शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत दोन दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता, बागायतदार धास्तावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 15:33 IST

रत्नागिरी : गेल्या आठवड्यापासून वातावरणात पुन्हा बदल झाला आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने उकाडा वाढू लागला ...

रत्नागिरी : गेल्या आठवड्यापासून वातावरणात पुन्हा बदल झाला आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने उकाडा वाढू लागला आहे. सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरणामुळे पाऊस कुठल्याही क्षणी पडण्याची शक्यता वाटत होती. ढगाळ वातारणामुळे तयार होऊ लागलेल्या हापूसवर तुडतुडे पडण्याच्या शक्यतेने बागायतदार धास्तावले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात १ आणि २ एप्रिल या कालावधीत मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.गेल्या काही दिवसांपासून वातावरणात मोठ्या प्रमाणावर बदल होऊ लागले आहेत. मार्चपूर्वीच तापमानाचा पारा पहिल्यांदाच ३९ अंश सेल्सिअसवर गेला होता. त्यानंतर पुन्हा सकाळी आणि रात्री गारवा तर मध्येच मळभ आणि अधूनमधून पावसाचा शिडकावा असे वातावरणात झपाट्याने बदल होऊ लागले आहेत. त्यामुळे या वातावरणामुळे सर्दी, ताप, घशाचे संसर्ग, पित्त आदी आजारांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.

गेल्या तीन चार दिवसांपासून पुन्हा किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कर्नाटकाच्या किनाऱ्यावर चक्री वादळाची स्थिती निर्माण झाली आहे. याचा प्रभाव महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांवर होत असून काही भागात मुसळधार पाऊस पडत आहे. रत्नागिरीतही सोमवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण असल्याने पाऊस पडेल की काय, असे वाटत होते. सायंकाळी मेघगर्जनाही होत होती. १ आणि २ एप्रिल रोजी जिल्ह्यात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली असून आठवडाभर वातावरणही ढगाळ राहणार आहे. त्यामुळे उकाड्यातही कमालीची वाढ झाली आहे.दरम्यान, हापूसला सुरुवातीपासूनच या बदलत्या वातावरणाचा फटका बसू लागला आहे. फळ तयार झाल्यानंतर वाढलेल्या तापमानामुळे हापूस भाजला असून काही ठिकाणी काळे डागही पडले आहेत. त्यातच आता ढगाळ वातावरणामुळे थ्रीप्स, तुडतुडा, फळमाशीचे संकट हापूससमोर असल्याने बागायतदार चिंताग्रस्त झाले आहेत. सध्या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे वाऱ्याचा जोरही वाढल्याने आंबापिकाची गळही होत आहे. त्यामुळे या नैसर्गिक बदलाने बागायतदार हवालदिल झाले आहेत.

वाऱ्याचा जोर असल्याने मच्छीमारीही अडचणीत आहे. त्यामुळे हातावर पोट असलेल्या मच्छीमारांसमोर संकट उभे आहे. एकंदरीत, तापमानाचा वाढता आलेख, मळभाचे वातावरण आणि पावसाचे संकट यामुळे आरोग्य, हापूस, मच्छीमारी धोक्यात आली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीweatherहवामान अंदाजRainपाऊसFarmerशेतकरीMangoआंबा