
17
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
18
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
19
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
20
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'

CoronaVirus News: राज्यातील 'या' जिल्ह्यात १ जुलैपासून पुन्हा कडक लॉकडाऊन; प्रशासनाने केले जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2020 15:34 IST

लॉकडाऊनच्या कालावधीत सर्व प्रवासी वाहतूक शंभर टक्के बंद राहिल.

ठळक मुद्देऑपरेशन ब्रेक द चेन’चा निर्णयअत्यावश्यक सेवेतील दुकाने, दवाखाने व इतर अत्यावश्यक बाबी सुरु राहणार

रत्नागिरी :  रत्नागिरी जिल्ह्यात दररोज कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळू लागले आहेत. कोरोनाची ही साखळी खंडित करण्यासाठी १ ते ८ जुलै या कालावधीत १०० टक्के लॉकडाऊन करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांनी रविवारी संयुक्तरित्या घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

या पत्रकार परिषदेला निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड उपस्थित होते. त्यांनी सांगितले की, रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या ५५६ आहे. कोरोनाबाधितांची संख्या शून्यावर आणण्यासाठी व कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यपातळीवर संबंधितांशी चर्चा करुनच जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन करण्यात येणार आहे. रत्नागिरी शहरात आणि दापोलीतील २ गावात  कोरोना रुग्णांचा कोणताही इतिहास  नसल्याने जिल्ह्यात समूह संक्रमणाचा धोका वाढला आहे. त्यामुळेच जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

‘ऑपरेशन ब्रेक द चेन’ हा निर्णय जिल्हावासियांच्या हिताच्या दृष्टीने घेतल्याचे सामंत यांनी सांगितले. जिल्ह्यात दि. १ ते ८ जुलैपर्यंत सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहे़ सायंकाळी ५ ते सकाळी ९ वाजेपर्यंत कडक संचारबंदी राहणार आहे. या कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणालाही घराबाहेर पडता येणार नाही.

जिल्ह्याच्या सीमा बंद

लॉकडाऊनच्या कालावधीत सर्व प्रवासी वाहतूक शंभर टक्के बंद राहिल. जिल्ह्यात येण्यासाठी बंदी घालण्यात आली असून, जिल्हा बाहेर जाणाऱ्या मालवाहू वाहनांना परवानगी देण्यात येणार आहे. जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद राहतील. नागरिकांनी घरातच राहून कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी सहकार्य करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

टास्क फोर्सची स्थापना

लॉकडाऊनबरोबरच कोरोना व्यतिरिक्त अन्य रुग्णांना सेवा मिळण्यासाठी स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांची मदत घेतली जाणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत टास्क फोर्सची स्थापना करण्यात येणार आहे. तर जिल्हा रुग्णालय स्तरावर कॉलसेंटर सुरु केली जाईल. त्या माध्यमातून रुग्ण, नातेवाईकांना मदत केली जाईल.

रत्नागिरीतही प्लाजमा थेरेपी 

मुंबई, पुण्यात सुरु असलेली प्लाजमा थेरेपी रत्नागिरीतही सुरु करण्यात येणार आहे़ या थेरपीद्वारे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहेत. त्यासाठी जिल्ह्यातील डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यात आल्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले़

मृतदेह रुग्णालयातच पडून

जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना चुकीची माहिती दिल्यामुळे एक मृतदेह दोन दिवस रुग्णालयातच पडून होता. जिल्हा रुग्णालयातील या गंभीर प्रकाराची दखल घेऊन एक सदस्य समिती स्थापन करण्याचे आदेश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत. दोन दिवसात या प्रकाराची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याचे आदेश सामंत यांनी दिले आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याUday Samantउदय सामंतMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारRatnagiriरत्नागिरी