शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

जाचक अटींमुळे कोकणातून मुंबईत जाणाऱ्या प्रवाशांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:23 IST

- प्रशासन, पोलिसांकडून नियमांचा केला जातोय बाऊ लाेकमत न्यूज नेटवर्क राजापूर : लॉकडाऊनचे जाचक नियम आणि अटी, ई-पास व ...

- प्रशासन, पोलिसांकडून नियमांचा केला जातोय बाऊ

लाेकमत न्यूज नेटवर्क

राजापूर : लॉकडाऊनचे जाचक नियम आणि अटी, ई-पास व प्रवाशांच्या कोरोना चाचणीची अट आणि पोलिसांकडून नियम व अटींचा बाऊ करत उगारला जाणारा कारवाईचा बडगा यामुळे गावाकडून मुंबईत जाणाऱ्या ग्रामीण भागातील प्रवाशांची परवड होत आहे. अनेकांना खासगी आरामबसमधून बसचा पास नाही, प्रवाशांचा कोरोना चाचणी अहवाल नाही म्हणून उतरविले जात आहे, तर एस़ टी़ च्या बसमधूनही २२ प्रवाशांपेक्षा जास्त प्रवासी असल्यास प्रवाशांना रस्त्यात उतरविले जात असल्याने प्रवासी हैराण झाले आहेत़

कोरोना संसर्ग आणि त्यानंतर जाहीर झालेल्या लॉकडाऊनच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणावर मुंबईकर चाकरमानी गावी आले. कुणी खासगी बसने, तर कुणी खासगी गाड्या करून गावात दाखल झाले. आता १ जूनपासून लॉकडाऊनमध्ये शिथिलता येणार असल्याची माहिती मिळताच पुन्हा एकदा चाकरमान्यांनी मुंबईला परतण्याची लगबग सुरू केली आहे. या चाकरमान्यांना सरकारच्या लॉकडाऊनच्या कालावधीत प्रवासी वाहतुकीबाबत घालण्यात आलेल्या जाचक नियम व अटींचा फटका बसत आहे.

खासगी आरामबस चालकांना राजापूर व अन्य भागांतून मुंबईला प्रवासी वाहतूक करायची असेल तर ई-पास, तसेच गाडीतील सर्व प्रवाशांची कोरोना चाचणी करून त्याचा अहवाल सोबत ठेवण्याचा नियम लागू करण्यात आला आहे. त्यामुळे याचा फटका ग्रामीण भागातील प्रवाशांना बसत आहे. शुक्रवारी राजापूर ओणी येथून सुटणाऱ्या अशा दोन खासगी बस चालकांविरोधात राजापूर पोलिसांनी कारवाई केली. त्यामुळे प्रवाशांना उतरविण्यात आले व रात्री त्यांना घरी पाठविण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशाप्रमाणे ही कारवाई होत असल्याचे स्थानिक पोलिसांकडून सांगितले जात आहे. मात्र, अशा अनेक बस मुंबई, पुण्यातून राजरोस प्रवासी वाहतूक करत आहेत, पण कोकणी माणसाला मात्र नियम आणि अटींचा बाऊ करत सरकारकडून त्रास दिला जात असल्याचा आराेप केला जात आहे़

खासगी बस वाहतूक बंद झाल्याने आता प्रवाशांनी एस़ टी़ ला पसंती दिली आहे. मात्र, कोरोना नियम आणि लॉकडाऊनमुळे एस़ टी़ चे ऑनलाईन आरक्षण बंद ठेवण्यात आले आहेत. त्यातच राजापूर आगारातून राजापूर-बोरिवली व राजापूर-नालासोपारा-अर्नाळा या दोन बस सकाळी सोडण्यात येत आहेत़ त्यातही केवळ प्रति बस २२ प्रवाशांचेच बंधन आहे. मात्र, २२ पेक्षा जास्त प्रवासी असले तर पोलिसांकडून त्यांनाही उतरविण्यात येत आहे. रविवारी राजापूर आगारातून अनेक प्रवाशांना गाडी नसल्याने मागे परतावे लागले आहे, तर लांजात राजापूर आगारातील एका मुंबई गाडीत चार ते पाच प्रवासी जास्त असल्याने त्यांना पोलिसांनी लांजात उतरविले़ त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले़