शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
4
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
5
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
6
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
7
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
8
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
9
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
10
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
11
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
12
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
13
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
14
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
15
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
16
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
17
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
18
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
19
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
20
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल

रत्नागिरी: विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसवर विजेचा खांब कोसळला, 'महावितरण'चा अनागोंदी कारभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2022 15:02 IST

विजेचा खांब गेली कित्येक दिवस धोकादायक स्थितीत होता. पण तक्रारीनंतरही त्याकडे महावितरणने दुर्लक्ष केले होते. तेच आज विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतले असते.

रत्नागिरी : माध्यमिक विद्यामंदिर, नाणीज शाळेच्या विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसवर विजेचा खांब कोसळल्याची घटना घडली. विद्युत खांब बसच्या बॉनेटवर पडला. त्यामुळे सुदैवाने बसमधील विद्यार्थ्यांना दुखापत झाली नाही. सर्व विद्यार्थी सुरक्षित आहेत. अपघाताची माहिती सर्वत्र पसरताच पालकांनी घटनास्थळी धाव घेतली. आज, सोमवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातानंतर महावितरणचा अनागोंदी कारभार समोर आला.माध्यमिक विद्यामंदिर, नाणीज येथे शिक्षणासाठी नांदिवली (ता. लांजा) भागातून विद्यार्थी येतात. नांदिवली येथून नाणीज येथे दररोज शाळेची बस क्रमांक (एमएच-०८-एपी-१२८६) मधून विद्यार्थी वाहतूक केली जाते. दरम्यान रोडवरील बाजारपेठ येथील प्राथमिक शाळेसमोरील विजेचा खांब गेली कित्येक दिवस धोकादायक स्थितीत होता. पण तक्रारीनंतरही त्याकडे महावितरणने दुर्लक्ष केले होते. तेच आज विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतले असते.दैव बलवत्तर म्हणून गाडीच्या पुढच्या भागावर हा खांब आदळला त्यामुळे बसमधील विद्यार्थ्यांना कोणतीही दुखापत झाली नाही.  चालक प्रशांत पांचाळ यांनी  प्रसंगावधानाने गाडी वेळेत थांबवली त्यामुळे मोठा अनर्थ टळला. अपघातानंतर स्थानिक मदतीला धावून आले. दरम्यान, विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बस वर खांब कोसळल्याची वार्ता परिसरात वाऱ्यासारखी पसरली. यानंतर अनेक पालकांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातानंतर तरी महावितरणने रस्त्याच्या जवळील, तसेच गावातील धोकादायक विजेचे खांब हटवावेत अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. जोराच्या पावसामुळे, वाऱ्यामुळे धोकादायक स्थितीतील खांब कोसळण्याच्या घटना घडत आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAccidentअपघातSchoolशाळाStudentविद्यार्थी