शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
3
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
4
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
5
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
6
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
7
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
8
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
9
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
10
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
11
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
12
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
13
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
14
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
15
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
16
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
17
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
18
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
19
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
20
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा

पंतप्रधान किसान पेन्शन योजनेत बोगस लाभार्थी, अपात्र शेतकऱ्यांकडून 'इतक्या' कोटीची वसुली अजूनही बाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2021 4:22 PM

शोभना कांबळे रत्नागिरी : शेतकऱ्यांसाठी किसान सन्मान योजना २०१८ पासून सुरू करण्यात आली आहे. मात्र, या योजनेचा लाभ आयकर ...

शोभना कांबळेरत्नागिरी : शेतकऱ्यांसाठी किसान सन्मान योजना २०१८ पासून सुरू करण्यात आली आहे. मात्र, या योजनेचा लाभ आयकर दाते तसेच निकषात न बसणाऱ्या व्यक्तींनी घेतल्याचे निदर्शनास आल्याने घेतलेला लाभ परत करण्याची कारवाई जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहे. अशा अपात्र ४०२० शेतकऱ्यांकडून आतापर्यंत एक कोटी एक लाख ३२ हजार इतकी रक्कम वसूल करण्यात आली असून, सुमारे दीड कोटीची वसुली अजूनही बाकी आहे.

केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान योजना जाहीर केली होती. या योजनेंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये पेन्शन तीन टप्प्यांत दिली जात आहे. जिल्ह्यात या योजनेचे २ लाख ५७ हजार ९९९ एवढे लाभार्थी आहेत. मात्र, या योजनेचा लाभ केवळ अल्पभूधारक तसेच ज्यांचे उत्पन्न १० हजारांच्या आत आहे, अशांना देण्यात येतो.

असे असतानाही या योजनेचा लाभ आयकर भरणारे तसेच नवरा - बायको दोघेही नोकरीला असणाऱ्यांकडून घेण्यात आला होता. आधार कार्ड लिंक असल्याने शासनाच्या ही बाब निदर्शनास आली. त्यामुळे अशा अपात्र शेतकऱ्यांवर कारवाई करून त्यांना देण्यात आलेली रक्कम परत करण्यासंदर्भातील आदेश केंद्र सरकारकडून देण्यात आले होते. देशभरातील अशा अपात्र शेतकऱ्यांची यादी आणि त्यांनी भरावयाच्या रकमेसह यादी सर्व जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आली होती.

त्यानुसार अशा अपात्र शेतकऱ्यांकडून पैसे परत घेण्यासंदर्भात प्रत्येक तालुक्यात कारवाई सुरू झाली आहे. पोर्टलद्वारे ही पैसे भरण्याची प्रक्रिया सुरू आहे.

वर्षभरात केवळ सव्वा काेटीची वसुली

- आयकर भरलेले तसेच अन्य कारणाने अपात्र शेतकऱ्यांकडून पेन्शन परत घेण्याची कारवाई

- जिल्ह्यातील अपात्र ठरलेल्या ४०२० शेतकऱ्यांपैकी १५१० शेतकऱ्यांनी १ कोटी २० लाख ७२ हजार एवढा भरणा केला आहे.

- उर्वरित २५१० अपात्र शेतकऱ्यांकडून १ कोटी ५२ लाख ३२ हजार रुपयांचा भरणा व्हायचा असून, सध्या ही प्रक्रिया सुरू आहे.

४९८ शेतकऱ्यांना लाभ नाही

- जिल्ह्यातील आयकर भरलेल्या ४०२० शेतकऱ्यांपैकी ३५२२ शेतकऱ्यांनी घेतला लाभ.

- ३५२२ शेतकऱ्यांना मिळाला पहिल्या हप्त्याचा लाभ

- ४९८ जणांना लाभ मिळाला नाही

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीPensionनिवृत्ती वेतनPM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना