शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

रत्नागिरीच्या कृषी प्रदर्शनात हापूस आंबा गैरहजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 10:50 IST

रत्नागिरी जिल्हा कृषी महोत्सवात कोकणात तसेच लगतच्या जिल्ह्यांमध्ये उत्पादित होणाऱ्या वस्तूंची विक्री सुरू आहे. दरम्यान, मार्चमध्ये कृषी प्रदर्शन आयोजित करूनसुध्दा कोकणचा हापूस मात्र याठिकाणी विक्रीसाठी नाही, ही शोकांतिका म्हणावी लागेल.

ठळक मुद्देरत्नागिरीच्या कृषी प्रदर्शनात हापूस आंबा गैरहजरआत्मातर्फे कोकणात उत्पादित होणाऱ्या वस्तूंची विक्री सुरू

रत्नागिरी : कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रत्नागिरी जिल्हा कृषी महोत्सवाला दिमाखात प्रारंभ झाला आहे. सलग पाच दिवसांचा कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

या महोत्सवात कोकणात तसेच लगतच्या जिल्ह्यांमध्ये उत्पादित होणाऱ्या वस्तूंची विक्री सुरू आहे. दरम्यान, मार्चमध्ये कृषी प्रदर्शन आयोजित करूनसुध्दा कोकणचा हापूस मात्र याठिकाणी विक्रीसाठी नाही, ही शोकांतिका म्हणावी लागेल.कोकणच्या लाल मातीत स्ट्रॉबेरी, ड्रॅगनफ्रूट, ब्रोकोली, सिमला मिरची, गहू, कांदा, बटाटा, मका, ऊस यासारखी पिके घेऊन आर्थिकदृष्ट्या उन्नत्ती साधणारे शेतकरी आहेत. त्यामुळे पाच दिवस चालणाऱ्या या कृषी प्रदर्शनामध्ये भाज्या, फळभाज्या, फळे, धान्य तसेच नाचणीपासून तयार केली जाणारी बिस्कीटे, सत्व उपलब्ध आहेत.

कऱ्हाडचा तूप घालून तयार केलेला गूळ तर रत्नागिरीकरांना भुरळ घालीत आहे. ओले काजूगर, काजू, विलायती काजू, ड्राय काजूगर, कच्ची करवंदे, आमरस, फणसजाम, कोकम सरबत, जांभूळ सरबत, आवळा सरबत याठिकाणी विक्रीला आहेत. मात्र, आंबा विक्रीसाठी नाही.

यावर्षी एकूणच आंब्याचे उत्पादन कमी झाले असून, निसर्गाच्या दृष्टचक्रात सापडलेला आंबा तयार होण्यास अजून काही दिवसांचा अवधी आहे. प्रदर्शनाच्या मुख्य स्टॉलवर कोकणात उत्पादित होणारी विविध फळे ठेवण्यात आली आहेत. याठिकाणी राजापूर येथील काझी नामक बागायतदारांच्या बागेतील चार आंबे प्रदर्शनापुरते ठेवण्यात आले असले तरी विक्रीसाठी आंबा उपलब्ध नाही.अविट गोडीने भुरळ घालणारा यावर्षीच्या हंगामातील हापूस सध्या वाशी मार्केटमध्ये दाखल झाला आहे. याठिकाणी आंबा पेट्यांची संख्या कमी आहे. मोहोरावर व फळांवर थ्रीप्सचा प्रादुर्भाव झाला असून, महागडी कीटकनाशके वापरूनही थ्रीप्स नष्ट होत नसल्याने बागायतदार त्रस्त झाले आहेत.

यावर्षीच्या हंगामातील विविध संकटांचा सामना करीत वाशी मार्केटमध्ये विक्रीसाठी आंबा पाठविण्यात येत असला तरी गतवर्षीच्या तुलनेत आंब्याचे प्रमाण अत्यल्प आहेच शिवाय दरही कमी आहे. सध्या आंबापेटीची विक्री १,५०० ते ४,००० रूपये दराने सुरू आहे.थ्रीप्सचे संकट यावर्षी सुरूवातीपासून राहिले आहे. डिसेंबरपासून मोहोरावर असलेला थ्रीप्स कीटकनाशकांच्या फवारणीनंतरही नष्ट होत नाही. तुडतुड्याबरोबर कीडरोगाचाही प्रादुर्भाव वाढला आहे. बदलत्या हवामानामुळे कीडरोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कीटकनाशकाच्या फवारणीनंतरही कीडीचा, थ्रीप्सचा प्रादुर्भाव तसाच राहत असून, काही ठिकाणी मोहोर काळा पडला आहे.

टॅग्स :MangoआंबाRatnagiriरत्नागिरीAgriculture Sectorशेती क्षेत्र