शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

मुलांच्या वाढलेल्या वजनाने पालकांमध्ये चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनाकाळात सुमारे पावणेदोन वर्षे घरात राहिलेल्या मुलांचे खाणे वाढले आहे. मात्र, टीव्ही आणि ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोरोनाकाळात सुमारे पावणेदोन वर्षे घरात राहिलेल्या मुलांचे खाणे वाढले आहे. मात्र, टीव्ही आणि मोबाईलवर अधिकतर वेळ घालविण्यामुळे शरीराच्या हालचालीही थांबल्या आहेत. त्यामुळे मुलांचे वजन वाढले आहे. मात्र, यामुळे पालकांपुढे चिंता निर्माण झाली आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून म्हणजेच मार्च २०२० पासून लाॅकडाऊन सुरू झाले, तेव्हापासून शाळा-महाविद्यालये बंद झाली. सध्या मोठे वर्ग काहीअंशी सुरू झाले असले तरी लहान वर्ग अजूनही बंद आहेत. त्यामुळे ही सर्व मुले घरी आहेत. सध्या या मुलांना घरातील अन्न बऱ्याचअंशी मिळत आहे, ही बाब आरोग्याच्या दृष्टीने चांगली असली तरी सतत खाण्यामुळे वजन वाढू लागले आहे. त्यातच ही मुले बाहेर पडत नसल्याने खेळही बंद आहे. त्यामुळे शारीरिक हालचालीही थांबल्या आहेत.

...........................

डोळे आणि पचनाचे विकारही वाढले

मुले आता दिवसभर घरात राहिल्याने त्यांचे खेळणे थांबले आहे. घरी बसून तासन्तास टीव्हीसमोर बसणे किंवा मोबाईलवर गेम बघत राहाणे यामुळे पचनाचे विकार, लठ्ठपणा यात वाढ होत असून डोळ्यांवरही ताण येत आहे.

पालकांची चिंता वाढली

मुलं घरी आहेत. त्यामुळे सतत काहींना काही नवीन पदार्थ बनविण्याची फर्माईश असते; परंतु खाणे जास्त आणि व्यायाम काहीच नाही. यामुळे वजन वाढू लागले आहे.

- चिंतन तेंडुलकर, पालक, रत्नागिरी.

सध्या शाळा बंद आहेत. त्यामुळे घरचे नेहमीच खाण्याचा कंटाळा असतो. फास्टफूड खाण्याचा हट्ट मुलांकडून केला जात आहे. त्यातच मोबाईल-टीव्हीत लक्ष अधिक असल्याने एकाच ठिकाणी अधिक वेळ बसून राहतात.

- प्रेरणा काळे, पालक, चरवेली, रत्नागिरी.

....................................

तज्ज्ञ काय म्हणतात

मुलं शाळेत असताना भरपूर खेळतात. मात्र, आता घरी असल्याने सतत खाणे आणि मोबाईलवर राहण्याने त्यांचे वजन वाढतेय. पालकांनी त्यांना थोडेसे खेळायला द्यायला हवे. व्यायामाची सवय लावावी.

- डाॅ. रोहित पाटील, बालरोगतज्ज्ञ, जिल्हा रुग्णालय, रत्नागिरी.

मुलांच्या ॲक्टिव्हिटी थांबल्याने लठ्ठपणात वाढ होत आहे. या काळात त्यांच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्यावरही परिणाम होत आहे. ऑनलाईन अभ्यासामुळे काहीसा आत्मविश्वासही कमी होताना दिसतो. यातून त्यांची चिडचिडही वाढली आहे. डोळ्यांवरही परिणाम होताना दिसतात.

- डाॅ. गोकुळ देसाई, आयुर्वेदिक तज्ज्ञ, रत्नागिरी.