शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: राज्यातील 'या' जिल्ह्यात १ जुलैपासून पुन्हा कडक लॉकडाऊन; प्रशासनाने केले जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2020 15:34 IST

लॉकडाऊनच्या कालावधीत सर्व प्रवासी वाहतूक शंभर टक्के बंद राहिल.

ठळक मुद्देऑपरेशन ब्रेक द चेन’चा निर्णयअत्यावश्यक सेवेतील दुकाने, दवाखाने व इतर अत्यावश्यक बाबी सुरु राहणार

रत्नागिरी :  रत्नागिरी जिल्ह्यात दररोज कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळू लागले आहेत. कोरोनाची ही साखळी खंडित करण्यासाठी १ ते ८ जुलै या कालावधीत १०० टक्के लॉकडाऊन करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांनी रविवारी संयुक्तरित्या घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

या पत्रकार परिषदेला निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड उपस्थित होते. त्यांनी सांगितले की, रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या ५५६ आहे. कोरोनाबाधितांची संख्या शून्यावर आणण्यासाठी व कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यपातळीवर संबंधितांशी चर्चा करुनच जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन करण्यात येणार आहे. रत्नागिरी शहरात आणि दापोलीतील २ गावात  कोरोना रुग्णांचा कोणताही इतिहास  नसल्याने जिल्ह्यात समूह संक्रमणाचा धोका वाढला आहे. त्यामुळेच जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

‘ऑपरेशन ब्रेक द चेन’ हा निर्णय जिल्हावासियांच्या हिताच्या दृष्टीने घेतल्याचे सामंत यांनी सांगितले. जिल्ह्यात दि. १ ते ८ जुलैपर्यंत सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहे़ सायंकाळी ५ ते सकाळी ९ वाजेपर्यंत कडक संचारबंदी राहणार आहे. या कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणालाही घराबाहेर पडता येणार नाही.

जिल्ह्याच्या सीमा बंद

लॉकडाऊनच्या कालावधीत सर्व प्रवासी वाहतूक शंभर टक्के बंद राहिल. जिल्ह्यात येण्यासाठी बंदी घालण्यात आली असून, जिल्हा बाहेर जाणाऱ्या मालवाहू वाहनांना परवानगी देण्यात येणार आहे. जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद राहतील. नागरिकांनी घरातच राहून कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी सहकार्य करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

टास्क फोर्सची स्थापना

लॉकडाऊनबरोबरच कोरोना व्यतिरिक्त अन्य रुग्णांना सेवा मिळण्यासाठी स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांची मदत घेतली जाणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत टास्क फोर्सची स्थापना करण्यात येणार आहे. तर जिल्हा रुग्णालय स्तरावर कॉलसेंटर सुरु केली जाईल. त्या माध्यमातून रुग्ण, नातेवाईकांना मदत केली जाईल.

रत्नागिरीतही प्लाजमा थेरेपी 

मुंबई, पुण्यात सुरु असलेली प्लाजमा थेरेपी रत्नागिरीतही सुरु करण्यात येणार आहे़ या थेरपीद्वारे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहेत. त्यासाठी जिल्ह्यातील डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यात आल्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले़

मृतदेह रुग्णालयातच पडून

जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना चुकीची माहिती दिल्यामुळे एक मृतदेह दोन दिवस रुग्णालयातच पडून होता. जिल्हा रुग्णालयातील या गंभीर प्रकाराची दखल घेऊन एक सदस्य समिती स्थापन करण्याचे आदेश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत. दोन दिवसात या प्रकाराची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याचे आदेश सामंत यांनी दिले आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याUday Samantउदय सामंतMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारRatnagiriरत्नागिरी