शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

दुग्ध व्यवसायाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न

By admin | Updated: July 18, 2015 00:17 IST

सुभाष चव्हाण : समन्वयकांची सभा बोलावण्याचा निर्णय

चिपळूण : चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेने शासनाच्या २० टक्के शेती कर्ज देण्याच्या धोरणाचे स्वागत केले आहे. संचालक मंडळाच्या झालेल्या सभेत दुग्ध व्यवसायासाठी सुलभ पद्धतीने कर्ज पुरवठा करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार जिल्ह्यात दुग्ध व्यवसाय करु इच्छिणाऱ्या व्यक्तीला दोन संकरित गायी वा म्हशींसाठी १ लाख रुपये कर्ज दोन योग्य जामीन घेऊन देण्यात येणार आहे. ५ संकरित गायी व म्हशींसाठी ३ लाख कर्ज तसेच १० संकरित गायी व म्हशींसाठी ५ लाख रुपये कर्ज योग्य तारण घेऊन विनाविलंब देण्यात येणार आहे.निसर्गातील होणाऱ्या बदलामुळे शेतकरी चिंतातूर आहे. अशा स्थितीत शेतकरी शेतीत टिकून राहायचा असेल तर शेतीसाठी पूरक असलेल्या व्यवसायांना प्रोत्साहन देऊन त्यांना आर्थिक आधार देण्यासाठी त्यांना जोडधंदे देणे आवश्यक आहे. यासाठी संबंधित सर्व एजन्सीजनी समन्वय साधून कष्टकरी शेतकऱ्यांसाठी आर्थिक शक्ती देणारे व्यवसाय देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. चिपळूण नागरी पतसंस्थेने शासनाच्या धोरणानुसार एकूण ४५ कोटी निधीची तरतूद शेतकऱ्यांच्या शेती विषयक विकासासाठी केली आहे. यामध्ये प्रामुख्याने दुग्ध व्यवसाय, शेळीपालन व कुक्कुटपालन या व्यवसायांना प्राधान्य दिले आहे. यासंबंधी चिपळूण नागरी पतसंस्थेतर्फे राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमात संस्थेच्या सर्व समन्वयकांचा सहभाग महत्त्वाचा असेल. त्यांनी योग्य व्यक्तींची माहिती संस्थेच्या नजीकच्या शाखेत देऊन गरजूंना तत्काळ कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी मार्गदर्शन करावयाचे आहे.यासाठी संस्थेमार्फत २४ जुलै रोजी सभा आयोजित करण्यात आली आहे. योजनेच्या अंमलबजावणीला अधिक गती देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष चव्हाण यांनी दिली. चिपळूण तालुक्यात अनेक ठिकाणी दुग्ध व्यवसाय, शेळीपालन व कुक्कुटपालन या व्यवसायांना प्राधान्य दिले असल्याने आता चिपळूण नाग९रपीने या साऱ्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. पतसंस्थेच्या माध्यमातून असे प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. चिपळूण तालुक्यात यासंबधी आपण विशेष प्रयत्न करणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. कोकणातील शेतकऱ्याला यापुढे स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. (प्रतिनिधी)शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांमधून फायदा मिळण्यासाठी संस्था प्रयत्नशील. निसर्गातील बदलाचा परिणाम शेतकऱ्याच्या जीवनमानावर होत असल्याने त्याला उपकारक. पर्यायी उत्पन्नासाठी शेतकऱ्याने पशुपालनाकडे वळण्याचा संदेश.समन्वयकांतर्फे घेतले जाताहेत परिश्रम. संस्थेमार्फत २४ जुलै रोजी सभा होणार. शेतीसाठी पूरक योजना महत्त्वाच्या.