शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राजस्थानमधील रिफायनरीला भीषण आग, पंतप्रधान मोदी उद्या उद्घाटन करणार होते...
2
"व्ही.के.सिंग याने कशी अजित पवारांच्या अपघाताची कागदपत्रे नष्ट केली, याचा...", रोहित पवारांचा खळबळजनक आरोप
3
धक्कादायक! इराण देखील एमव्ही तूस्का जहाजाला घेरणार होता, पण क्रू मेंबरचे कुटुंब होते म्हणून...; युद्ध पेटणार...
4
पश्चिम बंगालच्या निवडणुकीआधी वेगळीच खेळी; दारूच्या दुकानांबद्दल झाला मोठा निर्णय
5
महिला आरक्षण: सुप्रिया सुळेंनी CM फडणवीसांचे आव्हान स्वीकारले; म्हणाल्या, “वेळ-जागा सांगा”
6
गुरुपुष्यामृत योग २०२६: केवळ सोने खरेदीच नाही, तर आयुष्याला सोन्याची झळाळी देणारा 'गुरुपुष्य' योग!
7
नाशिक TCS प्रकरण: "लग्नानंतर रात्री कशात व्यस्त असतेस?" चौथ्या पीडितेचा थरकाप उडवणारा जबाब
8
गाडी खरेदी करताना शोरूममधूनच इन्शुरन्स घेणे बंधनकारक आहे का? काय आहे नियम?
9
जपानमध्ये ७.४ तीव्रतेचा भीषण भूकंप! उत्तर किनारपट्टीला 'सुनामी'चा तडाखा बसण्याची शक्यता; ३ मीटर उंच लाटांचा इशारा
10
प्रार्थना आणि अश्रू..., हवेत ४ तास मृत्यूशी सामना! हैदराबादहून हुबळीला जाणाऱ्या Fly91 मध्ये तांत्रिक बिघाड, सुदैवाने मोठा अनर्थ टळला!
11
एअरटेल ग्राहकांना महागाईचा शॉक! ८४ दिवसांचा प्लॅन महागला, ७९९ चा प्लॅनही हटवला; आता रिचार्जसाठी मोजावे लागणार जास्तीचे पैसे
12
Bank Loan Rejection Reasons: पगार भक्कम असूनही बँक कर्ज नाकारतेय? 'या' ४ चुका ठरू शकतात कारणीभूत!
13
Sade Sati: साडेसातीचा विळखा की परिवर्तनाची संधी? मेष, कुंभ आणि मीन राशींसाठी आगामी काळ कसा असेल?
14
“राज्यातून १ कोटी सह्या घेणार, काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा उघड करू”: CM देवेंद्र फडणवीस
15
शेवटची इच्छा पूर्ण! 'स्वरस्वामिनी' आशा भोसले यांच्या अस्थींचे पवित्र गंगेत विसर्जन
16
इराण चर्चेसाठी पाकिस्तानात जाणार की नाही? इब्राहीम अजीजी म्हणाले, "प्रत्येक अट स्वीकारली जाणार नाही"
17
IPL 2026: रोहित शर्मा सलग दुसऱ्या सामन्यालाही मुकणार? GT vs MI मॅचआधी आली महत्त्वाची अपडेट
18
Latest Marathi News LIVE Updates: खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागण्या काय?
19
पश्चिम बंगालमध्ये ७ लाख नवीन मतदारांची भर; आगामी निवडणुकीत राजकीय गणिते बदलणार?
20
अमेरिकेचे सैन्य, इराणचे महाकाय जहाज; होर्मुझ सामुद्रधुनी सहा तास संघर्ष आणि घेतले ताब्यात; व्हिडीओ पहा
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभागातून संगणकाची उपलब्धता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:34 IST

- शाळा बंद मात्र शिक्षण सुरू लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनाचा परिणाम सर्व क्षेत्रावर झाला आहे. प्रत्यक्ष वर्ग ...

- शाळा बंद मात्र शिक्षण सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोरोनाचा परिणाम सर्व क्षेत्रावर झाला आहे. प्रत्यक्ष वर्ग भरविणे शक्य नसल्याने शाळांचे अध्यापन ऑनलाईन सुरू आहे; मात्र काही ठिकाणी नेटवर्कची समस्या आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षकांनी ‘शाळा बंद पण शिक्षण चालू’ या उपक्रमांतर्गत मुलांपर्यंत शिक्षणाचा वसा विविध मार्गाने पोहोचवत आहेत. संगमेश्वर तालुक्यातील पिरंदवणे घेवडेवाडी या गावातील प्राथमिक शिक्षक ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी प्रयत्नशील आहेत.

जिल्ह्यातील शाळांमध्ये Online/off-line च्या माध्यमातून शिक्षण विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी शिक्षक प्रयत्न करीत आहेत. शहरात ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देणे सोयीस्कर होत असले तरी ग्रामीण भागात नेटवर्कची समस्या आहे. शिवाय मोलमजुरी करणाऱ्या पालकांकडे स्मार्टफोन नाही. त्यामुळे वाड्या-वस्ती, दुर्गम भागात वसलेल्या वाडीतील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचणे जोखमीचे झाले आहे. संगमेश्वर तालुक्यातील ‘पिरंदवणे-घेवडेवाडी’ गावातील प्राथमिक शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी लोकसहभागातून संगणकाद्वारे अध्यापन सुरू केले आहे.

मुख्याध्यापक कपिल तडखेले व शिक्षक सतीश निकुंभ यांनी लोकसहभागातून, पिरंदवणे ग्रामपंचायतीच्या मदतीने शाळेसाठी एक संगणक व डोंगल मिळविला आहे. गावात सर्व ठिकाणी नेटवर्क उपलब्ध नाही. त्यामुळे नेटवर्क उपलब्ध झालेल्या ठिकाणी हा संगणक व डोंगल जोडण्यात आला आहे. त्यामुळे शाळेतील प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांचे वेळापत्रक ठरवून त्या विद्यार्थ्यांना वेळ निश्चित करून देण्यात आली आहे. कोरोनाचे नियम पाळून सोशल डिस्टन्सिंग वापर करून संगणकासमोर बसून अध्यापन करीत आहे. याशिवाय सतीश निकुंभ नेटवर्क मिळेल अशा ठिकाणाहून स्वत:च्या मोबाईलवरून गुगल- मीटद्वारे मुलांना ऑनलाइन शिक्षण देत आहेत. दररोज एक तास एका वर्गासाठी अशा प्रकारे सर्व वर्गासाठी अध्यापन सुरू आहे.

पिरंदवणे घेवडेवाडी शाळेत १७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ऑनलाइन शाळेत हजेरी लावून दररोजचा अभ्यास करत आहेत. शिक्षक व ग्रामस्थ यांनी घेतलेल्या या मेहनतीतून विद्यार्थ्यांच्या अध्यापनाचा प्रश्न मार्गी लागला आहे. याबाबत गटशिक्षणाधिकारी शशिकांत त्रिभुवणे, केंद्रप्रमुख महेंद्र जाधव यांनी शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ- पालक, शिक्षकांचे कौतुक केले आहे.