राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका सुरू आहेत. दरम्यान, राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. शिंदेसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. "पराभव झाला आहे, तो मान्य करा. हरायचे आणि आपणच जिंकलो असे सांगायचे, ही कुठली नीती आहे?” असा थेट सवाल उदय सामंत यांनी केला.
खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यांवर बोलताना सामंत म्हणाले की, “त्यांच्या प्रश्नांमध्ये काहीही तथ्य नसतं. आम्ही विधायक गोष्टींवर बोलतो. विरोधक म्हणून त्यांना अजून २५ वर्षे बोलू द्या.”
उद्धव ठाकरे यांची सध्याची रणनीती ‘गिरे तो भी टांग ऊपर’ अशी असल्याची टीका करत सामंत म्हणाले की, “मनसेच्या पाठीमागे उद्धव ठाकरे यांची सेना खंजीर खुपसणार, असं मी आधीच सांगितलं होतं. त्याच पद्धतीने मनसेच्या पाठीवर खंजीर खुपसण्यात आला. त्याचा परिणाम कल्याण डोंबिवलीत दिसतोय. ही तर फक्त सुरुवात आहे.
राज ठाकरे यांच्या वक्तव्यांवर भाष्य करताना सामंत म्हणाले, “राज ठाकरे कुठल्या संदर्भात बोलले, याची माहिती घेऊनच आम्ही प्रतिक्रिया देऊ.
वडेट्टीवारांवर टीका
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर निशाणा साधत सामंत म्हणाले की, “सनसनाटी बातम्या द्यायच्या असतील तर असंबंध बोलणे गरजेचे असते. वडेट्टीवार यात अग्रेसर आहेत. नगरसेवकांना पैसे कोण देतोय हे आधी तपासा. काँग्रेसमध्येच दोन गट पडले असून, कदाचित त्यांच्यातीलच एक गट पैसे देत असावा.
Web Summary : Uday Samant criticized Uddhav Thackeray, urging him to accept defeat in the Zilla Parishad elections. He accused Thackeray of employing a 'lose but claim victory' strategy and alleged Sena stabbed MNS in Kalyan Dombivli. Samant also responded to Sanjay Raut's statements and targeted Vijay Wadettiwar's remarks.
Web Summary : उदय सामंत ने उद्धव ठाकरे की आलोचना करते हुए उनसे जिला परिषद चुनावों में हार स्वीकार करने का आग्रह किया। उन्होंने ठाकरे पर 'हारो लेकिन जीत का दावा करो' रणनीति अपनाने का आरोप लगाया और आरोप लगाया कि सेना ने कल्याण डोंबिवली में मनसे को धोखा दिया। सामंत ने संजय राउत के बयानों पर भी प्रतिक्रिया दी और विजय वडेट्टीवार की टिप्पणियों को निशाना बनाया।