शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

हातखंबा येथे ९ जिवंत गावठी बाॅम्ब जप्त, वेंगुर्ल्याचे दाेघे ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 7:17 PM

रत्नागिरी तालुक्यात बाॅम्बची मोठ्या प्रमाणात विक्री करणार होते. त्यापूर्वी नमुना म्हणून हे बाॅम्ब दाखविण्यासाठी घेऊन आले होते.

रत्नागिरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले येथून रत्नागिरी तालुक्यात गावठी बाॅम्ब विक्रीसाठी आलेल्या दोघांना जिल्ह्याच्या दहशतवादविरोधी पथकाने ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून ९ जिवंत गावठी बाॅम्ब जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई शनिवारी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या दरम्यान मुंबई - गाेवा महामार्गावरील हातखंबा येथे केली.

याप्रकरणी पोलीस हेडकाॅन्स्टेबल उदय चांदणे यांनी ग्रामीण पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार वेंगुर्ले येथील रामा सुरेश पालयेकर (वय २२), श्रीकृष्ण केशव हळदणकर (वय २६, रा. गावडेश्वर मंदिर) या दाेघांना ताब्यात घेऊन अटक केली आहे.

वेंगुर्ले येथून दोन तरुण गावठी बाॅम्ब घेऊन रत्नागिरीत येणार असल्याची माहिती रत्नागिरी जिल्ह्याच्या दहशतवादविरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार सायंकाळी ६ वाजल्यापासून पोलिसांनी हातखंबा येथे सापळा लावला होता. सायंकाळी पालीहून रत्नागिरीच्या दिशेने एक दुचाकी (एमएच ०७, एपी-२७००) भरधाव वेगाने येत होती. ही दुचाकी पाेलिसांनी थांबविली. मात्र, रामा पालयेकर व श्रीकृष्ण हळदणकर हे दाेघे पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्या दोघांची झडती घेतल्यानंतर त्यांच्या ताब्यात नऊ जिवंत गावठी बाॅम्ब आढळले.

त्यानंतर पोलिसांनी तत्काळ बाॅम्बशोधक नाशक पथकाला बाेलावून जिवंत बाॅम्ब त्यांच्या ताब्यात दिले. या घटनेची माहिती ग्रामीण पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचानामा केला. रविवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता दोघांनाही दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

विक्रीचा डाव उधळला

वेंगुर्ला येथून जिवंत गावठी बाॅम्ब घेऊन आलेले तरुण रत्नागिरी तालुक्यात बाॅम्बची मोठ्या प्रमाणात विक्री करणार होते. त्यापूर्वी नमुना म्हणून हे बाॅम्ब दाखविण्यासाठी घेऊन आले होते. बाॅम्बची विक्री हाेण्याआधीच पोलिसांच्या पथकाने त्यांचा डाव उधळून लावला.

टोळीच्या मुळापर्यंत जाणार का?

रत्नागिरीत मोठ्या प्रमाणात गावठी बाॅम्ब जिल्ह्याबाहेरून पुरविले जात असल्याचे या घटनेवरून उघड झाले आहे. रत्नागिरी तालुक्यात शिकारीचे प्रमाण वाढल्याचेही स्पष्ट होत आहे. त्यामुळे ग्रामीण पोलीस या टोळीच्या मुळापर्यंत जाणार का? रत्नागिरी तालुक्यातील वन्य प्राण्यांची शिकार रोखणार का? हेच पाहायचे आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी