शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीच्या कृषी प्रदर्शनात हापूस आंबा गैरहजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 10:50 IST

रत्नागिरी जिल्हा कृषी महोत्सवात कोकणात तसेच लगतच्या जिल्ह्यांमध्ये उत्पादित होणाऱ्या वस्तूंची विक्री सुरू आहे. दरम्यान, मार्चमध्ये कृषी प्रदर्शन आयोजित करूनसुध्दा कोकणचा हापूस मात्र याठिकाणी विक्रीसाठी नाही, ही शोकांतिका म्हणावी लागेल.

ठळक मुद्देरत्नागिरीच्या कृषी प्रदर्शनात हापूस आंबा गैरहजरआत्मातर्फे कोकणात उत्पादित होणाऱ्या वस्तूंची विक्री सुरू

रत्नागिरी : कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रत्नागिरी जिल्हा कृषी महोत्सवाला दिमाखात प्रारंभ झाला आहे. सलग पाच दिवसांचा कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

या महोत्सवात कोकणात तसेच लगतच्या जिल्ह्यांमध्ये उत्पादित होणाऱ्या वस्तूंची विक्री सुरू आहे. दरम्यान, मार्चमध्ये कृषी प्रदर्शन आयोजित करूनसुध्दा कोकणचा हापूस मात्र याठिकाणी विक्रीसाठी नाही, ही शोकांतिका म्हणावी लागेल.कोकणच्या लाल मातीत स्ट्रॉबेरी, ड्रॅगनफ्रूट, ब्रोकोली, सिमला मिरची, गहू, कांदा, बटाटा, मका, ऊस यासारखी पिके घेऊन आर्थिकदृष्ट्या उन्नत्ती साधणारे शेतकरी आहेत. त्यामुळे पाच दिवस चालणाऱ्या या कृषी प्रदर्शनामध्ये भाज्या, फळभाज्या, फळे, धान्य तसेच नाचणीपासून तयार केली जाणारी बिस्कीटे, सत्व उपलब्ध आहेत.

कऱ्हाडचा तूप घालून तयार केलेला गूळ तर रत्नागिरीकरांना भुरळ घालीत आहे. ओले काजूगर, काजू, विलायती काजू, ड्राय काजूगर, कच्ची करवंदे, आमरस, फणसजाम, कोकम सरबत, जांभूळ सरबत, आवळा सरबत याठिकाणी विक्रीला आहेत. मात्र, आंबा विक्रीसाठी नाही.

यावर्षी एकूणच आंब्याचे उत्पादन कमी झाले असून, निसर्गाच्या दृष्टचक्रात सापडलेला आंबा तयार होण्यास अजून काही दिवसांचा अवधी आहे. प्रदर्शनाच्या मुख्य स्टॉलवर कोकणात उत्पादित होणारी विविध फळे ठेवण्यात आली आहेत. याठिकाणी राजापूर येथील काझी नामक बागायतदारांच्या बागेतील चार आंबे प्रदर्शनापुरते ठेवण्यात आले असले तरी विक्रीसाठी आंबा उपलब्ध नाही.अविट गोडीने भुरळ घालणारा यावर्षीच्या हंगामातील हापूस सध्या वाशी मार्केटमध्ये दाखल झाला आहे. याठिकाणी आंबा पेट्यांची संख्या कमी आहे. मोहोरावर व फळांवर थ्रीप्सचा प्रादुर्भाव झाला असून, महागडी कीटकनाशके वापरूनही थ्रीप्स नष्ट होत नसल्याने बागायतदार त्रस्त झाले आहेत.

यावर्षीच्या हंगामातील विविध संकटांचा सामना करीत वाशी मार्केटमध्ये विक्रीसाठी आंबा पाठविण्यात येत असला तरी गतवर्षीच्या तुलनेत आंब्याचे प्रमाण अत्यल्प आहेच शिवाय दरही कमी आहे. सध्या आंबापेटीची विक्री १,५०० ते ४,००० रूपये दराने सुरू आहे.थ्रीप्सचे संकट यावर्षी सुरूवातीपासून राहिले आहे. डिसेंबरपासून मोहोरावर असलेला थ्रीप्स कीटकनाशकांच्या फवारणीनंतरही नष्ट होत नाही. तुडतुड्याबरोबर कीडरोगाचाही प्रादुर्भाव वाढला आहे. बदलत्या हवामानामुळे कीडरोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कीटकनाशकाच्या फवारणीनंतरही कीडीचा, थ्रीप्सचा प्रादुर्भाव तसाच राहत असून, काही ठिकाणी मोहोर काळा पडला आहे.

टॅग्स :MangoआंबाRatnagiriरत्नागिरीAgriculture Sectorशेती क्षेत्र