शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
2
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
3
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
4
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
5
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
6
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
7
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
8
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
9
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
10
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
11
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
12
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
13
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
14
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
15
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
16
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
17
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
18
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
19
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
20
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

जिल्हा नियोजनच्या निधीवरून रत्नागिरीत भाजपची उघड नाराजी, माजी आमदार विनय नातू यांच्या आरोपाने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 15:25 IST

आधी कदम, आता सामंत यांच्यावर टीका

चिपळूण : रत्नागिरी जिल्हा नियोजन मंडळाकडून २०२४-२५ या आर्थिक वर्षात राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागाच्या बांधकामासाठी निधी मंजूर झाला. यामध्ये एक कोटी ६२ लाख रत्नागिरी, तर ३६ लाख निधी चिपळूणच्या दवाखान्याच्या दुरुस्तीसाठी देण्यात आला. उर्वरित अन्य सात तालुक्यांत एकही निधी देण्यात आला नसून, केवळ रत्नागिरी आणि राजापूरच्या कंत्राटदारांसाठी या निधीची खैरात करण्यात आल्याचा आरोप माजी आमदार व भाजपचे प्रदेश सरचिटणीस डॉ. विनय नातू यांनी केला आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील महायुतीमध्ये पुन्हा एकदा जोरदार जुंपली आहे.खासदार नारायण राणे चिपळूणच्या दौऱ्यावर आल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांच्या विरोधात निधी वाटपावरून उघडपणे नाराजी व्यक्त केली. खासदार राणे यांनी हा विषय सौम्य केला असला, तरी आता गुहागरचे माजी आमदार आणि भाजपचे डॉ. विनय नातू यांनी पालकमंत्र्यांच्या निधी वाटपावरील भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे. राज्य सरकारच्या सचिव स्तरावरून या घटनेची चौकशी व्हावी, अशी मागणी नातू यांनी केली आहे.

जनावरांना तपासण्याच्या जागी पेव्हर ब्लॉक?जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाअंतर्गत २१ कामे नियोजन मंडळाने मंजूर केली. ही सर्व कामे बांधकामाची आहेत. दवाखान्याच्या बाहेरील रिकामी जागा जनावरांना तपासण्याची असते. पण त्या ठिकाणी पेव्हर ब्लाॅक बसविले जात आहेत, असा आक्षेप डॉ. नातू यांनी घेतला आहे.

चार तालुक्यांना निधीच नाहीजुन्या इमारतीचे निर्लेखन करून नवीन बांधकामे सुरू आहेत. यामध्ये दवाखान्याला फाॅल सिलिंग करणे हेही काम मंजूर आहे. या सर्व कामांमध्ये असे दिसून येत आहे की, ७६ लाखांची कामे रत्नागिरी तालुक्याला, ३१ लाखांची कामे राजापूरला, ४२ लाखांची कामे चिपळूण तालुक्यात, ५ लाखांची कामे संगमेश्वरात, ३ लाखांची गुहागरात, तर अन्य उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील चार तालुक्यांना निधीच नसल्याची बाब निदर्शनास आली असल्याचे डॉ. नातू यांचे म्हणणे आहे.

आधी कदम, आता सामंत यांच्यावर टीकाडॉ. नातू यांनी दोन दिवसांपूर्वी राज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर टीका केली आहे. कोकण ग्रामीण विकास पर्यटन निधीवरून त्यांनी राज्यमंत्री कदम यांच्यावर निशाणा साधला होता. आता जिल्हा नियोजनच्या निधीवरून त्यांनी पालकमंत्री सामंत यांच्यावर टीका केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात महायुतीमध्ये फार काही आलबेल नसल्याचेच चित्र दिसत आहे.