शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
2
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
3
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
4
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
5
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
6
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
7
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
8
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
9
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
10
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
11
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
12
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
13
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
14
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
15
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
16
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
17
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
18
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
20
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: राज्यातील 'या' जिल्ह्यात १ जुलैपासून पुन्हा कडक लॉकडाऊन; प्रशासनाने केले जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2020 15:34 IST

लॉकडाऊनच्या कालावधीत सर्व प्रवासी वाहतूक शंभर टक्के बंद राहिल.

ठळक मुद्देऑपरेशन ब्रेक द चेन’चा निर्णयअत्यावश्यक सेवेतील दुकाने, दवाखाने व इतर अत्यावश्यक बाबी सुरु राहणार

रत्नागिरी :  रत्नागिरी जिल्ह्यात दररोज कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळू लागले आहेत. कोरोनाची ही साखळी खंडित करण्यासाठी १ ते ८ जुलै या कालावधीत १०० टक्के लॉकडाऊन करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांनी रविवारी संयुक्तरित्या घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

या पत्रकार परिषदेला निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड उपस्थित होते. त्यांनी सांगितले की, रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या ५५६ आहे. कोरोनाबाधितांची संख्या शून्यावर आणण्यासाठी व कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यपातळीवर संबंधितांशी चर्चा करुनच जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन करण्यात येणार आहे. रत्नागिरी शहरात आणि दापोलीतील २ गावात  कोरोना रुग्णांचा कोणताही इतिहास  नसल्याने जिल्ह्यात समूह संक्रमणाचा धोका वाढला आहे. त्यामुळेच जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

‘ऑपरेशन ब्रेक द चेन’ हा निर्णय जिल्हावासियांच्या हिताच्या दृष्टीने घेतल्याचे सामंत यांनी सांगितले. जिल्ह्यात दि. १ ते ८ जुलैपर्यंत सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहे़ सायंकाळी ५ ते सकाळी ९ वाजेपर्यंत कडक संचारबंदी राहणार आहे. या कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणालाही घराबाहेर पडता येणार नाही.

जिल्ह्याच्या सीमा बंद

लॉकडाऊनच्या कालावधीत सर्व प्रवासी वाहतूक शंभर टक्के बंद राहिल. जिल्ह्यात येण्यासाठी बंदी घालण्यात आली असून, जिल्हा बाहेर जाणाऱ्या मालवाहू वाहनांना परवानगी देण्यात येणार आहे. जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद राहतील. नागरिकांनी घरातच राहून कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी सहकार्य करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

टास्क फोर्सची स्थापना

लॉकडाऊनबरोबरच कोरोना व्यतिरिक्त अन्य रुग्णांना सेवा मिळण्यासाठी स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांची मदत घेतली जाणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत टास्क फोर्सची स्थापना करण्यात येणार आहे. तर जिल्हा रुग्णालय स्तरावर कॉलसेंटर सुरु केली जाईल. त्या माध्यमातून रुग्ण, नातेवाईकांना मदत केली जाईल.

रत्नागिरीतही प्लाजमा थेरेपी 

मुंबई, पुण्यात सुरु असलेली प्लाजमा थेरेपी रत्नागिरीतही सुरु करण्यात येणार आहे़ या थेरपीद्वारे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहेत. त्यासाठी जिल्ह्यातील डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यात आल्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले़

मृतदेह रुग्णालयातच पडून

जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना चुकीची माहिती दिल्यामुळे एक मृतदेह दोन दिवस रुग्णालयातच पडून होता. जिल्हा रुग्णालयातील या गंभीर प्रकाराची दखल घेऊन एक सदस्य समिती स्थापन करण्याचे आदेश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत. दोन दिवसात या प्रकाराची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याचे आदेश सामंत यांनी दिले आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याUday Samantउदय सामंतMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारRatnagiriरत्नागिरी