शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

रत्नागिरी : पाण्यात बुडून औरंगाबाद येथील तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 1:18 PM

संगमेश्वर तालुक्यातील दाभोळे येथील काजळी नदीच्या पात्रात आंघोळ करत असताना औरंगाबादच्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. वैभव मधुकर साळुंखे (२५, श्रीरामनगर, ता.वैजापूर, जि.औरंगाबाद) असे या मृताचे नाव आहे. 

ठळक मुद्देपाण्यात बुडून औरंगाबाद येथील तरुणाचा मृत्यूघटनास्थळी पंचनामा, मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात

साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील दाभोळे येथील काजळी नदीच्या पात्रात आंघोळ करत असताना औरंगाबादच्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. वैभव मधुकर साळुंखे (२५, श्रीरामनगर, ता.वैजापूर, जि.औरंगाबाद) असे या मृताचे नाव आहे. दिलीप रतन सोनवणे हे आपल्या नातेवाईकांसह औरंगाबादहून शनिवारी सायंकाळी नाणीज येथे नरेंद्राचार्य महाराजांच्या वाढदिवसासाठी निघाले होते. रात्रभर प्रवास झाल्याने सकाळी दाभोळे येथील काजळी नदीच्या पात्रात सर्वजण आंघोळीसाठी थांबले होते.

गाडीतून एकूण दहाजण प्रवास करत होते. यावेळी वैभव मधुकर साळुंखे हा आंघोळीसाठी काजळी नदीच्या पात्रात गेला असता पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. पाण्यातून बाहेर पडण्यासाठी व जीव वाचवण्यासाठी तो प्रयत्न करत होता. मात्र त्यात यश न आल्याने अखेर त्याच मृत्यू झाला.ही घटना सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेची खबर मिळताच सहाय्यक पोलीस फौजदार संजय उकार्डे, हेडकॉन्स्टेबल कमलाकर तळेकर, पोलीस कॉन्स्टेबल विशाल कांबळे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व शव आरोग्य केंद्रात आणून शव विच्छेदन केले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेचा अधिक तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल प्रमोद वाघाटे करत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातRatnagiriरत्नागिरी